एक्स्प्लोर

Sharad Pawar on Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराज 'स्वराज्यरक्षक'च, त्यांनी स्वराज्यावरील अनेक हल्ले परतावून लावले; शरद पवारांची स्पष्ट भूमिका

छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक म्हणण्यात काहीही चुकीचे नाही. संभाजी महाराज यांनी स्वराज्यावर आलेले अनेक हल्ले परतवून लावले आहेत, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.

Sharad Pawar on Sambhaji Maharaj : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी विधानसभेत छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक संबोधल्यानंतर राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. अजित पवारांविरोधात राज्यभर आंदोलन करत भाजपने संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होतेच, पण ते धर्मवीरही होते असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात भूमिका स्पष्ट केली. 

पवार यांनी (Sharad Pawar on Sambhaji Maharaj) छत्रपती संभाजी महाराज 'स्वराज्यरक्षक'च असल्याचे सांगितले, ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणून यामध्ये काहीही चुकीचे नाही. संभाजी महाराज यांनी स्वराज्यावर आलेले अनेक हल्ले परतवून लावले आहेत. दुसरीकडे अजित पवार यांनीही आपल्या भूमिकेवर ठाम राहताना स्वराज्यरक्षक असल्याचे पुनरुच्चार केला आहे. पुण्यात स्वराज्यरक्षक स्टिकर्सही राष्ट्रवादीकडून वाटली होती. दुसरीकडे भाजपने धर्मवीर स्टिकर्स लावून आंदोलन केले होते. 

शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत कुस्तीला लागलेलं डोपिंगचे ग्रहण, सीमाप्रश्न, राज्यपालांची बेताल वक्तव्ये, शिवसेनेवर होत असलेली टीका, राहुल गांधी, भारत जोडो यात्रा आदी मुद्यावरून त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, सीमाप्रश्नावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होईल. त्यावेळी आपली बाजू योग्य पध्दतीने मांडावी अशी मागणी करण्यात आली असून दिल्लीतही  याबाबत बैठक झाली. 

शिवसेनेला शिल्लक सेना म्हणणाऱ्यांना निवडणुकीत त्याचा प्रत्यय येईल. मी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात फिरलो आहे, फिरत आहे, कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याचेही पवार म्हणाले. कुस्तीमध्ये होत असलेल्या डोपिंगवर ते म्हणाले की, कुस्तीच्या बाबतीत असं झालं असेल याची माहिती नाही. आतापर्यंत असं कधी झालं नाही, पोलिसांनी तपास केला असेल तर त्याची माहिती घेऊ.

सत्ता हातात आली की जमिनीला पाय ठेवून वागायचं असतं, पण आता सत्ता आल्यानंतर असं वागत नाहीत. काही नेत्यांनी टोकाची भूमिका घेतली हे योग्य नाही, असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना पवार यांनी राज्यपालांना टोला लगावला.  राज्यपाल इथं नाखूष असतील, तर आम्ही देखील त्यांच्याबद्दल नाखूष आहोत. पहिले राज्यपाल आहेत ज्यांच्यावर सातत्याने टीका होते, जनता टीका करते. 

दरम्यान, बिहारमध्ये सुरु असलेल्या जातीय जणगणनेवरून स्वागत केले. जातीआधारीत जनगणनेची मागणी आम्ही देखील अनेक वर्षांपासून केली आहे, लहान लहान घटक आहेत त्यांची मोजमाप व्हावीत. नितीशकुमार यांनी घेतलेल्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. 

राहुल गांधी यांच्या संदर्भात काही पक्षांनी टीका टिंगलटवाळणी केली गेली. राहुल गांधी यांनी एका पक्षापुरते आपला कार्यक्रम ठेवला नाही, त्यामुळे त्यामध्ये सर्वसामान्य, विविध पक्षाचे कार्यकर्ते नेते त्याच्या सोबत सहभागी झाल्याचे दिसून आलं. राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा फायदा होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
Embed widget