एक्स्प्लोर

पहिला स्वातंत्र्यदिन साजरा होताना महात्मा गांधी का उपस्थित नव्हते? ते कुठे होते?

Independence Day History : यंदा देशात 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. पण पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असताना महात्मा गांधी मात्र त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. 

नवी दिल्ली : या वर्षी भारत आपला 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अनेक क्रांतिकारी फासावर चढले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वात मोठी भूमिका बजावली ती राष्ट्रपिता महात्मा गांधींनी. पण ज्यावेळी पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला जात होता त्यावेळी मात्र गांधीजी उपस्थित नव्हते. मग ते नेमके कुठे होते? महात्मा गांधी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी दिल्लीमध्ये उपस्थित का नव्हते? याची माहिती आपण घेऊयात. 

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला अधिकृतपणे स्वातंत्र्य मिळाले. देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे दोन मोठे नेते म्हणजे महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू. स्वातंत्र्याच्या वेळी जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी महात्मा गांधींना पत्र पाठवून त्यांना स्वातंत्र्यदिनी आशीर्वाद देण्याची विनंती केली होती. पण महात्मा गांधींनी पत्राला उत्तर देताना आपण कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही असं सांगितलं होतं. 

महात्मा गांधींचे पत्र

नेहरू आणि पटेल यांच्या पत्राला उत्तर देताना महात्मा गांधी म्हणाले होते की, देशात जातीय दंगली होत असताना अशा परिस्थितीत आपण स्वातंत्र्य उत्सवात कसे सहभागी होऊ शकतो? 14-15 ऑगस्ट 1947 च्या रात्री जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारतातील पहिले भाषण देत होते, तेव्हा फार कमी लोकांना माहित होते की महात्मा गांधींनी कोणत्याही कार्यक्रमात येण्यास नकार दिला होता. कारण भारत-पाकिस्तान फाळणीच्या शोकांतिकेने त्यांना हादरवून सोडलं होतं.

त्यावेळी महात्मा गांधींनी आपल्या पत्रात म्हटलं होतं की, 15 ऑगस्टला मी आनंदी होऊ शकत नाही. मी तुम्हाला फसवू इच्छित नाही, परंतु त्याच वेळी मी असे म्हणणार नाही की तुम्ही देखील उत्सव साजरा करू नका. दुर्दैवाने आज आपल्याला ज्या प्रकारे स्वातंत्र्य मिळाले आहे त्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भविष्यातील संघर्षाची बीजेही आहेत. अशा स्थितीत आपण स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी दिवे कसे लावणार? माझ्यासाठी स्वातंत्र्याच्या घोषणेपेक्षा हिंदू आणि मुस्लिमांमधील शांतता महत्त्वाची आहे.

स्वातंत्र्याच्या वेळी महात्मा गांधी कुठे होते?

आता प्रश्न असा आहे की स्वातंत्र्याच्या वेळी महात्मा गांधी कुठे होते. सरकारी कागदपत्रांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, स्वातंत्र्याच्या वेळी गांधीजी बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोलकात्यात गेले होते. बंगालमध्ये हिंदू-मुस्लिम यांच्यात वर्षभराहून अधिक काळ संघर्ष सुरू होता. महात्मा गांधी नौखाली (जे आता बांगलादेशात आहे) येथे जाण्यासाठी 9 ऑगस्ट 1947 रोजी कलकत्त्याला पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी मुस्लिम वसाहतीतील हैदरी मंझिलमध्ये मुक्काम केला आणि बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि रक्तपात थांबवण्यासाठी उपोषण सुरू केले. 13 ऑगस्ट 1947 रोजी त्यांनी लोकांना भेटून शांततेसाठी प्रयत्न सुरू केले. स्वातंत्र्याच्या काही आठवडे आधी बिहार आणि नंतर बंगालला जाण्याचा त्यांचा बेत होता.

ही बातमी वाचा:

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ED Raid on I-PAC: बंगालमध्ये निवडणूक तोंडावर येताच ईडी कामाला लागली; थेट तृणमूल काँग्रेसची स्ट्रॅटेजी बनवणाऱ्या फर्मवर धाड, स्वत: ममता दीदी पोहोचल्या
बंगालमध्ये निवडणूक तोंडावर येताच ईडी कामाला लागली; थेट तृणमूल काँग्रेसची स्ट्रॅटेजी बनवणाऱ्या फर्मवर धाड, स्वत: ममता दीदी पोहोचल्या
Gold Silver Rate : दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
US Russia Sanctions Bill: तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी
तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी
Latur Mahanagarpalika Eknath Shinde Shivsena: तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ED Raid on I-PAC: बंगालमध्ये निवडणूक तोंडावर येताच ईडी कामाला लागली; थेट तृणमूल काँग्रेसची स्ट्रॅटेजी बनवणाऱ्या फर्मवर धाड, स्वत: ममता दीदी पोहोचल्या
बंगालमध्ये निवडणूक तोंडावर येताच ईडी कामाला लागली; थेट तृणमूल काँग्रेसची स्ट्रॅटेजी बनवणाऱ्या फर्मवर धाड, स्वत: ममता दीदी पोहोचल्या
Gold Silver Rate : दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
US Russia Sanctions Bill: तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी
तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी
Latur Mahanagarpalika Eknath Shinde Shivsena: तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
मोठी बातमी! नव्याने निवडून आलेल्या 11 नगरसेवकांचा अख्खा गटच भाजपात, काँग्रेसला 'दे धक्का'
मोठी बातमी! नव्याने निवडून आलेल्या 11 नगरसेवकांचा अख्खा गटच भाजपात, काँग्रेसला 'दे धक्का'
सुप्रीम कोर्टात उमर खालिद, शरजील इमामला जामीन नाकारला, JNU मध्ये मोदी शाहांविरुद्ध नारेबाजी, एफआयआर दाखल; विद्यार्थ्यांची ओळख पटली
सुप्रीम कोर्टात उमर खालिद, शरजील इमामला जामीन नाकारला, JNU मध्ये मोदी शाहांविरुद्ध नारेबाजी, एफआयआर दाखल; विद्यार्थ्यांची ओळख पटली
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Embed widget