एक्स्प्लोर

Farmers Protest : घटनात्मकरित्या कायदे रद्द, पण शेतकरी आंदोलन सुरुच; नेमकी दिशा काय?

Farmers Protest News : मोदी सरकारनं घोषणा केल्यानंतर आता घटनात्मकरित्याही कृषी कायदे रद्द करण्यात आले. पण शेतकरी आंदोलन मात्र अद्याप ठाम आहे.

Farmers Protest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात कृषी कायदे रद्द करणारं विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या विधेयकावर स्वाक्षरी केली आणि घटनात्मक रित्या तिनही कृषी कायदे रद्द झाले. पण तरिही देशाची राजधानी दिल्लीला वेढा देऊन बसलेले शेतकरी अद्याप मागे हटलेले नाहीत. ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. अशातच आतातरी शेतकरी आंदोलन मागे घेणार का? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. केंद्र सरकारकडून संयुक्त किसान मोर्चाला मिळालेल्या प्रस्तावावर काल (मंगळवारी) शेतकरी मोर्चानं बैठक घेतली. परंतु, बैठकीत हा प्रस्ताव मान्य करण्याबाबत शेतकरी नेत्यांमध्ये एकमत होऊ शकले नाही. आता या संपूर्ण प्रकरणावर संयुक्त किसान मोर्चा बुधवारी महत्त्वाची बैठक घेणार आहे. आजच्या बैठकीत शेतकरी आंदोलनाबाबत मोठा निर्णय होऊ शकतो, असं मानलं जात आहे.

आंदोलनाची नेमकी दिशा काय? 

  • संयुक्त किसान मोर्चाच्या मंगळवारच्या बैठकीनंतर शेतकरी आंदोलन मागे घेतील, असं म्हटलं जात होतं. परंतु, असं काहीच झालं नाही. शेतकरी मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचं पाहायला मिळालं. संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीनंतर शेतकरी नेते गुरनाम सिंह चढूनी म्हणाले की, "आम्ही आंदोलन समाप्तीबद्दल कोणतीही हमी देत ​​नाही." 
  • शेतकर्‍यांना पाठवलेल्या प्रस्तावात सरकारनं शेतकर्‍यांनी आधी आंदोलन संपवावं, त्यानंतर त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे परत केले जातील, असं म्हटलं आहे. मात्र आधी खटले मागे घ्या, मगच आंदोलन मागे घेणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. 
  • एमएमसीवर, सरकारनं केंद्र, राज्य, कृषी तज्ज्ञ आणि संयुक्त किसान मोर्चाच्या सदस्यांसह समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. आता शेतकरी म्हणत आहेत की, त्यांनी आंदोलन केलं आहे, त्यामुळे फक्त त्यांचे सदस्यच असावेत. 
  • केंद्र सरकारने आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यास तत्वतः संमती दिली आहे. तर युनायटेड किसान मोर्चाला पंजाब मॉडेल अंतर्गत 5 लाख रुपयांची भरपाई आणि पीडितांना नोकरी हवी आहे.

पराली, वीज यांसारख्या इतर मुद्द्यांवरही काही प्रमाणात बोलले गेले आहे, काही करणं बाकी आहे. मात्र यादरम्यान राकेश टिकैत यांनी सरकारसमोर नवी मागणी ठेवली आहे. राकेश टिकैत म्हणाले की, "शेतकऱ्यांना नवे ट्रॅक्टर देण्यात आले. एवढं मोठं सरकार आहे, एवढं करु शकत नाही. मागणी करणं गुन्हा आहे का?" पुढे बोलताना ते म्हणाले की, "काँग्रेसनं दिले, तर मग मोदी सरकार का नाही देऊ शकत?" 

आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकऱ्यांसह नुकसान भरपाई द्यावी : राहुल गांधी 

 तीन कृषी कायद्यांविरोधात (farmer law) गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या ( farmers ) नातेवाईकांना केंद्राकडून  नुकसानभरपाई आणि नोकऱ्या ( jobs) देण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandh) यांनी केली आहे. मंगळवारी लोकसभेत केलेल्या भाषणात राहुल गांधी यांनी ही मागणी केली. 

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी मांडण्यात असमर्थता दर्शविल्याबद्दल राहुल गांधी यांनी केंद्र सरकावर टीका केली. शिवाय पंजाब आणि हरिणातील मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराला मिळालेली नुकसानभरपाई आणि नोकऱ्यांची यादी लोकसभेत सादर केली. यावेळी काँग्रेस सदस्यांनी या मुद्यावर सरकारला निवेदन देण्याची मागणी केली. तर सरकारविरोधात घोषणाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि द्रमुकच्या सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकऱ्यांसह नुकसान भरपाई द्यावी; राहुल गांधी यांची मागणी 

देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहा एबीपी माझा युट्यूब लाईव्ह

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Amravati Election :अमरावती महापालिकेत कोण सत्ता स्थापन करणार? महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
अमरावतीत महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध

व्हिडीओ

Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात
Satej patil On Shivsena : कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता
Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Amravati Election :अमरावती महापालिकेत कोण सत्ता स्थापन करणार? महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
अमरावतीत महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?
मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?
Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ शाळांना २० जानेवारीला सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, वाहतुकीतही बदल, नेमकं काय आहे कारण?
पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ शाळांना २० जानेवारीला सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, वाहतुकीतही बदल, नेमकं काय आहे कारण?
मुंबई मनपात चकीत करणारं गणित, ठाकरेंकडे दोन हुकूमी एक्के, महापौर आरक्षण सोडतीने धाकधूक वाढवली! 
... तर ठाकरेंचाच महापौर होऊ शकतो, मुंबई मनपात चकीत करणारं गणित, ठाकरेंकडे दोन हुकूमी एक्के, महापौर आरक्षण सोडतीने धाकधूक वाढवली! 
Thane Mayor: शिंदे मुंबईमध्ये हटून बसल्याची चर्चा पण आता ठाण्यामध्ये भाजपला काय काय हवं याची यादी समोर आली!
शिंदे मुंबईमध्ये हटून बसल्याची चर्चा पण आता ठाण्यामध्ये भाजपला काय काय हवं याची यादी समोर आली!
Embed widget