एक्स्प्लोर

चेन्नईची तहान भागवण्यासाठी वेल्लोरहून रेल्वेने पाणी, 25 लाख लीटर पाण्याची वाहतूक

प्रत्येक वॅगनची 55 हजार लीटर पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे. यासाठी 65 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीसामी यांनी दिली.

चेन्नई : पाणीटंचाईमुळे तहानलेल्या चेन्नईकरांसाठी चक्क रेल्वेनं पाणी आलं आहे. 217 किलोमीटर दूर असलेल्या वेल्लोर जिल्ह्यातून आलेलं पाणी स्वच्छ करुन नागरिकांना पुरवलं जाईल. 50 वॅगन असलेल्या ट्रेनमधून तब्बल 25 लाख लीटर पाणी चेन्नईत आणण्यात आलं. यापूर्वी लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. ट्रेनमध्ये पाणी भरण्यास गुरुवारी रात्री एक वाजता सुरुवात झाली. सकाळी सात वाजून 10 मिनिटांनी जोलारपेटमधून निघालेली ट्रेन दुपारच्या सुमारास चेन्नईला पोहचली. प्रत्येक वॅगनची 55 हजार लीटर पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे. यासाठी 65 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीसामी यांनी दिली. चेन्नई हे एक कोटी लोकसंख्येचं शहर आहे. आठ ते नऊ महिन्यांपासून लोक पाणीटंचाईचा सामना करत आहेत. सलग दोन वर्ष पावसाने हुलकावणी दिली. तलाव ओस पडले. जमिनीच्या पोटातलं पाणी इतकं उपसलं, की आता फक्त धूळ बाहेर पडते. चेन्नई आणि कांचीपुरम परिसरात तीन हजार छोटे-मोठे तलाव आहेत, पण ते गाळाने भरले होते. काहींवर अतिक्रमण केलं. खोलीकरण, रुंदीकरण करण्याचे कष्ट सरकारने घेतले नाहीत. ईशान्य मान्सून चेन्नईत दाखल होईलपर्यंत म्हणजे अजून जवळपास तीन महिने वेल्लोरमधून रेल्वेनं पाणी आणण्यात येईल. गेले वर्षभर 9 हजार टँकर चेन्नईला पाणी पुरवतात. पण आता शहराच्या जवळपासचे स्त्रोतही आटले आहेत. त्यामुळे जगणं कठीण झालं आहे. सरकारने पाणी पुरवठ्यासाठी 250 कोटींची तरतूद केली आहे. शहराची रोजची पाण्याची गरज तब्बल 900 एमएलडी इतकी प्रचंड आहे. चेन्नईसारखीच वेळ 2020 च्या शेवटापर्यंत देशातल्या 21 शहरांवर येणार आहे. कारण अतिक्रमण, अमाप पाणी उपशामुळे जमिनीच्या पोटात पाणी राहणार नाही. 2030 पर्यंत 40 टक्के नागरिकांना पिण्याचं पाणी मिळणार नाही, असा अंदाज वर्तवला जात आहे. आजमितीला निम्मा देश दुष्काळाशी दोन हात करत आहे. पण पाण्याच्या प्रश्नावर ना सरकार गंभीर आहे ना लोकांना देणंघेणं. नुकतीच लैला नावाची एक वेब सिरीज नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झाली. आताच्या देशातल्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय स्थितीत फरक पडला नाही तर 2050 मध्ये भारत कसा असेल याचं काल्पनिक चित्र त्यात रंगवण्यात आलं आहे. त्यातला पहिलाच सीन पाणी चोरल्याच्या आरोपाचा आहे. पाणी ही त्या जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. चेन्नईकर 2050 ची स्थिती आजच अनुभवत आहेत. अख्ख्या देशाला सावध होण्यासाठी हे उदाहरण पुरेसं असावं.

महत्त्वाच्या बातम्या

FSSAI Apps : 'केवळ पाहू नका, तर तक्रार करा! FSSAI चे ग्राहकांना आवाहन; असुरक्षित अन्न आणि अस्वच्छ किचन दिसताच थेट ॲपद्वारे करता येणार तक्रार
'केवळ पाहू नका, तर तक्रार करा! FSSAI चे ग्राहकांना आवाहन; असुरक्षित अन्न आणि अस्वच्छ किचन दिसताच थेट ॲपद्वारे करता येणार तक्रार
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब

व्हिडीओ

Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP on Chief Minister Post: 'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
Rahul Dravid Coach : ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
Beed News: आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
Jejuri Varkari Accident: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीतील दुर्दैवी घटना
Jejuri Varkari Accident: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
Kolhapur Crime News: 1 महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळले; घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापुरात हादरवणारं घडलं
1 महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळले; घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापुरात हादरवणारं घडलं
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळली, बीड जिल्ह्याला सर्वाधिक फटका, नेमकं कारण काय? जाणून घ्या A टू Z माहिती
लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळली, बीड जिल्ह्याला सर्वाधिक फटका, नेमकं कारण काय? जाणून घ्या A टू Z माहिती
England sacked Test coach Brendon McCullum : आधी बेन स्टोक्स गेला... आता ब्रेंडन मॅक्युलमची कोचपदावरून हकालपट्टी, इंग्लंड क्रिकेटच्या निर्णयाने जगभरात खळबळ, नेमकं काय कारण?
आधी बेन स्टोक्स गेला... आता ब्रेंडन मॅक्युलमची कोचपदावरून हकालपट्टी, इंग्लंड क्रिकेटच्या निर्णयाने जगभरात खळबळ, नेमकं काय कारण?
Vinayak Raut Gitesh Raut Girija Raut Marathi News: विनायक राऊत आणि कुटुंबीयांकडून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज; दोन भोंदूबाबा फरार, एकला अटक; सूनेच्या आरोपानंतर काय काय घडलं?
विनायक राऊत आणि कुटुंबीयांकडून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज; दोन भोंदूबाबा फरार, एकला अटक; सूनेच्या आरोपानंतर काय काय घडलं?
Embed widget