एक्स्प्लोर

चेन्नईची तहान भागवण्यासाठी वेल्लोरहून रेल्वेने पाणी, 25 लाख लीटर पाण्याची वाहतूक

प्रत्येक वॅगनची 55 हजार लीटर पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे. यासाठी 65 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीसामी यांनी दिली.

चेन्नई : पाणीटंचाईमुळे तहानलेल्या चेन्नईकरांसाठी चक्क रेल्वेनं पाणी आलं आहे. 217 किलोमीटर दूर असलेल्या वेल्लोर जिल्ह्यातून आलेलं पाणी स्वच्छ करुन नागरिकांना पुरवलं जाईल. 50 वॅगन असलेल्या ट्रेनमधून तब्बल 25 लाख लीटर पाणी चेन्नईत आणण्यात आलं. यापूर्वी लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. ट्रेनमध्ये पाणी भरण्यास गुरुवारी रात्री एक वाजता सुरुवात झाली. सकाळी सात वाजून 10 मिनिटांनी जोलारपेटमधून निघालेली ट्रेन दुपारच्या सुमारास चेन्नईला पोहचली. प्रत्येक वॅगनची 55 हजार लीटर पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे. यासाठी 65 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीसामी यांनी दिली. चेन्नई हे एक कोटी लोकसंख्येचं शहर आहे. आठ ते नऊ महिन्यांपासून लोक पाणीटंचाईचा सामना करत आहेत. सलग दोन वर्ष पावसाने हुलकावणी दिली. तलाव ओस पडले. जमिनीच्या पोटातलं पाणी इतकं उपसलं, की आता फक्त धूळ बाहेर पडते. चेन्नई आणि कांचीपुरम परिसरात तीन हजार छोटे-मोठे तलाव आहेत, पण ते गाळाने भरले होते. काहींवर अतिक्रमण केलं. खोलीकरण, रुंदीकरण करण्याचे कष्ट सरकारने घेतले नाहीत. ईशान्य मान्सून चेन्नईत दाखल होईलपर्यंत म्हणजे अजून जवळपास तीन महिने वेल्लोरमधून रेल्वेनं पाणी आणण्यात येईल. गेले वर्षभर 9 हजार टँकर चेन्नईला पाणी पुरवतात. पण आता शहराच्या जवळपासचे स्त्रोतही आटले आहेत. त्यामुळे जगणं कठीण झालं आहे. सरकारने पाणी पुरवठ्यासाठी 250 कोटींची तरतूद केली आहे. शहराची रोजची पाण्याची गरज तब्बल 900 एमएलडी इतकी प्रचंड आहे. चेन्नईसारखीच वेळ 2020 च्या शेवटापर्यंत देशातल्या 21 शहरांवर येणार आहे. कारण अतिक्रमण, अमाप पाणी उपशामुळे जमिनीच्या पोटात पाणी राहणार नाही. 2030 पर्यंत 40 टक्के नागरिकांना पिण्याचं पाणी मिळणार नाही, असा अंदाज वर्तवला जात आहे. आजमितीला निम्मा देश दुष्काळाशी दोन हात करत आहे. पण पाण्याच्या प्रश्नावर ना सरकार गंभीर आहे ना लोकांना देणंघेणं. नुकतीच लैला नावाची एक वेब सिरीज नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झाली. आताच्या देशातल्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय स्थितीत फरक पडला नाही तर 2050 मध्ये भारत कसा असेल याचं काल्पनिक चित्र त्यात रंगवण्यात आलं आहे. त्यातला पहिलाच सीन पाणी चोरल्याच्या आरोपाचा आहे. पाणी ही त्या जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. चेन्नईकर 2050 ची स्थिती आजच अनुभवत आहेत. अख्ख्या देशाला सावध होण्यासाठी हे उदाहरण पुरेसं असावं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Banerjee Attack: अभिषेक बॅनर्जींवरील हल्ल्यानंतर राहुल गांधींचा ममता बॅनर्जींना फोन; म्हणाले, 'गरज पडल्यास आम्ही...'
अभिषेक बॅनर्जींवरील हल्ल्यानंतर राहुल गांधींचा ममता बॅनर्जींना फोन; म्हणाले, 'गरज पडल्यास आम्ही...'
Maharashtra Live News Updates: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ; पोलिसांसह बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल
Maharashtra Live News Updates: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ; पोलिसांसह बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल
Kalyan Banerjee : अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
तृणमूलचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
Pune Crime News : पुणे गुवाहाटी विमानाच्या बाथरूममध्ये सापडली चिठ्ठी अन्...; विमान तातडीने निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तपासलं, प्रवासी सुखरूप, नेमकं काय घडलं?
पुणे गुवाहाटी विमानाच्या बाथरूममध्ये सापडली चिठ्ठी अन्...; विमान तातडीने निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तपासलं, प्रवासी सुखरूप, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात पोलिसांचा धाक संपलाय का? टपोरी पोरगा दुचाकीवरुन आला, बेस बॉल स्टीकने चारचाकी फोडली
पुण्यात पोलिसांचा धाक संपलाय का? टपोरी पोरगा दुचाकीवरुन आला, बेस बॉल स्टीकने चारचाकी फोडली
Sushma andhare: सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा; महायुतीत चर्चेच्या फेऱ्या कायम, जागा कोणाकडे जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा, महायुतीत जागा कोणाकडे?
Kalyan Banerjee : अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
तृणमूलचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
Vidhan Parishad Election 2026: काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
Instagram Influencer Death: सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
Embed widget