एक्स्प्लोर

Ajit Pawar : "कोल्हापूरच्या ढाण्या वाघाला एक दोन विभाग देऊन बाजूला ठेवलंय, स्वत: 6-6 खाती घेतली; तळतळाट लागेल तुम्हाला"

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत आज विदर्भातील विकासाच्या मुद्यावरून, राज्यातून बाहेर गेलेले प्रकल्प तसेच रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे फडणवीस सरकारची चांगलीच कानउघडणी केली.

Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar on Cabinet Expansion) यांनी विधानसभेत आज विदर्भातील विकासाच्या मुद्यावरून, राज्यातून बाहेर गेलेले प्रकल्प तसेच रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे फडणवीस सरकारची चांगलीच कानउघडणी केली. यावेळी बोलताना सत्ताधाऱ्यांना चांगलेच शालजोडे लगावले. मंत्रिमंडळ विस्तारासाठी एकदाच काय तो दिल्लीला फोन करा आणि तुम्हाला कोणाला घ्यायचं आहे त्याला घ्या आणि मंत्रिमंडळ विस्तार करा, असा टोला त्यांनी लगावला. मंत्रिमंडळ विस्तारावरून आणि स्वत:कडे सर्वाधिक खाती ठेवण्यावरून अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना शालजोडे लगावले. यावेळी सभागृहात चांगलाच हशा पिकला. अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना बाजूला करण्यावरूनही फडणवीसांना चिमटे काढले.  

अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून बोलताना अनेक शालजोडे लगावले. तसेच मंत्रिमंडळात महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने त्यांनी तोफ डागली. अजित पवार म्हणाले की, सहकार मंत्र्यांकडे  काम आणल्यास देवेंद्रजींना विचारतो म्हणतात, पण त्यांच्याकडे सहा खात्यांचा कारभार आहे आणि भार कशासाठी टाकता? त्यांच्याकडे सहा पालकमंत्रीपद आहेत. ते कतृत्ववान आहेत, पण सहा पालकमंत्री नेमल्यास जास्त काम होणार नाही का? आपण महिलांबाबत बोलत असता, पण सहा महिन्यात एक महिला मंत्री करण्यासाठी सापडली नाही का? मी आता वहिंनींना (अमृता फडणवीस) जरा बघा यांच्याकडे म्हणून. त्यांनी सांगितल्यास लगेच होऊन जाईल. 

अक्षरश: तळतळाट लागेल तुम्हाला!

अजित पवार म्हणाले, भाजपमधील अनेक मंत्री देवेंद्रजींना विचारलं पाहिजे म्हणतात, शिंदे गटातील मंत्र्यांचा सवतासुभा असतो, त्यांना काही अडचण नाही, पण हे सगळ करत असताना आपल्या राज्यात ही पद्धत नव्हती. प्रत्येक कामासाठी आपल्याकडे जायला लागणं हे बरोबर नाही. आपल्या दोघांचे, तर चांगलं चाललं आहे. देवेंद्रजींना विचारलं की, मुख्यमंत्र्यांची संमती आणा आणि त्यांना विचारलं की ते म्हणतात देवेंद्रजींनी म्हटल्यास मी केलं. ही टोलवाटोलवी सुरु आहे. दादा तुमची मला इतकी कधी कधी आठवण येते. तुमच्यासारखी व्यक्ती असती, तर अशी टोलवाटोलवी केली नसती. कोल्हापूरच्या ढाण्या वाघाला केवळ एक दोन साधी विभाग देऊन बाजूला ठेवलं आहेय आणि स्वत: महत्वाची सहा सहा विभाग घेतले आणि या पद्धतीचे राजकारण करता? बरोबर अक्षरश: तळतळाट लागेल तुम्हाला. 

ते पुढे म्हणाले की, आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि 18 मंत्री सभागृहात आहेत, पण एकही महिला मंत्री नाही ही किती नामुष्की आहे, हा महिलांचा अपमान आहे. रात्री लावा फोन दिल्लीला आणि उद्या करा मंत्रिमंडळ विस्तार. पहिल्यांदा आपण दोघांनी चालवलं, नंतर वाढवले, पण अजून 22-23 लोक घेता येतात. ज्यांना कोणाला संधी द्यायची त्याला द्या, पण एक दोन विभाग द्या, पण विस्तार करा.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: 'ज्या दिवशी गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी मी गुलाल लावून उत्तर देईन...' हसन मुश्रीफांचे आरोपांच्या फैरी झाडलेल्या आमदार शिवाजी पाटलांना ओपन चॅलेंज
Video: 'ज्या दिवशी गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी मी गुलाल लावून उत्तर देईन...' हसन मुश्रीफांचे आरोपांच्या फैरी झाडलेल्या आमदार शिवाजी पाटलांना ओपन चॅलेंज
Gokul Election: 'गोकुळ'वर प्रशासक अटळ! विद्यमान संचालक मंडळाच्या मुदतवाढीला कोल्हापूर सर्किट बेंचचा स्पष्ट नकार, निवडणूकही लांबणीवर जाणार
'गोकुळ'वर प्रशासक अटळ! विद्यमान संचालक मंडळाच्या मुदतवाढीला कोल्हापूर सर्किट बेंचचा स्पष्ट नकार, निवडणूकही लांबणीवर जाणार
Kolhapur Crime News: जामिनावर सुटताच नराधमाचं भयानक कृत्य, महिलेला धर्मांतरासाठी दबाव अन् जिवे मारण्याची धमकी; कोल्हापुरातील संतापजनक घटना
जामिनावर सुटताच नराधमाचं भयानक कृत्य, महिलेला धर्मांतरासाठी दबाव अन् जिवे मारण्याची धमकी; कोल्हापुरातील संतापजनक घटना
Gokul Election: 'गोकुळ'वर प्रशासक लागणार, वाढीव सभासदांची चौकशी केली जाणार; आमदार शिवाजी पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काय काय म्हणाले?
'गोकुळ'वर प्रशासक लागणार, वाढीव सभासदांची चौकशी केली जाणार; आमदार शिवाजी पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काय काय म्हणाले?

व्हिडीओ

New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?
Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
Rajasthan Royals New Owner : आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, लक्ष्मी मित्तल बनले नवे मालक, किती पैसे खर्च केले?
आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, किती कोटींना झाली डील?
Vinesh Phogat Brij Bhushan Singh: 'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
Embed widget