Vande Bharat Express In Kolhapur : कोल्हापूर, सांगलीसाठी अखेर वंदे भारत मिळाली; 16 सप्टेंबरपासून धावणार, कसं असेल वेळापत्रक?
Vande Bharat Express In Kolhapur : कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत 16 सप्टेंबरपासून धावणार आहे. गेल्या आठवडाभरापासून पुणे हुबळी वंदे भारतला प्रस्तावित कोल्हापूर थांबा झाल्यानंतर वाद वाढला होता.
![Vande Bharat Express In Kolhapur : कोल्हापूर, सांगलीसाठी अखेर वंदे भारत मिळाली; 16 सप्टेंबरपासून धावणार, कसं असेल वेळापत्रक? Kolhapur and sangli finally got Vande Bharat It will run from September 16 know the how will the schedule be Vande Bharat Express In Kolhapur : कोल्हापूर, सांगलीसाठी अखेर वंदे भारत मिळाली; 16 सप्टेंबरपासून धावणार, कसं असेल वेळापत्रक?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/13/9d4a5166c2262296b25bbd282ea0e6c21726226606351736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आणि प्रदीर्घ संघर्षानंतर कोल्हापूरकरांसाठी (Vande Bharat Express In Kolhapur) वंदे भारतची मागणी पूर्ण झाली आहे. कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत 16 सप्टेंबरपासून धावणार आहे. गेल्या आठवडाभरापासून पुणे हुबळी वंदे भारतला प्रस्तावित कोल्हापूर थांबा झाल्यानंतर वाद वाढला होता. त्यानंतर कोल्हापूर सांगलीसह कर्नाटकमधील लोकप्रतिनिधी तसेच प्रवासी संघटनांनी हस्तक्षेप केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून कोल्हापूर ते पुणे आणि हुबळी ते पुणे अशा दोन स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दिला. येत्या सोमवारपासून म्हणजेच 16 सप्टेंबरपासून वंद भारत धावणार आहेत.
असे असेल वेळापत्रक?
- कोल्हापूर ते पुणे वंदे भारत प्रत्येक मंगळवार, शनिवार व सोमवारी धावणार
- पुणे ते कोल्हापूर वंदे भारत प्रत्येक बुधवार, शुक्रवार व रविवारी धावणार
अशी धावणार कोल्हापूर-पुणे वंदे भारत
- कोल्हापूर ते पुणे वंदे भारत सकाळी सव्वा आठ वाजता कोल्हापुरातून निघेल.
- मिरजमध्ये 9 वाजता, सांगलीत सव्वा नऊ वाजता, किर्लोस्करवाडीत 9.42 मिनिटांनी कराडला 10.07, सातारा 10.47 आणि पुण्यात दीड वाजता पोहोचेल.
- पुण्यातून परतणारी गाडी दुपारी सव्वा दोन वाजता सुटेल. साताऱ्यात 4.37 कराड 5.25, किर्लोस्करवाडीत 5.50, सांगली 6.18, मिरजेत 6.40 तर कोल्हापुरात 7.40 ला पोहोचेल.
🍁💐🍁Major Update......
— Miraj Railway users (@Miraj_Jn_users) September 12, 2024
⚜️ Tr no 20669 #Hubli #Pune Vandebharat Express to be a Triweekly service (Wed, Fri & Sat).
⚜️ Tr no 20673 #Kolhapur #Pune Vandebharat Express to be a tri Weekly Service.
Train to halt at #Dharwad #Belagavi #Miraj #Sangli ##Kirloskarvadi #karad #Satara pic.twitter.com/F7KDnilG6j
हुबळी ते पुणे वंदे भारत कशी असेल?
- हुबळी ते पुणे वंदे भारत बुधवार, शुक्रवार व रविवारी पहाटे 5 वाजता सुटेल आणि दुपारी दीड वाजता पुण्यात पोहोचेल
- पुणे ते हुबळी गुरुवार, शनिवार व सोमवारी दुपारी सव्वा दोनला सुटेल रात्री 10.45 वाजता हुबळीत पोहोचेल.
- या गाडीला धारवाड , बेळगाव, मिरज ,सांगली, सातारा असे पाच थांबे आहेत.
मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेन
दरम्यान, रेल्वे कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी मुंबईला 7वी वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच मिळण्याची शक्यता आहे. मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेन चालवण्याची योजना सुरू आहे. सीएसएमटी-पुणे-सोलापूरनंतर पुण्याला जोडणारी ही मुंबईहून दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस असेल. यामुळे मुंबई, पुणे आणि कोल्हापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कनेक्टिव्हिटी वाढेल. मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार "सध्या मुंबई ते कोल्हापूर दरम्यानची वेगवान ट्रेन महालक्ष्मी एक्स्प्रेस आहे. जी सुमारे 10.30 तासांत अंतर कापते."
- मुंबईला मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गावर चालणारी सातवी वंदे भारत एक्स्प्रेस मिळणे अपेक्षित आहे.
- सीएसएमटी-पुणे-सोलापूर मार्गानंतर मुंबई आणि पुणे यांना जोडणारी ही दुसरी वंदे भारत ट्रेन असेल.
- नवीन ट्रेन कनेक्टिव्हिटी वाढवेल, ज्यामुळे मुंबई, पुणे आणि कोल्हापूर दरम्यानचा प्रवास जलद आणि अधिक सोयीस्कर होईल.
- सध्या, महालक्ष्मी एक्स्प्रेस ही मुंबई आणि कोल्हापूर दरम्यानची वेगवान ट्रेन आहे, जी 48.94 किमी/ताशी सरासरी वेगाने सुमारे 10.30 तासांत 518 किमी अंतर कापते.
- वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करणे अपेक्षित आहे.
- नवीन ट्रेनचे नेमके वेळापत्रक अद्याप ठरलेले नाही.
- पुणे-मिरज मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्याने जलद गाड्यांसाठी अधिक ट्रॅक उपलब्धता निर्माण झाली आहे.
- मध्य रेल्वे मुंबईतून पाच वंदे भारत गाड्या चालवणार असून, पश्चिम रेल्वे मुंबई-गुजरात मार्गावर दोन गाड्या सुरू ठेवणार आहे.
- महाराष्ट्रात लवकरच नागपूर-सिकंदराबाद आणि पुणे-हुबळी या आगामी मार्गांसह एकूण 11 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या असतील.
- वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांचा एक भाग आहे, जी जलद, अधिक आरामदायी आणि प्रगत प्रवास अनुभव प्रदान करते.
आणखी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पुणे-मिरज मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्यामुळे, आता जलद गाड्या चालवण्यास अधिक ट्रॅक उपलब्ध झाला आहे. यामुळे या मार्गावरील सध्याच्या सेवांच्या तुलनेत वेळेची लक्षणीय बचत होईल, यात शंका नाही." दरम्यान, मध्य रेल्वे मुंबईतून पाच वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवणार आहे, तर पश्चिम रेल्वे मुंबई आणि गुजरात दरम्यान दोन गाड्या चालवणार आहे. पश्चिम रेल्वेच्या सेवांमध्ये मुंबई सेंट्रल-गांधीनगर आणि मुंबई सेंट्रल-अहमदाबाद मार्गांचा समावेश आहे. नव्या वंदे भारत गाड्यांसह महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची संख्या 11 वर जाईल. ज्यामध्ये नागपूर आणि पुण्याच्या सध्याच्या सेवांचा समावेश आहे. याशिवाय नागपूर-सिकंदराबाद आणि पुणे-हुबळी असे आणखी दोन मार्ग लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)