एक्स्प्लोर

Kolhapur Rain Update: राधानगरी धरण 50 टक्के भरले; कोल्हापूर जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची आस

राधानगरी धरणात गेल्या तीन दिवसात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील केवळ लघु क्षमतेचे दोन प्रकल्प भरले असून उर्वरित धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा होण्यासाठी अजून दमदार पावसाची अपेक्षा आहे.

Kolhapur Rain Update: धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसाने राधानगरी धरणात गेल्या तीन दिवसात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे धरण 50 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील प्रमुख 15 धरणापैकी केवळ लघु क्षमतेचे दोन प्रकल्प भरले असून उर्वरित धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा होण्यासाठी अजून दमदार पावसाची अपेक्षा आहे. कोल्हापूर शहरात पावसाची रिपरिप असली, तरी त्यामध्ये जोर नाही. त्यामुळे कोल्हापूर शहरातील रंकाळा तलाव तसेच पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव अजूनही तळाला आहे. गेल्यावर्षी मोसमात जवळपास भरलेल्या कळंबा तलावात यंदा फक्त 20 टक्के पाणीसाठा आहे.

धरण परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प 

गेल्यावर्षीच्या तुलनेत एक जूनपासून जिल्ह्यातील प्रमुख 15 धरण परिसरात सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळेच धरणातील  पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. वारणा धरण, आंबेओहोळ, जंगमहट्टी, चिकोत्रा या धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यंत नगण्य पाऊस झाला आहे. वारणा धरण परिसरात गेल्यावर्षी याच दिवसांमध्ये तब्बल 1059 मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, यंदा अवघ्या 346 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आंबेओहोळ प्रकल्प परिसरात अवघ्या 296 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

कोल्हापूर शहरातही पावसाचे प्रमाण कमी 

कोल्हापूर शहरात गेल्यावर्षी 457 मिमी पाऊस झाला होता. यंदा मात्र अवघ्या 141 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यामधील तलावामध्येही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. जिल्ह्यातील राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड आणि गगनबावडा तालुक्याचा अपवाद वगळल्यास कोल्हापूर शहर आणि आठ तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेतही पाऊस झालेला नाही. त्यामुळे केलेली पेरणी संकटात आली आहेच, पण पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या खरीपाच्या पेरण्याही पूर्ण झालेल्या नाहीत. सर्वाधिक बिकट परिस्थिती शिरोळ तालुक्यात आहे.  

काळम्मवाडी धरणता अवघा 20 टक्के पाणीसाठाक

कोल्हापूर शहरासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी थेट पाईपलाईन योजना काळम्मावाडी धरणातून करण्यात आली आहे. यासाठी 53 किमीची लाईन टाकण्यात आली आहे. धरणाची पातळी 613 मीटरवर गेल्यानंतर थेट पाईपलाई योजनेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलमध्ये पाणी आल्याने महत्वाचा टप्पा पार पडला आहे. मात्र, धरणात आजघडीला केवळ 20 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा व्हावा, यासाठी कोल्हापूरकरांचे डोळे धरणाकडे लागले आहेत. धरणाची पाणीक्षमता 25.39 टीएमसी असून आता फक्त 4.80 टीएमसीच्या आसपास पाणीसाठा झाला आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget