![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shahu Samadhi Sthal : काँग्रेस आमदारांकडून शाहू स्मारकासाठी 9.6 कोटी रुपये देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील 9.6 कोटी रुपयांच्या निधीला दिलेली स्थगिती उठवावी व निधी लवकरात लवकर जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेस आमदारांनी केली आहे.
![Shahu Samadhi Sthal : काँग्रेस आमदारांकडून शाहू स्मारकासाठी 9.6 कोटी रुपये देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी Congress MLAs demand Chief Minister to pay Rs 9.6 crore for Shahu memorial Shahu Samadhi Sthal : काँग्रेस आमदारांकडून शाहू स्मारकासाठी 9.6 कोटी रुपये देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/21/da3153e6fd7d465acd512b81f3f79a64166633728719488_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shahu Samadhi Sthal : राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील 9.6 कोटी रुपयांच्या निधीला दिलेली स्थगिती उठवावी व निधी लवकरात लवकर जाहीर करावा, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आमदारांनी केली आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या अनेक कामांना शिंदे सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. त्यामध्ये अनेक वर्षांच्या विलंबानंतर निधी मंजूर झालेल्या शाहू समाधी स्थळाचा समावेश आहे.
काँग्रेस आमदार सतेज पाटील म्हणाले, "कोल्हापूर महापालिकेच्या (केएमसी) प्रयत्नातून हे स्मारक उभारण्यात आले आहे. आराखड्यात प्रस्तावित केलेल्या इतर कामांसाठी निधी तातडीने आवश्यक आहे. पुढील विलंब टाळण्यासाठी योजनेवर पुन्हा काम करणे आवश्यक आहे आणि पुन्हा एकदा सर्व प्रक्रियेतून जावे लागेल, जे वेळखाऊ आहे. आम्ही यावर्षी शाहू महाराजांचे स्मृतीशताब्दी साजरी करत आहोत आणि वर्ष संपण्यापूर्वी दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करणे ही शाहू महाराजांना श्रद्धांजली ठरेल.
दुसऱ्या टप्प्यात मंजूर झालेला निधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे नूतनीकरण, आर्ट गॅलरी उभारणे, दृकश्राव्य यंत्रणा उभारणे, कंपाउंड वॉल बांधणे, पार्किंग आणि स्वच्छता सुविधा यासाठी वापरण्यात येणार आहे.
सुमारे एक दशकांपूर्वी, शाहू महाराजांशी संबंधित कागदपत्रांचा अभ्यास करणारे इतिहासकार इंद्रजित सावंत यांना असे आढळले की, त्यांचे स्मारक नर्सरी बाग परिसरात बांधले जावे, जिथे राजघराण्यातील त्यांच्या पूर्वसुरींची स्मारके बांधली गेली होती, अशी शाहू महाराजांची इच्छा होती. त्यानुसार केएमसीने पुढाकार घेऊन पहिल्या टप्प्यात जमीन संपादित केली आणि स्मारक बांधले, ज्याला हजारो लोक, शाहू महाराजांचे अनुयायी, सरकारी शिष्टमंडळे आदी भेट देतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)