एक्स्प्लोर

शाहू महारांजाच्या निश्चयाचा महामेरु राधानगरी धरणातील 'बेनझीर व्हिला'चा अस्तित्वासाठीच संघर्ष; पाणीदार कोल्हापूरचे स्वप्न त्याच ठिकाणाहून पाहिलं

व्हिला बांधल्यापासून केवळ तो चारवेळा पाहण्यास उपलब्ध झाला आहे. बेनझीरचा अर्थ एकमेवाद्वितीय किंवा अप्रतिम असा होतो. हे नाव दस्तुरखुद्द राधानगरी धरणाचं स्वप्न पाहणाऱ्या शाहू महाराजांनीच दिलं आहे.

Rajarshi Shahu Maharaj: लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी पाणीदार कोल्हापूरसाठी (Kolhapur) राधानगरी धरणाचे (Radhanagari Dam) स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण होण्यासाठी ज्या ठिकाणी तळ ठोकला ते म्हणजे बेनझीर व्हिला. तोच बेनझीर व्हिला (Benazir Villa) आज अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. शाहूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या व्हिलाचा श्वास भोवती वाढलेल्या झाडाझुडपांनी श्वास कोंडून गेला आहे. व्हिला बांधल्यापासून आतापर्यंत केवळ ती चारवेळा पाहण्यास उपलब्ध झाली आहे. बेनझीरचा अर्थ एकमेवाद्वितीय किंवा अप्रतिम असा होतो. हे नाव दस्तुरखुद्द राधानगरी धरणाचं स्वप्न पाहणाऱ्या शाहू महाराजांनीच दिलं आहे. यासाठी 1912 मध्ये शासकीय दप्तरी ठराव केल्याची नोंद आहे. 

बेनझीर व्हिला धरणाच्या मध्यभागी

राधानगरी धरणाची निर्मिती होत असताना तेथील कामकाजावर लक्ष ठेवता यावे, तसेच हे धरण पूर्णत्वास लवकर जावे यासाठी स्वत: शाहू महाराजांनी बेनझीर व्हिलाची पायाभरणी करत देखणी आणि अप्रतिम नजारा असलेली जागा निवडली. या व्हिलाची प्रत्येक भिंत महाराजांचा रयतेच्या कल्याणासाठी जो दृढनिश्चय होता त्याची ती साक्षीदार आहे. चुना आणि वाळूमध्ये बांधलेली ही आकर्षक व ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू आहे. 

कसा आहे बेनझीर व्हिला?

राधानगरी लक्ष्मी तलावाच्या मुख्य भिंतीसमोर आणि पाण्याच्या मधोमध एक छोटं बेट तयार झालं आहे. या बेटावरच राजर्षी शाहू महाराजांनी बेनझीर व्हिलाची पायाभरणी केली. ही वास्तू धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्यामध्ये सापडल्याने आजतागायत दुर्लक्षितच राहिली आहे. गेल्या 68 वर्षांमध्ये केवळ चारवेळा ही वास्तू जवळून पाहता आली आहे. राज्यात 1972 मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. तेव्हा पहिल्यांदा बेनझीर व्हिला वास्तू झाली होती. यानंतर असाच बाका प्रसंग 2016 आणि 2019 मध्ये बेनझीर व्हिला खुला झाला. यानंतर यंदा भीषण परिस्थिती ओढावल्याने ती पुन्हा खुली झाली आहे. व्हिला पाहण्यासाठी उत्तरेकडील किनाऱ्यावरुन राऊतवाडीमधून जावे लागते. 

ज्या उदात्त भावनेने शाहू महाराजांनी या वास्तूची उभारणी केली होती तो उद्देश रयतेसह शेतकऱ्यांच्या कल्याणाचा आणि पाणीदार कोल्हापूरसाठी होता. त्यामुळे धरणाने तळ गाठल्याने ही वास्तू पाहता येत असल्याचा आनंद पर्यटकांना असला, तरी तो सर्वसमावेशक आनंद देणारा नक्कीच नाही. लोकराजाचा उद्देश रयतेच्या घशाला कोरड पडू नये, यासाठी होता, पण आज धरणाने तळ गाठल्याने घसा कोरडा होण्याची वेळ आली आहे. आजतागायत जे महाराजांनी दिलं त्याच शिदोरीवर कोल्हापूर पुढे जात आहे. त्या पलीकडे कोणतीच आश्वासक नवनिर्मिती कोल्हापूरच्या भूमीत झालेली नाही. त्यामुळे महाराजांच्या निश्चयाची प्रतीक असलेला बेनझीर व्हिला जपणं हे आपलं कर्तव्य आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget