एक्स्प्लोर

Farmers Protest : घटनात्मकरित्या कायदे रद्द, पण शेतकरी आंदोलन सुरुच; नेमकी दिशा काय?

Farmers Protest News : मोदी सरकारनं घोषणा केल्यानंतर आता घटनात्मकरित्याही कृषी कायदे रद्द करण्यात आले. पण शेतकरी आंदोलन मात्र अद्याप ठाम आहे.

Farmers Protest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात कृषी कायदे रद्द करणारं विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या विधेयकावर स्वाक्षरी केली आणि घटनात्मक रित्या तिनही कृषी कायदे रद्द झाले. पण तरिही देशाची राजधानी दिल्लीला वेढा देऊन बसलेले शेतकरी अद्याप मागे हटलेले नाहीत. ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. अशातच आतातरी शेतकरी आंदोलन मागे घेणार का? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. केंद्र सरकारकडून संयुक्त किसान मोर्चाला मिळालेल्या प्रस्तावावर काल (मंगळवारी) शेतकरी मोर्चानं बैठक घेतली. परंतु, बैठकीत हा प्रस्ताव मान्य करण्याबाबत शेतकरी नेत्यांमध्ये एकमत होऊ शकले नाही. आता या संपूर्ण प्रकरणावर संयुक्त किसान मोर्चा बुधवारी महत्त्वाची बैठक घेणार आहे. आजच्या बैठकीत शेतकरी आंदोलनाबाबत मोठा निर्णय होऊ शकतो, असं मानलं जात आहे.

आंदोलनाची नेमकी दिशा काय? 

  • संयुक्त किसान मोर्चाच्या मंगळवारच्या बैठकीनंतर शेतकरी आंदोलन मागे घेतील, असं म्हटलं जात होतं. परंतु, असं काहीच झालं नाही. शेतकरी मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचं पाहायला मिळालं. संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीनंतर शेतकरी नेते गुरनाम सिंह चढूनी म्हणाले की, "आम्ही आंदोलन समाप्तीबद्दल कोणतीही हमी देत ​​नाही." 
  • शेतकर्‍यांना पाठवलेल्या प्रस्तावात सरकारनं शेतकर्‍यांनी आधी आंदोलन संपवावं, त्यानंतर त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे परत केले जातील, असं म्हटलं आहे. मात्र आधी खटले मागे घ्या, मगच आंदोलन मागे घेणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. 
  • एमएमसीवर, सरकारनं केंद्र, राज्य, कृषी तज्ज्ञ आणि संयुक्त किसान मोर्चाच्या सदस्यांसह समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. आता शेतकरी म्हणत आहेत की, त्यांनी आंदोलन केलं आहे, त्यामुळे फक्त त्यांचे सदस्यच असावेत. 
  • केंद्र सरकारने आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यास तत्वतः संमती दिली आहे. तर युनायटेड किसान मोर्चाला पंजाब मॉडेल अंतर्गत 5 लाख रुपयांची भरपाई आणि पीडितांना नोकरी हवी आहे.

पराली, वीज यांसारख्या इतर मुद्द्यांवरही काही प्रमाणात बोलले गेले आहे, काही करणं बाकी आहे. मात्र यादरम्यान राकेश टिकैत यांनी सरकारसमोर नवी मागणी ठेवली आहे. राकेश टिकैत म्हणाले की, "शेतकऱ्यांना नवे ट्रॅक्टर देण्यात आले. एवढं मोठं सरकार आहे, एवढं करु शकत नाही. मागणी करणं गुन्हा आहे का?" पुढे बोलताना ते म्हणाले की, "काँग्रेसनं दिले, तर मग मोदी सरकार का नाही देऊ शकत?" 

आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकऱ्यांसह नुकसान भरपाई द्यावी : राहुल गांधी 

 तीन कृषी कायद्यांविरोधात (farmer law) गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या ( farmers ) नातेवाईकांना केंद्राकडून  नुकसानभरपाई आणि नोकऱ्या ( jobs) देण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandh) यांनी केली आहे. मंगळवारी लोकसभेत केलेल्या भाषणात राहुल गांधी यांनी ही मागणी केली. 

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी मांडण्यात असमर्थता दर्शविल्याबद्दल राहुल गांधी यांनी केंद्र सरकावर टीका केली. शिवाय पंजाब आणि हरिणातील मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराला मिळालेली नुकसानभरपाई आणि नोकऱ्यांची यादी लोकसभेत सादर केली. यावेळी काँग्रेस सदस्यांनी या मुद्यावर सरकारला निवेदन देण्याची मागणी केली. तर सरकारविरोधात घोषणाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि द्रमुकच्या सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकऱ्यांसह नुकसान भरपाई द्यावी; राहुल गांधी यांची मागणी 

देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहा एबीपी माझा युट्यूब लाईव्ह

महत्त्वाच्या बातम्या

India Natural Gas Discovery: मोठी बातमी! अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा साठा; इंधन टंचाईच्या सावटावर भारताला जॅकपॉट 
मोठी बातमी! अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा साठा; इंधन टंचाईच्या सावटावर भारताला जॅकपॉट 
20 जूनपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचं रखडलेलं काम पूर्ण करणार, गडकरींचं आश्वासन, काँग्रेसच्या माजी खासदारानं घेतली भेट
20 जूनपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचं रखडलेलं काम पूर्ण करणार, गडकरींचं आश्वासन, काँग्रेसच्या माजी खासदारानं घेतली भेट
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Cockroach Janta Party: कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??

व्हिडीओ

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Cockroach Janta Party: कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
Trinamool Congress: पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
Mumbai Mangroves : मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
Share Market : सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला सर्वाधिक फटका
सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला फटका
Embed widget