एक्स्प्लोर

Indian Army : पाकिस्तान आणि चीनची चिंता आणखी वाढणार; भारतीय लष्कराचे 'स्पेशलिस्ट युनिट' तयार

Indian Army: पाकिस्तान आणि चीनची चिंता आता आणखी वाढणार असून भारतीय सैन्याचे सायबर हल्ले रोखण्यासाठी 'स्पेशलिस्ट युनिट' तयार झाले आहे. 

Indian Army : भारतीय सैन्य(Indian Army) बदलत्या काळानुसार देशासाठी चांगले बदल स्वीकारत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच पाकिस्तान (Pakistan) आणि चीनकडून (China) भारताला डिवचण्याचे प्रयत्न सतत होत असता. त्यातच भारतावर सातत्याने होणाऱ्या सायबर हल्ल्याचे प्रमाण देखील वाढत आहे. परंतु पाकिस्तान आणि चीनच्या याच प्रयत्नांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि सतत होणाऱ्या सायबर हल्ल्यांना थांबण्यासाठी भारताचे 'स्पेशलिस्ट युनिट' (New Specialist Unit) आता तयार झाले आहे. भारतीय सैन्याच्या सायबर वेलफेअर इनिशिएटिव्ह (Cyber Welfare Initiatives) अंतर्गत या स्पेशलिस्ट युनिटची स्थापना करण्यात आली आहे. 

भारतीय सैन्याचे प्रमुख मनोज पांडे यांच्या अध्यक्षतेखाली या महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकारी सुरक्षा यंत्राणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या युनिटमध्ये आधुनिक नेटवर्कची सुरक्षा आणि त्याच्या तयारीच्या स्तराला वाढवण्यासाठी भारतीय सैन्यात 'सायबर ऑपरेशन्स आणि सपोर्ट विंग्स'ची (CCOW) स्थापना करण्यात येणार आहे. यामुळे भारताची सायबर सुरक्षेची यंत्रणा आणखी मजबूत होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. तसेच या सूत्रांकडून असे देखील सांगण्यात आले की, युद्धांमध्ये हे सायबर स्पेस डोमेन सैन्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. नव्या स्पेशलिस्ट युनिटचे महत्त्व सांगताना हे युनिट शत्रू राष्ट्रांकडून करण्यात येणाऱ्या सायबर युद्धासाठी हे स्पेस डोमेन स्पर्धात्मक असल्याचं देखील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 

स्पेशलिस्ट युनिट सुरक्षेच्या कामांमध्ये मदत करणार

नव्या सायबर युनिटची स्थापना ही भारतीय लष्करासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचं देखील सांगितलं जात आहे. तसेच हे युनिट भारतीय सैन्यासाठी आवश्यक असलेल्या सायबर सुरक्षेच्या कामांसाठी देखील मदत करणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञान आत्मासात करुन सैन्याची क्षमता वाढवण्यासाठी तसेच उत्तम तत्त्वज्ञान विकसित करण्यासाठी देखील या युनिटची मदत होणार असल्याचं म्हटलं जात आहे.  

भारतीय सैन्याच्या बैठकीत सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भारतीय लष्कराच्या सज्जतेचे आणि तत्परतेचे मुल्यांकन करण्यात आले. तसेच या परिषदेत लष्कराचे भविष्य घडवणारे महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत. भारताच्या उत्तरेकडील भागात सध्या तणावाचे वातावरण निर्माण होत असल्याने भारत आणि चीनच्या सीमेवर अधिक सतर्क राहण्यास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे. तसेच कोणतेही संदर्भ न घेता संरक्षण मंत्र्यांनी जगभरात बदल होत असलेल्या भौगोलिक परिस्थितीवरही लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. त्यानुसार लष्कराने आपल्या हालचाली कराव्यात असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. 
 
इतर महत्त्वाची बातमी: 

Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटकसाठी भाजप सज्ज; सहा दिवस 22 रॅली, स्टार प्रचारकांची फौज, पंतप्रधानांच्या सभांचा धडाका

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget