एक्स्प्लोर

यूपीत योगींचा गड हादरण्यामागचं नेमकं कारण काय?

भाजपला उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीत धक्का बसला आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड मानला जाणाऱ्या गोरखपूर मतदारसंघात समाजवादी पक्षाने जोरदार मुसंडी मारत भाजपच्या उमेदवाराचा धुव्वा उडवला. तर उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचे वर्चस्व असलेल्या फूलपूर मतदारसंघातही भाजपच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला.

नवी दिल्ली : तब्बल 30 वर्षांनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड गोरखपूरमध्ये भाजपचा पराभव झाला. योगी आदित्यनाथ सलग पाच वेळा गोरखपूरचे खासदार राहिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या योगींचाच गड भाजपच्या हातून कसा गेला, हा मोठा प्रश्न आहे. योगींचा गड हादरण्यामागचं पहिलं कारण समाजवादी पक्षाने निषाद समाजाचे प्रवीण निषाद यांना उमेदवारी दिली. गोरखपूरमध्ये निषाद समाजाचे सर्वाधिक म्हणजे साडे तीन लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. यादव आणि दलितांची संख्या दोन लाख आहे. तर गोरखपूरमध्ये दीड लाख ब्राम्हण मतदार आहेत. त्यामुळे प्रवीण निषाद यांना मुस्लीम, दलित आणि यादव समाजाची मतं मिळाल्यानंतर मोठा उलटफेर होऊ शकतो, असा अंदाज अगोदरच लावला जात होता. योगींचा गड हादरण्यामागचं दुसरं कारण गोरखपूरच्या शहरी भागात कमी प्रमाणात मतदान झालं. गोरखपूरमध्ये एकूण 47.45 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याचाच अर्थ गोरखपूरचे शहरी मतदार योगी आदित्यनाथ यांच्या उमेदावाराला मतदान करण्यासाठी घराच्या बाहेरच पडले नाही. योगींचा गड हादरण्यामागचं तिसरं कारण सपा आणि बसपाची युती हे गोरखपूरमधील भाजपच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण आहे. मायावती यांनी अखिलेश यादव यांना समर्थन देत बसपाचा उमेदवार दिला नाही. योगींचा गड हादरण्यामागचं चौथं कारण योगी आदित्यनाथ सलग पाच वेळा गोरखपूरचे खासदार राहिले आहेत. त्यांच्यापूर्वी महंत अवैद्यनाथ हे देखील याच मतदारसंघातून खासदार होते. दोघेही गोरक्षनाथ पीठाशी संबंधित आहेत. या पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच गोरक्षपीठाच्या बाहेरच्या व्यक्तीला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं. परिणामी हिंदू मतदारांचं मतपरिवर्तन झालं आणि मतं सपाला गेली. गोरखपूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास योगी आदित्यनाथ यांच्यापूर्वी गोरक्षनाथ पीठाचे महंत अवैद्यनाथ 1970 साली अपक्ष खासदार म्हणून लोकसभेवर गेले. 1989 साली अवैद्यनाथ हिंदू महासभेचे खासदार म्हणून निवडून आले. यानंतर 1991 आणि 1996 साली त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. 1998 सालापासून ते 2014 पर्यंत सलग पाच वेळा योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमधून विजय मिळवला. संबंधित बातम्या :

‘अतिआत्मविश्वास नडला’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर योगींची प्रतिक्रिया

यूपीत भाजपला धक्का, पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव

महत्त्वाच्या बातम्या

UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget