एक्स्प्लोर

Radhakrishna Vikhe Patil : भुजबळांनी राजीनामा द्यावा, आज लोकं आदराने बोलतायत, उद्या थेट..; राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोलले

Radhakrishna Vikhe Patil : भुजबळ यांनी राजीनामा दिला पाहिजे, नाहीतर त्यांच्याबाबत वेगळी भूमिका घेण्याबाबत सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे : राधाकृष्ण विखे पाटील

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून मागील काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) थेट आपली भूमिका मांडत आहे. त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा नवा वाद निर्माण होत असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, यावरूनच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी थेट भुजबळ यांच्यावर निशाणा साधत त्यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आज लोकं त्यांना आदराने बोलतायत, उद्या त्यांच्यावर कारवाईची मागणी करतील असेही विखे म्हणाले. कोल्हापूर दौऱ्यावर असतांना विखे यांनी माध्यमांशी बोलतांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

दरम्यान यावेळी बोलतांना विखे पाटील म्हणाले की,"ओबीसीचा मुद्दापुढे करून आंदोलन सुरू आहे, पण याची गरजच नव्हती. विनाकारण दोन समाजामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा सुरू असलेला वाद निरर्थक आहे. छगन भुजबळ यांनी संयम पाळण्याची गरज आहे. आज त्यांच्याबद्दल लोकं आदराने बोलत आहेत, नंतर मात्र त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करावी लागेल. भुजबळ यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर येऊन बोलले पाहिजे. अन्यथा सरकारमध्ये एक वाच्यता नाही असा मेसेज जातो. तसेच, सरकार बाबतची विश्वासार्हता कमी होते," असे विखे म्हणाले.

भुजबळांनी राजीनामा द्यावा

तर भुजबळ यांनी राजीनामा दिला पाहिजे, नाहीतर त्यांच्याबाबत वेगळी भूमिका घेण्याबाबत सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे. त्यांच्याकडून अशी अपेक्षा अजिबात नाही. मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवरती शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणतेही आरक्षण कमी न करता आपण मराठा समाजासाठी आरक्षण द्यायला हवे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. असे असतांना भुजबळ यांना वेगळी भूमिका घेण्याची गरज नसल्याचे देखील विखे म्हणाले आहेत. 

विनाकारण राईचा पर्वत भुजबळ साहेब का करत आहे?

छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य करणे दुर्दैवी आहे. मराठा समाज आपलं अधिकार असल्याने, मराठा आरक्षण मागत आहे. सरकार त्याबाबत सकारात्मक विचार करत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारने आधीच स्पष्ट केला आहे की, कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे विनाकारण राईचा पर्वत भुजबळ साहेब का करत आहे? माहीत नाही. भुजबळ साहेबांनी आपली मुक्तफळे थांबवली पाहिजे. ज्या गोष्टीत तथ्य नाही किंवा आधार नाही अशा गोष्टी काही लोक करत असतात, असेही विखे म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Manoj Jarange : अत्यंत चाणाक्षपणे आंदोलन हाताळणारे मनोज जरांगे 'लायकी'वरून बॅकफूटवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget