एक्स्प्लोर

काय आहे विशेष राज्य दर्जा?

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन टीडीपीच्या खासदारांनी गाजवलं. आता बिहारने विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे.

मुंबई : राज्याला विशेष दर्जा देण्याच्या मुद्द्यावरुन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन टीडीपीच्या खासदारांनी गाजवलं. आता बिहारने विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जरी अजूनपर्यंत या मागणीवर जोर दिला नसला, तरी त्यांच्यावर ही मागणी केंद्राकडे करण्यासाठी दबाव आहे. यानंतर सर्वांनाच प्रश्न पडला असेल, की विशेष राज्याचा दर्जा काय आहे, ज्यामुळे एवढं राजकारण तापत आहे. विशेष राज्याचा दर्जा कसा मिळतो? विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी संविधानात कोणतीही तरतूद नाही. मात्र देशातील काही भाग इतर राज्यांच्या तुलनेत मागासलेले होते. केंद्राकडून योजनांच्या माध्यमातून अनुदान दिलं जायचं. मात्र मागासलेल्या राज्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं मोठं आव्हान होतं. तेव्हाचा योजना आयोग आणि विकास परिषदेने काही राज्य इतर राज्यांच्या तुलनेत मागासलेले असल्याचं लक्षात घेत कलम 371 नुसार विशेष अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 1969 साली राष्ट्रीय विकास परिषदेने डीआर गाडगीळ समितीच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला. लोकसंख्येची घनता, आदिवासी बहुल भाग, डोंगरी आणि आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असणारा दुर्गम भाग, प्रति व्यक्ती उत्पन्न आणि राज्याला मिळणाऱ्या महसुलाच्या निकषावर विशेष दर्जा देण्यासाठी काही राज्यांची निवड करण्यात आली. विशेष राज्याचा दर्जा मिळण्याचे फायदे केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीमध्ये विशेष राज्यांना इतर राज्यांच्या तुलनेत अनेक फायदे मिळतात. विशेष राज्यांना केंद्राकडून 90 टक्के अनुदान, तर 10 टक्के निधी कर्जाच्या रुपाने मिळतो. तर सामान्य राज्यांना आर्थिक पॅकेजमध्ये 70 टक्के कर्ज आणि 30 टक्के अनुदान मिळतं. म्हणजेच विशेष दर्जा असलेल्या राज्यांना किती तर पटींनी अधिक फायदा होतो. याशिवाय विशेष दर्जा असणाऱ्या राज्यांना अनेक फायदे आहेत. केंद्राच्या विविध करांमध्ये विशेष सूट मिळते, ज्यामुळे या राज्यांमध्ये उद्योग येतात आणि त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात. परिणामी राज्याच्या विकासाला मोठा हातभार लागतो. केंद्राकडून मोठा निधी मिळाल्यामुळे या राज्यांमध्ये कराच्या रुपाने मिळणारा महसूल इतर योजनांसाठी वापरला जाऊ शकतो. या राज्यांना सर्वात अगोदर दर्जा विशेष राज्याचा दर्जा सर्वात अगोदर 1969 साली देण्यात आला होता. यावेळी पाचव्या वित्तीय आयोगाने मागसवर्गीय राज्यांना केंद्राकडून विशेष मदत देण्याचा निर्णय घेतला. सर्वात अगोदर आसाम, नागालँड आणि जम्मू-काश्मीर या राज्यांना विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला. एकूण अकरा राज्यांना विशेष दर्जा आसाम, नागालँड आणि जम्मू-काश्मीर या राज्यांना विशेष राज्यांचा दर्जा मिळाल्यानंतर ठराविक कालखंडानंतर इतर राज्यांचाही या श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला. मेघालय, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, मणिपूर, सिक्कीम, त्रिपुरा, मिझोराम आणि 2001 साली उत्तराखंडलाही विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला. 2001 नंतर कोणत्याही राज्याचा या यादीत समावेश झालेला नाही. या राज्यांची विशेष दर्जाची मागणी आंध्र प्रदेश आणि बिहार हे दोनच राज्य असे नाहीत, ज्यांची विशेष दर्जाची मागणी आहे. ओदिशा, राजस्थान, छत्तीसगड आणि गोव्याचीही विशेष राज्याचा दर्जा देण्याची जुनी मागणी आहे. आंध्र प्रदेशची मागणी कोणत्या मुद्द्यावर? आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्य वेगळं झाल्यानंतर महसूल कमी झाल्याचं कारण पुढे करत आंध्र प्रदेशने विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्यसभेतील चर्चेदरम्यान तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आंध्र प्रदेशला पुढील पाच वर्षांसाठी हा दर्जा देण्यात येईल, असं तोंडी सांगितलं होतं. त्यानंतर आंध्र प्रदेशकडून ही मागणी सातत्याने लावून धरण्यात आली. सरकारचं म्हणणं काय? सध्या कोणत्याही राज्याला विशेष दर्जा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं होतं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मध्यपूर्वेतील परिस्थिती बिघडली! भारतीयांनी इराण सोडावं, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतीय दूतावासाच्या सूचना
मध्यपूर्वेतील परिस्थिती बिघडली! भारतीयांनी इराण सोडावं, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतीय दूतावासाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 एप्रिल 2026 | गुरुवार
टीएमसी-भाजप कार्यकर्त्यांच्या हिंसक चकमकी ते उमेदवारालाच पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात मतदानाचा विक्रम; तमिळनाडूमध्ये इतिहासातील सर्वाधिक मतदानाची नोंद
टीएमसी-भाजप कार्यकर्त्यांच्या हिंसक चकमकी ते उमेदवारालाच पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात मतदानाचा विक्रम; तमिळनाडूमध्ये इतिहासातील सर्वाधिक मतदानाची नोंद
बारावीत टॉपर, IIT मधून इंजिनिअरिंग आणि आता IAS ची तयारी; IRS अधिकाऱ्याच्या एकुलत्या एक लेकीचा कामावरून काढलेल्या व्यसनी नोकराकडून भयावह शेवट, स्वप्नांचा चक्काचूर, नराधमाची दोन दिवसांत दोन सैतानी कृत्य
बारावीत टॉपर, IIT मधून इंजिनिअरिंग आणि आता IAS ची तयारी; IRS अधिकाऱ्याच्या एकुलत्या एक लेकीचा कामावरून काढलेल्या व्यसनी नोकराकडून भयावह शेवट, स्वप्नांचा चक्काचूर, नराधमाची दोन दिवसांत दोन सैतानी कृत्य

