Kolhapur Direct Pipeline: थेट पाईपलाईनमुळे कोल्हापूरकरांची स्वप्नपूर्तीकडे वाटचाल, काळ्ळमावाडी धरणात सतेज पाटलांकडून जलपूजन
Satej Patil : येत्या दोन महिन्यांत उर्वरित तांत्रिक कामे पूर्ण होताच योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन कोल्हापूरला कायमस्वरूपी स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणार असल्याचे आमदार सतेज पाटील म्हणाले.
![Kolhapur Direct Pipeline: थेट पाईपलाईनमुळे कोल्हापूरकरांची स्वप्नपूर्तीकडे वाटचाल, काळ्ळमावाडी धरणात सतेज पाटलांकडून जलपूजन kolhapur direct Pipeline moves towards fulfilment of drinking water Jalpujan by mla Satej Patil in Kallmawadi Dam Kolhapur Direct Pipeline: थेट पाईपलाईनमुळे कोल्हापूरकरांची स्वप्नपूर्तीकडे वाटचाल, काळ्ळमावाडी धरणात सतेज पाटलांकडून जलपूजन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/09/65e5e1b59e880f9a2f8da6a283c0e7961688897697956736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Satej Patil on Direct Pipeline: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आणि कोल्हापूरचे दीर्घकाळ स्वप्न असेल्या थेट पाईपलाईन (Direct Pipeline) योजनेमधील मैलाचा टप्पा पार झाला आहे. थेट पाईलपाईलन योजनेच्या जॅकवेलमध्ये पाणी पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील (Satej Patil), ऋतुराज पाटील, जयश्री जाधव यांनी मान्यवरांसह आज (9 जुलै) योजनेच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. थेट पाईपलाईन योजनेच्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर सतेज पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
योजनेच्या पूर्ततेमुळे आत्मिक समाधान
यावेळी कोल्हापूरला (Kolhapur Direct Pipeline) स्वच्छ आणि मुबलकपाणी पुरवठा करण्याचे माझे स्वप्न पूर्णत्वास येत असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. येत्या दोन महिन्यांत उर्वरित तांत्रिक कामे पूर्ण होताच योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन कोल्हापूरला कायमस्वरूपी स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार असल्याचे आमदार सतेज पाटील म्हणाले. योजनेच्या पूर्ततेमुळे आत्मिक समाधान लाभल्याचे त्यांनी सांगितले.
20 किमीपर्यंत पाईपमधून चाचणी
दुसरीकडे, जॅकवेलमध्ये पाणी पोहोचल्यानंतर 50 एचपीच्या दोन पंपातून पाणी उपसून 20 किमीपर्यंत पाईपमधून चाचणी घेण्यात आली आहे. इंटेक विहीर, इन्स्पेक्शन विहिरीचे तसेच तिथून जॅकवेलपर्यंतच्या पाईपलाईन टाकून पूर्ण झाल्यानंतर जॅकवेलपर्यंत पाणी येण्याची प्रतीक्षा होती. धरणातील पाणी 613 मीटरवर पोहोचल्यानंतर पाणी इंटेक विहिरीत आले होते. तेथून ते जॅकवेलपर्यंत पाईपलाईनमधून गेले. यामुळे या योजनेतील महत्वाचा टप्पा पार पडला होता.
भूमीगत वीजवाहिनी नेण्यास परवानगी
दुसरीकडे बिद्री साखर कारखान्याच्या आवारातून भूमीगत वीजवाहिनी नेण्याची परवानगी अध्यक्ष के. पी. पाटील व संचालक मंडळाने दिली आहे. त्यामुळे खोदाई सुरू करण्यात आली आहे. भूमिगत वाहिनी टाकण्याचे अंतर 4 किमी आहे. 23 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तसेच पंपिंग स्टेशनमधील पंप बसवण्याचे काम सुरू आहे. वीज वाहिनी टाकून झाल्यानंतर ते पंप सुरू होतील. पहिल्या 20 किमीची चाचणी झाल्याने आता पुढील पाईपची स्वच्छता केल्यानंतर महिनाअखेरपर्यंत पूर्ण योजनेची चाचणी घेतली जाऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर कोल्हापूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)