एक्स्प्लोर

Ichalkaranji Vidhan Sabha : इचलकरंजीतून राहुल आवाडेच उमेदवार! महायुतीला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदार प्रकाश आवाडेंची मोठी घोषणा

Ichalkaranji Vidhan Sabha : कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारसंघांमध्ये कोणतीही संभ्रमावस्था राहू नये यासाठी मी हा निर्णय घेतला असल्याचे प्रकाश आवडे यांनी आपला निर्णय जाहीर करताना सांगितले.

कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची महायुतीकडून कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर आता अवघ्या चार दिवसांमध्येच इचलकरंजीमधून सुद्धा विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी आपल्या मुलाची उमेदवारी जाहीर केली आहे. राहुल आवाडे हेच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असतील, अशी घोषणा आज प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे महायुतीला पाठिंबा दिलेला असतानाही प्रकाश आवाडे यांनी घेतलेल्या निर्णयाने भूवया उंचावल्या आहेत.

आम्ही कोणाकडे उमेदवारी मागायला जाणार नाही

दरम्यान, महायुतीने पाठिंबा दिल्यानंतर काय निर्णय घेणार याबाबत विचारले असता त्यांनी या संदर्भातील निर्णय त्यावेळी पाहू असे सांगितले. आम्ही कोणाकडे उमेदवारी मागायला जाणार नाही. ते ताराराणी पक्षाकडून ती उभे राहतील असे त्यांनी सांगितले. आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीमधून राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर करताना अजून तीन ते चार ठिकाणी उमेदवार देणार असल्याची घोषणा केली. हे सर्व उमेदवार ताराराणीच्या चिन्हावर उभा करणार असल्याचेही आवाडे यांनी म्हटलं आहे. 

राहुल आवाडे हेच इचलकरंजीमधून उमेदवार असतील

पक्ष कोणता असेल याची चर्चा करण्यापेक्षा राहुल आवाडे हेच इचलकरंजीमधून उमेदवार असतील. कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारसंघांमध्ये कोणतीही संभ्रमावस्था राहू नये यासाठी मी हा निर्णय घेतला असल्याचे प्रकाश आवडे यांनी आपला निर्णय जाहीर करताना सांगितले.

ते म्हणाले की, मागील वेळी सुद्धा मी स्वतःच लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला होता. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही प्रामाणिकपणे भाजपचे पाठीशी उभा असल्याचं प्रकाश आवाडे यांनी नमूद केले. माझ्या निर्णयाबाबत वरिष्ठांना माहिती दिली असल्याचेही प्रकाश आवाडे यांनी सांगितलं. उमेदवारी संदर्भात कोणताही वेळ घालवायला नको. कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. राहुल आवाडे यांचं काम घरोघरी पोहोचवण्याचं काम सुरू असून कोणत्याही प्रकारे संभ्रमावस्था नको म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे प्रकाश आवाडे म्हणाले. त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांमध्ये उमेदवार निश्चित झाल्याचे चित्र आहे. आवाडे यांनी इचलकरंजीसह हातकणंगले आणि शिरोळमधून उमेदवार देण्याचे सुतोवाच केले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime: कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार, कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल
सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार, कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल
शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींचा एल्गार, 13 जिल्ह्यातील शेतकरी पंढरपुरात एकत्र येणार, आषाढीपूर्वी भव्य पायी सदबुध्दी यात्रा
शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींचा एल्गार, 13 जिल्ह्यातील शेतकरी पंढरपुरात एकत्र येणार, आषाढीपूर्वी भव्य पायी सदबुध्दी यात्रा
Kolhapur Crime: 'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं
'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Embed widget