व्हिडीओ

Baramati Special Report : बारामतीचा सुभेदार, पवारांमध्येच वॉर? जय पवारांचं वक्तव्य चर्चेत
Sanjay Gaikwad Special Report : पुस्तकाबद्दल अज्ञान, गुंडगिरी बेभान,संजय गायकवाडांची जीभ घसरली
Jay Pawar on 2029 Vidhansabha Election: तुम्ही 2029 च्या निवडणुकीत युगेंद्र पवारांविरोधात लढणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगून टाकलं, म्हणाले...
Rohit Pawar and Jay Pawar : बारामतीत 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते
Mumbai Worli Traffic : मुंबईत ट्रॅफिकला ब्रेक, महिलेचा उद्रेक Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनीच्या मुंबईतील चाहत्यांना धक्का, वानखेडेवर धोनी खेळणार नाही, CSK मध्ये धोनीचं कमॅबक कधी? ऋतुराज गायकवाड काय म्हणाला?
महेंद्रसिंह धोनीच्या मुंबईतील चाहत्यांना धक्का, वानखेडेवर धोनी खेळणार नाही,कमॅबक कधी? ऋतुराज गायकवाड काय म्हणाला?
कल्याणमध्ये फर्निचर दुकानात शिरला महाकाय अजगर; पिशवीत घालून पकडला
कल्याणमध्ये फर्निचर दुकानात शिरला महाकाय अजगर; पिशवीत घालून पकडला
MI vs CSK : ऋतुराज गायकवाडच्या 'चेन्नई एक्सप्रेस' समोर मुंबई इंडियन्सचा पराभव, सॅमसनचं शतक आणि अकील हुसैनच्या चार विकेटनं मॅच फिरवली
'चेन्नई एक्सप्रेस' समोर मुंबई इंडियन्सचा पराभव, सॅमसनचं शतक आणि अकील हुसैनच्या चार विकेटनं मॅच फिरवली
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं पूर्ण नियंत्रण, जहाजांना आमची परवानगी घ्यावी लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या छोट्या बोटींवर हल्ले करा, ट्रम्प यांचे आदेश, इराणसोबतचा वाद चिघळणार? 
MI vs CSK : ना रोहित, ना धोनी... आयपीएल ‘एल क्लासिको’च्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं!
MI vs CSK : ना रोहित, ना धोनी... आयपीएल ‘एल क्लासिको’च्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं!
BLOG : मराठा बंधू आणि भगिनींना खुले पत्र...
BLOG : मराठा बंधू आणि भगिनींना खुले पत्र...
'कसिनो बाबा' पोलिसांच्या जाळ्यात; एका काळ्या जादूसाठी कोट्यवधींची फी, गोव्यात जाऊन करायचा पूजा
'कसिनो बाबा' पोलिसांच्या जाळ्यात; एका काळ्या जादूसाठी कोट्यवधींची फी, गोव्यात जाऊन करायचा पूजा
पवारांचा वारसदार कोण? बारामती विधानसभेसाठी तीन बंधू मैदानात, 2029 च्या निवडणुकांची आत्ताच चाहूल
पवारांचा वारसदार कोण? बारामती विधानसभेसाठी तीन बंधू मैदानात, 2029 च्या निवडणुकांची आत्ताच चाहूल
Embed widget