एक्स्प्लोर

UNSC Meet: भारताच्या भीतीनं पाकिस्ताननं ठोठावला संयुक्त राष्ट्रसंघाचा दरवाजा, पण पाकड्यांचा कांगावा फेल, बंद दाराआडच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

UNSC Meet: पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार म्हणाले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. या बैठकीत पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न सोडवण्यावरही चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

UNSC Meet: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam terror attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) बंद दाराआड बैठक घेतली. पाकिस्तानच्या विनंतीनंतर झालेल्या या बैठकीचा कोणताही ठोस निकाल लागला नसल्याची माहिती आहे. काल (सोमवारी) दुपारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दीड तासांच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानला लाजिरवाण्या भूमिकेचा सामना करावा लागला. या बैठकीनंतर, संयुक्त राष्ट्रांनी कोणतेही अधिकृत निवेदन जारी केले नाही किंवा कोणताही ठराव मंजूर झाला नाही. (Pahalgam terror attack)

बैठकीदरम्यान, संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत असीम इफ्तिखार यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. या बैठकीत पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न सोडवण्यावरही चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ही बैठक संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर झाली, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती अलिकडच्या काळात सर्वात वाईट पातळीवर पोहोचली आहे.

बैठकीत पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधींनी काय म्हटलं?

या बैठकीत पाकिस्तानने सतत खोटी विधाने केली. भारताने सिंधू नदी करार स्थगित करण्याच्या हालचाली बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. यामुळे या प्रदेशातील शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. यावेळी त्यांनी प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेसाठी यामुळे गंभीर धोका निर्माण होत असल्याचा दावा करत काश्मीरला आंतरराष्ट्रीय वाद म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला. अटारी सीमा बंद करणे, राजनैतिक संबंध आणखी कमी करणे आणि दहशतवादाविरुद्ध भारताची कठोर आणि निर्णायक भूमिका यासारख्या भारताच्या कृतींमुळे या प्रदेशात अस्थिरता वाढत आहे, असं सगळं पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला पटवून देण्याचा प्रयत्न केला. या बैठकीनंतर असीम इफ्तिखार यांनी दावा केला की, त्यांच्या मागणीनुसार UNSC ची बैठक आयोजित होणे हा त्यांचा राजनैतिक विजय आहे.

पाकिस्तान हा संयुक्त राष्ट्रांचा अस्थायी सदस्य आहे आणि त्याने सध्याच्या परिस्थितीबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला या विषयावर चर्चा करण्याची विनंती केली होती. 15 सदस्यीय UNSC चे अध्यक्षपद मे महिन्यासाठी ग्रीककडे आहे आणि 5 मे रोजी पाकिस्तानसोबत बैठकीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. पाकिस्तानच्या कृती पाहून भारतानेही कडक भूमिका घेतली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तान वगळता सुरक्षा परिषदेच्या जवळजवळ सर्व सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आहे. जयशंकर यांनी ग्रीक परराष्ट्र मंत्री जॉर्ज गेरापेट्रिस यांच्याशीही चर्चा केली. ग्रीसनेही पहलगाम हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आणि म्हटले की, "आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो." जयशंकर यांनी अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन, दक्षिण कोरिया, डेन्मार्क, अल्जेरिया, सिएरा लिओन, गयाना, स्लोव्हेनिया, सोमालिया आणि पनामा यासह अनेक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आहे. सुरक्षा परिषदेत सध्या पाच स्थायी सदस्य आहेत - अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीन - ज्यांना व्हेटो पॉवर आहे. याशिवाय, 10 तात्पुरते सदस्य देश आहेत, पाकिस्तान, ग्रीस, डेन्मार्क, अल्जेरिया, गयाना, पनामा, दक्षिण कोरिया, सिएरा लिओन, स्लोव्हेनिया आणि सोमालिया.
 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Elephant : अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
Samruddhi highway accident: समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला, अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला, अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
Amravati Crime News: भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Madhuri Elephant : अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
Samruddhi highway accident: समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला, अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला, अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
Amravati Crime News: भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
Embed widget