एक्स्प्लोर

तिहेरी तलाक दिल्यास तुरुंगवास, मंत्रिमंडळाकडून अध्यादेशाला मंजुरी

22 ऑगस्ट 2017 रोजी सुप्रीम कोर्टाने तीन तलाकला बेकायदेशीर आणि घटनाबाह्य ठरवले होते.

नवी दिल्ली : मुस्लीम महिलांना तीन तलाकच्या कचाट्यातून मुक्ती मिळवून देण्यासाठी मोदी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन तलाकच्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली. याआधी तीन तलाक संदर्भातील विधेयक लोकसभेत मंजूर झालं होतं, मात्र राज्यसभेत प्रलंबित होतं. आता केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन तलाकविरोधातील अध्यादेशाला मंजुरी दिल्याने, केवळ राष्ट्रपतींची स्वाक्षरी बाकी आहे. राष्ट्रापतींची स्वाक्षरी झाल्यावर तीन तलाकविरोधातील या अध्यादेशाचं रुपांतर कायद्यात होईल. संसदेत विधेयक मंजूर होईपर्यंत सहा महिने अध्यादेशाची अंमलबजावणी केली जाईल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसात तलाकसंदर्भातील जे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले, त्याच विधेयकाचं रुपांतार अध्यादेशात करण्यात आले आहे. याआधी सरकारने लोकसभेत विधेयक मांडून मंजूरही केले होते. मात्र राज्यसभेतील गोंधळामुळे विधेयक प्रलंबित आहे. आता पुढे काय होणार? एखादा कायदा बनवायचा झाल्यास दोन पद्धतीने बनवता येतो, एक तर लोकसभा आणि राज्यसभेत विधेयकाला मंजुरी मिळवून, किंवा दुसरं म्हणजे अध्यादेश जारी करुन. अध्यादेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होते. मात्र, सरकारसमोर अडचण अशीय की, अध्यादेश केवळ सहा महिन्यांसाठी मान्य केले जाते. सहा महिन्याच्या आत विधेयक संसदेत मंजूर करुन घ्यावे लागेल. म्हणजेच, आता पुन्हा एकदा लोकसभा आणि राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. घटनेच्या कलम-123 अन्वये ज्यावेळी संसदेचं अधिवेशन सुरु असेल, तेव्हा केंद्र सरकारच्या विनंतीनंतर राष्ट्रपती अध्यादेश जारी करु शकतात. मूळ कायद्यात 9 ऑगस्ट रोजी तीन बदल करण्यात आले होते : पहिला बदल – जर पती त्याच्या पत्नीला एकदाच तीन तलाक देत असेल आणि नातं पूर्णपणे संपवत असेल, तर त्यावेळी पीडित पत्नी, किंवा तिच्या रक्ताच्या आणि जवळच्या नात्यातील व्यक्तीच गुन्हा दाखल करु शकतात. यापूर्वी तलाक दिल्यानंतर पतीविरोधात कुठल्याच प्रकारे गुन्हा दाखल करता येत नव्हता. दुसरा बदल – पती-पत्नी तलाकनंतरही जर त्यांच्यातील वादावर समजुतीने मार्ग काढण्यास तयार असतील, तर पत्नीचे म्हणणे ऐकल्यानंतर मॅजिस्ट्रेटच्या अटींवर दोघांमधील वाद मिटू शकतं. त्याचबरोबर, पतीची जामिनावर सुटकाही होऊ शकते. यापूर्वी समजुतीने वाद मिटवणं आणि जामीन दिले जात नव्हते. तिसरा बदल – तलाक दिल्यानंतर पतीला तीन वर्षांसाठी तुरुंगवास भोगावा लागेल आणि अजामीनपात्र शिक्षा होईल, मात्र जामीन देण्याचा अधिकार मॅजिस्ट्रेटकडे असेल. यापूर्वी जामीन देण्याचा अधिकार मॅजिस्ट्रेटकडे नव्हता. 22 ऑगस्ट 2017 ला सुप्रीम कोर्टात काय झालं होतं? 22 ऑगस्ट 2017 रोजी सुप्रीम कोर्टाने तीन तलाकला बेकायदेशीर आणि घटनाबाह्य ठरवले होते. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठातील तीन न्यायमूर्तींनी तलाकला घटनाबाह्य ठरवले होते. सुप्रीम कोर्टाने सरकारला या प्रकरणावर कायदा बनवण्यास सांगितले होते. या खटल्याची सुनावणी करणारे पाचही न्यायमूर्ती वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधीत्व करतात.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

व्हायरल गर्ल मोनालिसाने बांधली लगीनगाठ; वडिलांचा विरोध, लेक पोलिसात
व्हायरल गर्ल मोनालिसाने बांधली लगीनगाठ; वडिलांचा विरोध, लेक पोलिसात
देशाची आर्थिक कोंडी! विश्वगुरु' असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या पंतप्रधानांचे मात्र मौन, महागाईवरुन कोल्हेंचा हल्लाबोल
देशाची आर्थिक कोंडी! विश्वगुरु' असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या पंतप्रधानांचे मात्र मौन, महागाईवरुन कोल्हेंचा हल्लाबोल
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
Meta Anti Scam Tools : व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि मेसेंजरवर फसवणूक रोखण्यासाठी मेटाचे नवे टूल्स लाँच
Meta Anti Scam Tools : व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि मेसेंजरवर फसवणूक रोखण्यासाठी मेटाचे नवे टूल्स लाँच

व्हिडीओ

Zero Hour : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सरकार हाताळतंय असं वाटतं का? ABP Majha
Navi Mumbai Hospital : नवी मुंबईत हॉस्पिटलमध्ये LPG चा तुटवडा, रुग्णांना जेवण पुरवणे अवघड
PM Kisan 22th Installment: 'पीएम किसान योजने'चा २२ वा हप्ता कधी मिळणार? तारीख आली समोर, सर्वाधिक लाभार्थी अहिल्यानगरचे
Devendra Fadnavis Vidhan Sabha : देशातील पहिली ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था महाराष्ट्रच होणार
Navi Mumbai Gas Issue : व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा, जगदंब हॉटेलकडून चुलीवरच जेवण सुरू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
IPL 2026 Schedule : मोठी बातमी, आयपीएलचं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
IPL चं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
Embed widget