एक्स्प्लोर

मोठी बातमी! रावसाहेब दानवेंच्या विरोधात काँग्रेसचा 'हा' नेता मैदानात उतरणार?; 2009 मध्ये आठ हजारांनी झाला होता पराभव

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसकडून कल्याण काळे याना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर काळेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Lok Sabha Election 2024 : जालना लोकसभा मतदारसंघातून (Jalna Lok Sabha Constituency) पुन्हा एकदा म्हणजेच सहाव्यांदा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता दानवे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) कोण उमेदवार असणार अशी चर्चा सुरु आहे. अशात माजी आमदार तथा काँग्रेसचे नेते कल्याण काळे (Kalyan Kale) यांना महाविकास आघाडीतून काँग्रेस (Congress) पक्षाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मुंबई दौऱ्यानंतर काळेंच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे 2009 मध्ये देखील कल्याण काळे यांनी दानवे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती आणि त्यांचा 8 हजार 482 मतांनी पराभव झाला होता. 

जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे असा सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. काँग्रेसकडून कल्याण काळे याना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर काळेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 2009 ला काळे विरुद्ध दानवे अशी लढत पाहायला मिळाली होती. ज्यात रावसाहेब दानवे यांना 3 लाख 50 हजार 710 मते म्हणजेच 44 टक्के मतदान झाले होते. तर, दुसरीकडे कल्याण काळे यांना 3 लाख 42 हजार 228 मते म्हणजेच 42 .93 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे 8 हजार 482 मतांनी काळे यांचा पराभव झाला होता.

(कल्याण काळे-Kalyan Kale)
मोठी बातमी! रावसाहेब दानवेंच्या विरोधात काँग्रेसचा 'हा' नेता मैदानात उतरणार?; 2009 मध्ये आठ हजारांनी झाला होता पराभव

जालना लोकसभा मतदारसंघ कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला...

1996 पासून जालना लोकसभा मतदारसंघ 2019 पर्यंत म्हणजेच सलग सातवेळा भाजपच्या ताब्यात राहिला आहे. 1996 ते 1999 पर्यंत उत्तमसिंह पवार दोनदा भाजपच्या तिकीटावर जालन्यातून खासदार झाले. तर, 1999 पासून आतापर्यंत पाच वेळा रावसाहेब दानवे सलग भाजपकडून निवडून आले आहेत. त्यामुळे जालना आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. मात्र, कधीकाळी हाच जालना लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. कारण 1977 ते 1980 चा काळ सोडल्यास 1957 ते 1989 पर्यंत सलग हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. मात्र, 1996 साली उत्तमसिंह पवार यांनी भाजपकडे हा मतदारसंघ खेचून आणला आणि तेव्हापासून काँग्रेसला जालन्यात एकदाही लोकसभा निवडणूक जिंकता आली नाही. 

मागील निवडणुकीचा निकाल काय होता? 

मागील लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिल्यास रावसाहेब दानवे यांच्याविरोधात काँग्रेसचे विलास औताडे रिंगणात होते. यावेळी रावसाहेब दानवे यांना एकूण 6 लाख 98 हजार 019 मतदान मिळाले होते, तर विलास औताडे यांना 3 लाख 65 हजार 204 मते मिळाली होती. त्यामुळे दानवे यांचा 3 लाख 32 हजार 815 मतांनी विजय मिळाला होता. परंतु, यंदा काँग्रेसकडून पुन्हा एकदा कल्याण काळे यांच्या नावाचा विचार केला जात असून, त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Raosaheb Danve : ग्रामपंचायत सदस्य ते सहाव्यांदा लोकसभेची उमेदवारी; कोण आहेत रावसाहेब दानवे?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special ReportBhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special ReportMumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special ReportAjit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.