एक्स्प्लोर

Jalgaon News : तापी नदीत पोहण्याचा मोह जीवावर बेतला, तीन चुलतभावांचा मृत्यू, कुटुंबांवर दुःखाचा डोंगर 

Jalgaon News : रामेश्वर तीर्थक्षेत्रावर (Rameshwer) काढण्यात आलेल्या कावड यात्रेनंतर पोहण्याचा मोह तीन तरुणांच्या जीवावर बेतला आहे.

जळगाव : श्रावण सोमवार (Shraani Somwar) निमित्त जळगाव जिल्ह्यातील रामेश्वर तीर्थक्षेत्रावर (Rameshwer) काढण्यात आलेल्या कावड यात्रेनंतर पोहण्याचा मोह तीन तरुणांच्या जीवावर बेतला आहे. कावड यात्रेत सहभागी होण्यापूर्वी नदीत अंघोळीसाठी गेलेले तीन तरुण तापी नदीमध्ये वाहून गेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. एकाच वेळी शिंपी कुटुंबियातील तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

पियुष रवींद्र शिंपी, सागर अनिल शिंपी, अक्षय प्रवीण शिंपी अशी या तिघांची नावे आहेत. एकाच वेळी शिंपी कुटुंबियातील तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. एरंडोल (Erandol) येथील भगवा चौकातील काही तरुण कावड यात्रा घेऊन आले होते. सोमवारी पहाटे तीन वाजता भगव्या चौकापासून वाजत गाजत रामेश्वर येथे कावड यात्रेला निघाली. ही यात्रा रामेश्वर येथे दोन वाजेच्या सुमारास पोचली. तेथे तरुणांनी रामेश्वर मंदिरात दर्शन घेतले.  सर्व पूजा अर्चा झाली. त्यानंतर पियुष, सागर आणि अक्षय हे तिघेही पोहण्यासाठी तापी नदीपात्रात उतरले. त्यावेळी एकजण वाहून जात असल्याचे इतर दोघांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र यात तिघेही पाण्याच्या प्रवाहात (Drowned) वाहून गेले. 

यावेळी नदी काठावर असलेल्या काही जणांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत ते तिघेही वाहून गेले होते. गावातील सराईत पोहणाऱ्या तरुणांनी नदीमध्ये जाऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तिघेजण बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, जळगावचे (Jalgaon) तहसीलदार नामदेव पाटील, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक अप्पासाहेब पवार त्यांचे सहकारी घटनास्थळी रवाना झाले. यासोबतच धुळ्यातील एसडीआरएफचे पथक देखील दाखल झाले. तिघांचा शोध सुरू असताना संध्याकाळी पाच वाजेदरम्यान त्रिवेणी संगमानजीक एका तरुणाचा मृतदेह सापडला. त्यानंतर त्याच्या काही अंतरावर दुसरा मृत्यू सापडला. तर आज सकाळी तिसरा मृतदेह पथकाच्या हाती लागला आहे.

कुटुंबांवर दुःखाचा डोंगर 

अक्षय हा बारावीनंतर आयटीआय झाला होता. गेल्या सात वर्षापासून तो स्वतःच्या दुकान भावासोबत सांभाळतो.  पियूष शिंपी हा देखील बारावीनंतर आयटीआय झाला होता. वडिलांच्या व्यवसायात हातभार लावत होता. हे तिघेही तरुण भाऊबंद असून अविवाहित आहेत. या घटनेची माहिती मिळताच एरंडोल परिसरातील दुकानदारांनी स्वयं स्फूर्तीने दुकाने बंद केली. जवळपास सात आठ वर्षांपासून एरंडोल येथून रामेश्वरला कावड यात्रा नेली जाते. मात्र हीच कावड यात्रा घेऊन जात असताना तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने शिंपी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

इतर महत्वाची बातमी : 

चंद्रपूरमध्ये सेल्फीच्या नादात 4 जण बुडाले तर मालाडमध्ये तीन जणांचा बूडून मृत्यू 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिकच्या माघारीवर जळगावचा तिढा अडकला, गिते-हिरेंचं बंड शमवण्यासाठी महायुतीची धावपळ; भाजपच्या संकटमोचकांना यश मिळणार?
नाशिकच्या माघारीवर जळगावचा तिढा अडकला, गिते-हिरेंचं बंड शमवण्यासाठी महायुतीची धावपळ; भाजपच्या संकटमोचकांना यश मिळणार?
विधान परिषदेच्या निवडणुकांचं मतदान गुक्त न ठेवता हात वर करुन घेतल्या पाहिजेत, जयंत पाटलांचं वक्तव्य 
विधान परिषदेच्या निवडणुकांचं मतदान गुक्त न ठेवता हात वर करुन घेतल्या पाहिजेत, जयंत पाटलांचं वक्तव्य 
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
Jalgaon : भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत महिला, वर्षभराच्या चिमुरडीसह चौघांचा जागीच मृत्यू, लस्सी प्यायला जाताना काळाचा घाला; जळगावमध्ये भीषण अपघात
भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत महिला, वर्षभराच्या चिमुरडीसह चौघांचा जागीच मृत्यू, लस्सी प्यायला जाताना काळाचा घाला; जळगावमध्ये भीषण अपघात

व्हिडीओ

Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report
Nashik Vidhan Parishad : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम | Special Report
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: 'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
Cockroach Janata Party: काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
India vs Afghanistan: भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
Embed widget