एक्स्प्लोर

Aaditya Thackeray on Rahul Narwekar : पक्षाची स्थापना केली त्यांचाच संबंध राहिला नाही, पक्ष पळवला त्यांना मालकी दिली; राहुल नार्वेकरांच्या निकालावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aaditya Thackeray on Rahul Narwekar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच आहे. शिवाय, अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांतील आमदार पात्र आहेत, असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. यावर आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Aaditya Thackeray on Rahul Narwekar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच आहे. शिवाय, अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांतील आमदार पात्र आहेत, असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. यावर आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्यांनी पक्ष स्थापन केला आता त्यांचा पक्षाशी काही संबंध राहिला नाही. मात्र ज्यांनी पक्ष पळवला ,त्यांच्या मालकीचा पक्ष करण्याचा निर्णय अध्यक्षांनी दिला आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. ते जळगाव येथे बोलत होते. 

काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

राहुल नार्वेकरांच्या निर्णयाबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, ज्या पद्धतीचा निकाल अपेक्षित होता अगदी तसाच निर्णय अध्यक्षांनी दिला आहे. आपल्या वेळेला सुद्धा त्यांनी असाच निर्णय दिलाय. शिवसेनेबाबत जो घोळ झाला किंवा घोळ केला गेला तसाच घोळ राष्ट्रवादीबाबत केला गेला आहे. अध्यक्ष ट्रायबल म्हणून काम करत असताना पक्षपात करू शकतात हे धक्कादायक आहे. आपल्या देशात लोकशाही नाही आहे हे जगात सांगायला आता काही हरकत नाही, असा उपरोधित टोलाही ठाकरेंनी लगावला. 

महाराष्ट्र याला उत्तर देईल

महाराष्ट्राची जशी लूट केली जात आहे,तसे पक्ष पण लुटले जात आहेत. शरद पवार हे जिद्दीने लढत आहेत त्यांनी शून्यातून सर्व घडवलं व राष्ट्रवादी उभी केली त्यानंतर असं होणं चुकीचं आहे. शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे यांनी आपले पक्ष वाढवले आणि दोघांसोबत जे घडलंय त्याला महाराष्ट्रात उत्तर देईल, असे आदित्य ठाकरेंनी नमूद केले. 

महाराष्ट्राच्या पदरी काय पडतय?

2022 मध्ये शिवसेना 2023 मध्ये राष्ट्रवादी 2024 मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न आहे. एवढे सर्व करुन पण महाराष्ट्राच्या पदरी काय पडतय? महाराष्ट्रासाठी सरकारने काय केले? नुसते आकडे वाढवायचे आणि एवढे सर्व बहुमत करुन पण आकडे तर दिसत नाहीत. एवढे सर्व पक्ष फोडून पण  चारशे पार होत नाहीत मग निवडणुकीत चारशे पार कसे करणार? असा सवालही आदित्य ठाकरेंनी केलाय. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी  संविधानाचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आहे. हिंदूह्रदय सम्राट  बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना फोडण्याचे पाप विधानसभा अध्यक्षांनी केलं तेच पाप राष्ट्रवादी काँग्रेस ज्या शरद पवारांनी घडवली ते फोडण्याचे पाप आज केलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

NCP Crisis: शरद पवार गटाने १० व्या परिशिष्टाचा गैरवापर करु नये, आमदारांना धमकावू नका; विधानसभा अध्यक्षांनी खडसावले

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात, जळगावमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात, जळगावमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
Eknath Khadse and Girish Mahajan: एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार का? 'त्या' निमंत्रणावर गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...
एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार का? 'त्या' निमंत्रणावर गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Eknath Khadse and Girish Mahajan: एकनाथ खडसेंच्या पीएची गिरीश महाजनांच्या घरी जाऊन हात जोडून विनंती, मान डोलवत म्हणाले...
एकनाथ खडसेंच्या पीएची गिरीश महाजनांच्या घरी जाऊन हात जोडून विनंती, मान डोलवत म्हणाले...

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : ''जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget