एक्स्प्लोर

मुर्शिदाबादमध्ये केंद्रीय सुरक्षा बल तैनात करा, हायकोर्टाचे निर्देश; हिंसाचाराच्या घटनेत 3 जणांचा मृत्यू

मुर्शिदाबाद येथील आंदोलन हिंसक झाले असून पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या आहेत. तर, सार्वजनिक संपत्तीचेही नुकसान करण्यात आले आहे

कोलकाता : केंद्र सरकारने वक्फ बोर्ड विधेयक (waqf board) संसदेत मंजूर करुन घेतल्याने आता देशभरात वक्फ जमिनींसंदर्भात नव्या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. देशाच्या संसदेत या कायद्यावर दोन्ही बाजुंनी चर्चा झाली. त्यावेळी, हा कायदा मुस्लिमांविरुद्ध असल्याचे मत मांडत काहींनी विधेयकास विरोध केला. मात्र, बहुमताच्या जोरावर हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे, आता या विधेयकावरुन रस्त्यावर उतरुन विरोध करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे वक्फ बोर्ड विधेयकास विरोध करत उभारलेल्या आंदोलनास हिंसक वळण लागलं आहे. येथील आंदोलनात आत्तापर्यत 3 जणांचा मृत्यू झाला असून अनेक ठिकाणी जाळपोळीची घटना घडली आहे. त्यामुळे, कोलकाता उच्च न्यायालयाकडून (Highcourt) CRPF ला तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

मुर्शिदाबाद येथील आंदोलन हिंसक झाले असून पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या आहेत. तर, सार्वजनिक संपत्तीचेही नुकसान करण्यात आले आहे. त्यामुळे, भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी शुक्रवारी ताततडीने कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन केंद्रीय सुरक्षा बदलास पाचारण करण्याची विनंती केली होती. अखेर, हायकोर्टाने ही याचिका मान्य करत, हिंसाचारग्रस्त भागात केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. जेव्हा अशा घटना घडतात, असे आरोप समोर येतात तेव्हा न्यायालय डोळे बंद करू शकत नाही. गरज भासल्यास केंद्रीय सुरक्षा बलास आणखी काही ठिकाणी तैनात करण्याचे आदेशही न्यायालय देईल, असे हायकोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे, आता लवकरच मुर्शिदाबादमधील हिंसाचारग्रस्त भागात केंद्रीय सुरक्षा बल तैनात होईल. 

मुर्शिदाबाद येथील हिंसाचाराच्या घटनेवरुन आता आरोप प्रत्यारोप होत आहेत. भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी आरोप केला आहे की, बीएसएफ हिंसाचाराच्या ठिकाणी वेळेत पोहोचले होते, पण जिल्हाधिकाऱ्यांनी हिंसाचाराची घटना थांबविण्यासाठी त्यांना मनाई केली. हिंसाचार प्रभावित शमशेरगंज परिसरात जाफराबाद येथील एका घरात वडील आणि मुलाचा मृतदेह आढळून आला आहे, ज्यांच्या शरीरावर चाकूने वार केल्याचा खुणा दिसत आहेत. तर, धुलियान येथेही एका व्यक्तीचा गोळी लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे, हिंसाचाराच्या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

केद्रीयमंत्र्यांचे राज्य सरकारवर आरोप

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवरही केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते सुकांत मुजूमदार यांनी गंभीर आरोप केले आहेत. शमशेरगंज, सुती आणि जंगीपुर येथे हिंदूंवर अत्याचार होत असताना राज्यातील ममता बॅनर्जी यांचं सरकार डोळे बंद करुन बसले आहे. हिंसाचारग्रस्त परिसरात, तणावग्रस्त भागात शांतता राखण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कडक भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

हेही वाचा

सावधान! मुंबई विद्यापीठाच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरुन प्रवेशाचे आवाहन; तक्रार येताच सायबर विभागाचे आवाहन

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget