एक्स्प्लोर

तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा

Chandrakant Patil Kolhapur Speech : महायुतीत एकत्र असल्यामुळे आम्ही एकमेकांवर टीका करायचं नाही असं ठरवलं आहे, पण मुश्रीफांनी जर टीका केलीच मी कशी टीका करतो हे माहिती आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

कोल्हापूर : राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू दे, तिजोरीचा मालक आपल्याकडे आहे असं वक्तव्य भाजपचे मंत्री चंद्रकात पाटील (Chandrakant Patil)  यांनी केलं. तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका असंही ते म्हणाले. गडहिंग्लजमधील प्रचारसभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं.

राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत, कुणाला निधी द्यायचा आणि कुणाला नाही हे आपल्या हाती असल्याचं वक्तव्य नुकतंच राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केलं होतं. त्यावरुन आता चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.

Chandrakant Patil Speech : तिजोरीचा मालक आमच्याकडे

राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा देतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की,"विरोधक म्हणतील की त्यांच्या हाती राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या असल्या तरी त्या तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येत नाही, आणि जर का ती उघडली तर त्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे."

विरोधकांकडे एक मंत्री असले तर आम्ही इकडे दोन मंत्री आहोत. आम्ही महायुतीत असल्यामुळे एकमेकांवर टीका करायचे नाही असं ठरवलं आहे. आतापर्यंत हसन मुश्रीफ यांनी आपल्यावर टीका केली नाही. पण त्यांनी टीका केली तर मी कशी टीका करतो हे तुम्हाला माहिती आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Ajit Pawar On Fund : अजित पवार काय म्हणाले होते?

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी धाराशिवमध्ये गेलेल्या अजितदादांनी निधीसंबंधी एक वक्तव्य केलं होतं. माझ्या हातात राज्य सरकारची तिजोरी आहे. माझ्या घड्याळाच्या पाठीशी उभा राहिलात तर बातमीसारखा विकास तुमच्याकडे करू शकतो. अर्थमंत्री म्हणून याकडे बारकाईने लक्ष देईन असं अजित पवार म्हणाले होते.

अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. दादांच्या हाती राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असल्याचं राष्ट्रवादीचे नेते सांगू लागले. त्यावरच चंद्रकांत पाटलांनी आता वक्तव्य केलं आहे.

आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांनी बारामतीत केलेल्या वक्तव्यावरुनही चर्चा झाली. विरोधात उभा राहून निवडून आलेल्या उमेदवाराला नंतर निधी मिळाला नाही तर काय? असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. तुम्ही काट मारली तर मीही काट मारणार, असं वक्तव्यही अजित पवारांनी या भाषणात निधीच्या मुद्द्यावरून केलं होतं. त्यावेळी निधीवरून बोलताना दादांनी केलेल्या वक्तव्याचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला.

ही बातमी वाचा:

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

... म्हणून जरांगे पाटलांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी गेलो नाही; उदय सामंतांनी सांगितलं विखे पाटलाचं राज'कारण
... म्हणून जरांगे पाटलांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी गेलो नाही; उदय सामंतांनी सांगितलं विखे पाटलाचं राज'कारण'
गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुती मैदानात, कोल्हापुरात नेत्यांची बैठक, महायुती विरुद्ध सतेज पाटील सामना रंगणार
गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुती मैदानात, कोल्हापुरात नेत्यांची बैठक, महायुती विरुद्ध सतेज पाटील सामना रंगणार
Gokul Election: 'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
Pravin Tarde On Petrol Diesel Prices: शेतकऱ्यांच्या पेट्रोल पंपाबाहेर रांगा, प्रवीण तरडेंची पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरावर प्रतिक्रिया, म्हणाले ..
शेतकऱ्यांच्या पेट्रोल पंपाबाहेर रांगा, प्रवीण तरडेंची पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरावर प्रतिक्रिया, म्हणाले ..

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Embed widget