एक्स्प्लोर

अब्दुल सत्तारांचं वक्तव्य म्हणजे सरकारमधील नेत्यांना किती माज आलाय, याचं ज्वलंत उदाहरण; राजू शेट्टी कडाडले

Raju Shetti on Abdul Sattar: अब्दुल सत्तारांचं शेतकऱ्यांसंदर्भातील वक्तव्य म्हणजे, सरकारमधील नेत्यांना किती माज आलाय, याचं ज्वलंत उदाहरण असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

Raju Shetti on Abdul Sattar: कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात, असं वक्तव्य कृषीमंत्र्यांनी केलं होतं. त्यावरुन संपूर्ण राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनीही सत्तारांवर निशाणा साधला आहे. अब्दुल सत्तारांचं वक्तव्य सरकारमधील नेत्यांना किती माज आलाय, याचं ज्वलंत उदाहरण असल्याचं राजू शेट्टी म्हणाले आहेत. तसेच, आकडेवारीनुसार एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्याचा दावाही राजू शेट्टी यांनी केला आहे. 

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, "अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य सरकारमधील मंत्र्यांना किती माज आलाय, याचं ज्वलंत उदाहरण असून आकडेवारीनुसार सर्वाधिक आत्महत्या एकनाथ शिंदेच्याच सरकारमध्ये होत आहेत." तसेच, सवंग लोकप्रियेसाठी आणि अनावश्यक योजनांसाठी सरकारी तिजोरीतील पैसे उधळले जात असून शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप देखील शेट्टी यांनी केला आहे. जालन्यातील परतूर येथे स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं शेतकरी परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला. 

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या 'या' वक्तव्यावरुन वाद

कृषीमंत्री अब्दुल सत्तार गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंबाबतही अब्दुल सत्तारांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर आता शेतकऱ्यांबाबत बोलतानाही अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. सत्तारांनी केलेलं वक्तव्य असंवेदनशील असल्याची प्रतिक्रिया राज्यभरातून समोर येत आहे. 

शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात, असं वादग्रस्त वक्तव्य सत्तार यांनी केलं होतं. त्याचसोबत, आपल्या मतदारसंघात पाहणी केली, मात्र शेतीचं फार नुकसान झालेलं नसल्याचंही सत्तार यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यांमुळे अब्दुल सत्तार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाल्याचे आकडे समोर आले आहेत. सत्तार यांच्या मतदारसंघात एका आठवड्यात तीन आत्महत्या झाल्यात तर त्यांच्या जिल्ह्यात आठवड्याभरात सहा आत्महत्या झाल्या आहेत. 

दरम्यान, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या तालुक्याला अवकाळी पावसाच्या नुकसानीतून वगळण्यात आलं आहे. संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यात शून्य टक्के नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. अशा सगळ्या परिस्थितीत कृषिमंत्री असलेल्या सत्तार यांनी शेतकरी आत्महत्येबाबत केलेल्या वक्तव्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
कालच रुग्णालयातून डिस्चार्ज, आज पुन्हा मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचार सुरु, नेमका त्रास काय? 
कालच रुग्णालयातून डिस्चार्ज, आज पुन्हा मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचार सुरु, नेमका त्रास काय? 
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget