एक्स्प्लोर

Kolhapur Jain Morcha : कोल्हापुरातील जैन समाजाच्या मोर्चाने पोलिसांची तारांबळ; गर्दीचा अंदाज न आल्याने मुख्य मार्गांवर, शाहुपूरीत वाहतूक तुंबली!

कोल्हापुरात आज सम्मेद शिखरजी वाचवा, असा नारा देत हजारो जैन बांधवांनी (Kolhapur Jain Morcha) दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढला. मात्र गर्दीचा अंदाज न आल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.

Kolhapur Jain Morcha : जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या सम्मेद शिखरजी (Sammed ShiKharji) पर्यटनस्थळ घोषित झाल्याने देशभरातून दिवसागणिक विरोध वाढत चालला आहे. कोल्हापुरात आज सम्मेद शिखरजी वाचवा, असा नारा देत हजारो जैन बांधवांनी (Kolhapur Jain Morcha) दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढला. मात्र, या मोर्चाला किती लोक येतील याचा अंदाज न आल्याने पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. मोर्चासाठी झालेल्या अभूतपूर्व गर्दीने शाहुपूरीमधील वाहतूक अक्षरश: तुंबल्याचे दिसून आले. 

जैन समाज पहिल्यांदाच एकटवणार असल्याने कोल्हापूर पोलिसांना गर्दीचा अंदाज आला नाही. दुसरीकडे, श्रद्धेचा विषय असल्याने जैन समाजातील आबालांपासून वृद्धांपर्यंत उत्त्स्फूर्तपणे गर्दी दिसून आली. यामुळे काही हजारांमध्ये मोर्चा होईल, असा अंदाज असताना भव्य स्वरुपात मोर्चा निघाला. मोर्चासाठी निवडलेला मार्गही मोठा असल्याने वाहतूक व्यवस्थेवर विपरित परिणाम झाला. 

मोर्चा सुरु असताना शाहुपूरी तुंबली

मोर्चामधील सामील लोकांची गर्दी मोठी असल्याने नागरिकांनी अन्य पर्यायी मार्गाने जाण्याचा प्रयत्न केल्याने शाहुपूरी चांगलीच वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. वामन गेस्टच्या चौकात, तर रुग्णवाहिकेला मार्ग काढताना चांगलीच कसरत करावी लागली. सर्वच बाजूंनी वाहनांच्या रांगा आणि मिळेल्या त्या चिंचोळ्या मार्गातून जाणाऱ्या दुचाकी यामुळे वाहतूक तुंबल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. 

सम्मेद शिखरजी या धार्मिक स्थळाला पर्यटनस्थळाचा दिलेला दर्जा रुद्द करून धार्मिक स्थळाचा दर्जा द्यावा यासाठी कोल्हापुरात जैन बांधवानी मोठा मोर्चा काढला. हजारोंच्या संख्येने जैन बांधव रस्त्यावर उतरल्याने शहरातील मुख्य रस्ते ब्लॉक झाल्याचे दिसून आले. जैन समाजाच्या मोर्चाचे नेतृत्व स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी, स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी केले. 

दरम्यान, केंद्र सरकारच्या पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने पारसनाथ पर्वताला अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या पर्वताच्या आजूबाजूला संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले होते. वास्तविक पारसनाथ अभयारण्याचा एक भाग म्हणजे जैन धर्माचे पवित्र स्थळ आहे. तिथे आता हॉटेल व रिसॉर्ट सुरु करण्यास अनुमती दिली आहे. या निर्णयाने तीर्थक्षेत्रावर हॉटेल्स सुरु होतील, अशी भीती जैन धर्मीयांना आहे. सम्मेद शिखरजी (history of Sammed ShiKharji)  झारखंडमधील गिरडीह जिल्ह्यातील मधुबन भागात आहे. याला पारसनाथ पर्वत असेही म्हणतात. जैन धर्मात या पर्वताला विशेष महत्त्व आहे. जैन धर्माच्या अनुयायांच्या मते, येथे सुमारे 20 तीर्थंकरांना मोक्ष प्राप्त झाला. म्हणूनच श्री समेद शिखरजी जैन समाजाला अत्यंत पूजनीय आहे. समेद शिखरजी सुमारे 9 किलोमीटर परिसरात पसरलेले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Satish Bhosale House : 'खोक्या'च्या घरावर घाई, सुरेश धसांना वाटतेय घाई!Special Report Gold Silver Rate : तोळा होणार लाख मोलाचा, सोनं आणि चांदीच्या दराचा नवा उच्चांकSpecial Report Halal Vs Zatka : हलालविरुद्ध झटका, मल्हार सर्टिफिकेटला हिंदू खाटिकांचाच विरोधSpecial Report Aurangjeb Kabar : पून्हा बाबरीची धमकी, औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
Embed widget