एक्स्प्लोर

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचे थैमान; सोयाबीन, भात, भुईमूग पीके धोक्यात; गळीप हंगाम लांबण्याची शक्यता

कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या धुवाँधार पावसाने अनेकांची दाणादाण झाली. कोल्हापूर शहर परिसरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने हाता तोंडाला आलेली पिकांची नासाडी होण्याची भीती आहे

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या धुवाँधार पावसाने अनेकांची दाणादाण झाली. कोल्हापूर शहर परिसरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने हाता तोंडाला आलेल्लया पिकांची नासाडी होण्याची भीती आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी तब्बल चार तास पाऊस कोसळला. करवीर, हातकणंगले शाहूवाडी आणि गगनबावडा तालुक्यात पावसाने काल अक्षरश: थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे.

राधानगरी धरणात 231.46 दलघमी पाणीसाठा झाला आहे. धरणातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.  पंचगंगा नदीवरील इचलकरंजी, रुई व तेरवाड हे तीन बंधारे पाण्याखाली आहेत. यंदाच्या मोसमात कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थितीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली नव्हती. तसेच जून महिन्यातील अपवाद वगळल्यास पिकांसाठी पोषक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. तथापि, परतीच्या पावसाने मात्र आता रौद्ररुप धारण केल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे. 

परतीच्या पावसाने हाहाकार

जिल्ह्यात भात आणि सोयाबीन पिकांच्या मळणीने गेल्या 15 दिवसांपासून वेग घेतला असतानाच परतीच्या पावसाने हाहाकार सुरु केला आहे. त्यामुळे भात, सोयाबीन तसेच भूईमुग पिकांवर विपरित परिणाम झाला आहे. पावसाने शेतांना तळ्यांचे स्वरुप प्राप्त झाल्याने सोयाबीन आणि भूईमुगाला कोंब येण्याची भीती आहे. दुसरीकडे सोसाट्याच्या वाऱ्याने भात पीक शेतात झोपल्याने झडण्यासह  पाण्यात कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पोसावलेली पिके अशा पद्धतीने संकटात आल्याने बळीराजाचे दु:ख काही संपत नाही, अशी स्थिती आहे.    

शेतकरी पिके काढण्याच्या तयारीत असतानाच पावसाने खोडा घातला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीनची लागवड हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. दुसरीकडे करवीर, कागल तालुक्यात भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

सहाय्यक कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेत पाऊस पडल्याने धान्य आणि बियाणे यांची वाढ थांबते. गुणवत्ता ढासळते आणि शेतकर्‍यांना उत्पादनात नुकसान होते. लवकरात लवकर हाताला आलेल्या पिकांची कापणी करावी आणि कापणी केलेली पिके शेडमध्ये ठेवावीत, असा सल्ला आम्ही देत आहोत. कृषी विभागानेही शेतकऱ्यांना भुईमूग आणि भात काढणीचा सल्ला दिला आहे. 

ऊस गळीत हंगाम लांबण्याची शक्यता 

दुसरीकडे पावसाने हाहाकार केल्याने ऊस गळीत हंगाम सुद्धा लांबण्याची शक्यता आहे. राज्यात ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार असला, तरी परतीचा पाऊस थैमान घालत असल्याने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शिवारात पाणीच पाणी झाल्याने ऊस वाहतूक करताना मोठ्या संकटांना सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे. 

गेल्या 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस 

  • हातकणंगले-46.7  
  • शिरोळ-12.2 
  • पन्हाळा-47.3 
  • शाहूवाडी-38.8  
  • राधानगरी-20.5 
  • गगनबावडा-66.7 
  • करवीर-50 
  • कागल-20.2  
  • गडहिंग्लज-8.4 
  • भुदरगड-15.8 
  • आजरा-6.1 
  • चंदगड-2.6 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळ दूध संघाचा मोठा निर्णय, गाईच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ, मात्र, म्हशीचे दर जैसे थे, नवीन दर कधीपासून लागू?
गोकुळ दूध संघाचा मोठा निर्णय, गाईच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ, मात्र, म्हशीचे दर जैसे थे, नवीन दर कधीपासून लागू?
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Kolhapur Crime News: अल्पवयीन गर्लफ्रेंडने स्वत:चेच नको नको ते व्हिडीओ व्हायरल केले, बॉयफ्रेंडने फोन न उचलल्याने संतापली, कोल्हापूर हादरलं!
अल्पवयीन गर्लफ्रेंडने स्वत:चेच नको नको ते व्हिडीओ व्हायरल केले, बॉयफ्रेंडने फोन न उचलल्याने संतापली, कोल्हापूर हादरलं!
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget