एक्स्प्लोर

Kolhapur : विकास आराखडा तुमच्या बांधावरून नव्हे, आमच्या पोटातून जातोय; वडगावच्या नव्या आराखड्याला नागरिकांचा विरोध

Wadgaon Development Plan : कोल्हापुरातील वडगाव शहराच्या नव्या विकास आराखड्यात नेत्यांनी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी अल्प-भूधारक शेतकऱ्यांच्या पोटावर लाथ मारल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केलीय. 

कोल्हापूर: विकास आराखडा नेत्यांच्या बांधावरून जातो... आमच्या पोटातून जातो... अशी भावना कोल्हापूर जिल्ह्यातील वडगावच्या नागरिकांची आहे. शहराचा विकास आराखडा (Wadgaon Development Plan) सादर करण्यात आला आहे. मात्र त्यामध्ये बहुतांश त्रुटी राहिल्या असून या विकास आराखड्याला शहरवासियांनी कडाडून विरोध केला आहे. वडगावच्या माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या नेतृत्वाखाली आता नागरिकांनी या प्रश्नी लढा सुरू केला आहे. 

शहराच्या वाढीसाठी विकास आराखडा महत्वाचा आहे. पण त्यासाठी खापऱ्या फोडून देव कशाला करता? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. शासनाच्या विकास आराखड्यात अनेक त्रुटी असून त्या दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. शेकडो वर्षांपूर्वीचा मठ, शेकडो वर्षांपूर्वीचा दर्गा इतकंच नाही तर धरणग्रस्तांना मिळालेल्या जमिनी देखील या विकास आराखड्यामुळे उद्ध्वस्त होणार आहेत. 

ज्या पद्धतीने मठ, मंदिरं, जुने वाडे यांच्यावर आरक्षण टाकण्यात आलं आहे तसं बाजारपेठेतही घोळ झाला. नेत्यांनी आपला व्यवसाय वगळून इतर दुकानदारांना फटका बसेल असा आराखडा बनवल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला. 

चुकीच्या पद्धतीन रस्ते दाखवले

वडगावचे नगरसेवक गुरूप्रसाद यादव यावर बोलताना म्हणाले की, "गावाचा विकास व्हावा यासाठी विकास आराखडा बनवण्यात येतोय. पण वडगावचा विकास आराखडा हा त्याच्या मूलभूत संकल्पनेलाच अपवाद ठरतोय की काय अशी परिस्थिती आहे. विकास आराखड्यामध्ये पडलेले आरक्षण, चुकीच्या पद्धतीने अनावश्यक दाखवलेले रस्ते, एवढंच नव्हे तर धार्मिक स्थळांवरतीही रस्ते दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होतोय की काय अशी परिस्थिती आहे. आराखडा बनवताना तो सर्वसमावेशक असावा, पण या आराखड्यावरून तसं वाटत नाही."

वडगाव वाढीसाठी जो आराखडा करण्यात आला आहे त्यात नेत्यांनी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी अल्प-भूधारक शेतकऱ्यांच्या पोटावर लाथ मारल्याची भावना व्यक्त करण्यात येतीय. इतकंच नाही तर धरणग्रस्त नागरिकांच्या जमिनीही उद्धवस्त करण्याचा घाट घातल्याचा आरोप होत आहे.

संसार वाचवणं गरजेचं: विद्याताई पोळ 

या सगळ्याबाबत सत्ताधारी असलेल्या नेत्यांवर टीका होत आहे. सत्तेत असलेल्या एका माजी नगराध्यक्षानी आराखड्यात चूक असल्याचे मान्य केले आहे. मात्र नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होत असताना राजकारण न करता अन्यायाविरोधात उभं राहीलं पाहिजे. राजकारण करण्यासाठी निवडणुका आहेत पण इथं संसार वाचवणं गरजेचं असल्याचं मत माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी व्यक्त केलं आहे.

विकास आराखड्यामध्ये दुरुस्ती करावी आणि राज्य सरकारने त्याकडे लक्ष द्यावं अशी मागणी वडगावच्या नागरिकांची आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात आणि महायुतीच्या कार्यकाळात देखील हे निदर्शनास आणून दिले, मात्र यावर तोडगा निघत नाही. त्यामुळे नागरिकांना आक्रमक होण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशारा देण्यात आला आहे.

ही बातमी वाचा: 

VIDEO : विकास आराखडा नेत्यांच्या बांधावरून नाही, आमच्या पोटातून जातो, वडगावकरांचा विरोध

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
... म्हणून जरांगे पाटलांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी गेलो नाही; उदय सामंतांनी सांगितलं विखे पाटलाचं राज'कारण
... म्हणून जरांगे पाटलांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी गेलो नाही; उदय सामंतांनी सांगितलं विखे पाटलाचं राज'कारण'
गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुती मैदानात, कोल्हापुरात नेत्यांची बैठक, महायुती विरुद्ध सतेज पाटील सामना रंगणार
गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुती मैदानात, कोल्हापुरात नेत्यांची बैठक, महायुती विरुद्ध सतेज पाटील सामना रंगणार
Gokul Election: 'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
Embed widget