एक्स्प्लोर

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात गोवंश जनावरांचा बाजार व जनावरांची वाहतूक करण्यास सशर्त परवानगी

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 9 सप्टेंबर 2022 रोजीचे निर्बंध शिथील करून जिल्ह्यात कोणताही प्राणी बाजार भरवणे तसेच जिल्ह्यांतर्गत गुरांची वाहतुक व ने-आण करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. 

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात गोवंश पशुधनाचा बाजार व वाहतूक सशर्त परवानगी देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोवंशीय पशुधनास लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून 29 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाचा आढावा घेतल्यानंतर नियंत्रित क्षेत्रात कोणताही प्राणी बाजार भरविणे आणि प्राण्यांच्या शर्यती लावण्यास परवानगी देऊ शकतात, असे नमूद केले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 9 सप्टेंबर 2022 रोजीचे निर्बंध शिथील करून जिल्ह्यात कोणताही प्राणी बाजार भरवणे तसेच जिल्ह्यांतर्गत गुरांची वाहतुक व ने-आण करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. 

केंद्र सरकारच्या  मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यांतर्गत वाहतुक व ने-आण करावयाच्या गुरांचे (गोवर्गीय प्रजातींचे सर्व जनावे) किमान 28 दिवसांपूर्वी लम्पी चर्मरोगाचे प्रतिबंधात्मक लसीकरण प्रमाणपत्र तसेच लम्पी चर्मरोगाची लक्षण दिसून आली नसलेबाबत आरोग्य प्रमाणपत्र बंधनकारक राहील. वाहतूक करणाऱ्या गुरांची ओळख पठविण्यासाठी कानात 12 अंकी टॅग असणे व त्याची (INAPH) पोर्टलवर नोंदणी बंधनकारक आहे. जिल्ह्यातील पशुबाजारामध्ये खरेदी व विक्री करतांना (कृषि उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत व इतर क्षेत्रे) प्राण्याचे कानात टॅग व स्वास्थ्य प्रमाणपत्र बंधनकारक आहे. तसेच बाजारामध्ये जंतुनाशक फवारणीही बाजार समितीस किंवा आयोजकास बंधनकारक राहील. या आदेशाचे अंमलबजावणी सर्व संबंधित प्रशासकिय विभागांनी काटेकोरपणे करावी, असे निर्देश या आदेशान्वये जिल्हाधिकारी  रेखावार यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

दरम्यान, लम्पी जिल्ह्यासह राज्यात शेकडो जनावरे दगावली आहेत. लम्पी आजारामुळे पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई जाहीर केली. त्यानुसार काहींना ही नुकसानभरपाई मिळाली. पण अद्याप अनेक पशुपालक शेतकरी वंचित आहेत. मृत झालेल्या जनावरांची भरपाई द्या, अशी आर्त हाक पशूपालक शेतकरी देत आहेत. दुसरीकडे, लम्पी आजाराने दगावलेल्या जनावरांच्या मालकांचे कर्ज माफ करावे, अथवा त्यापोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात यावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत केली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Ayushmann Khurrana T-20 World Cup :   टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur School Opening : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना संघ मुख्यालयाची सफरABP Majha Headlines :  1:00PM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPratap Sarnaik vs Jitendra Awhad : जिथे रेव्ह पार्ट्या सुरु आहेत तिथे कारवाई झालीच पाहिजेAnil Deshmukh on Samruddhi Accident : समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात, अहवाल कधी येणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Ayushmann Khurrana T-20 World Cup :   टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
T20 World cup: विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या 11 खेळाडुंचं अभिनंदन करण्याऐवजी BCCIचे खजिनदार आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव; विरोधकांचा सभात्याग
टीम इंडियाच्या खेळाडुंचं अभिनंदन करण्याऐवजी सभागृहात आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडल्याचा आरोप, विरोधकांचा सभात्याग
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
Embed widget