एक्स्प्लोर

'भविष्य का भारत' चर्चासत्रात सरसंघचालकांनी दिलेली प्रश्नांची उत्तरं जशीच्या तशी

दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या संघाच्या तीन दिवसीय ‘भविष्य का भारत’ या चर्चासत्राचा समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाचं समर्थन केलं. राज्यघटनेत आरक्षणाबाबत जी तरतूद आहे, त्यास संघाचं पूर्ण समर्थन आहे, असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. तसेच, एससी-एसटी अॅक्टचा दुरुपयोग होता कामा नये, असंही भागवत म्हणाले. दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या संघाच्या तीन दिवसीय ‘भविष्य का भारत’ या चर्चासत्राचा समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. संघ आणि जातीव्यवस्था प्रश्न : हिंदू समाज जातीव्यवस्थेकडे कसं पाहतो? हिंदू समाजात एससी/एसटी समाजाचं महत्त्व काय? सरसंघचालक : जातीव्यवस्था म्हणतात हे चुकीचं आहे. ही व्यवस्था कुठे आहे. ही तर अव्यवस्था आहे. जातीव्यवस्था संपणार हे ठरलेलं आहे. आमचा जातीय विषमतेवर विश्वास नाही. हा एक मोठा प्रवास आहे आणि आम्हाला तो करावाच लागेल. आम्ही संघात कुणाची जात विचारत नाही. जेव्हा मला सरसंघचालक म्हणून निवडण्यात आलं तेव्हाही माध्यमांनी चालवलं की भागवतांना संघाने निवडलं मात्र ओबीसी समाजाला संघाचं प्रतिनिधीत्व द्यायचंय त्यामुळे सोनीजींना बनवलं गेलं. जेव्हा सोनीजींनी मी विचारलं तुम्ही ओबीसीमध्ये येता का? ते हसले आणि आजपर्यंत मला समजलेलं नाही  सोनीजी जातीने कोण आहेत. संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी कार्यकारिणी लवकरच दिसेल. म्हणूनच म्हटलं प्रवास खूप मोठा आहे. प्रश्न : आरक्षणाबाबत संघाची भूमिका काय? जातीव्यवस्था कधीपर्यंत राहील? संघर्षावर उपाय काय? सरसंघचालक : सामाजिक विषमतेला हटवून सर्वांना समान संधी देण्यासाठी संविधान सक्षम आहे. संविधानात आरक्षणासाठी जी तरतूद आहे, त्याला संघाचं पूर्ण समर्थन आहे. ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळालाय त्यांनाच तो कधीपर्यंत घ्यायचा हे ठरवावं लागेल. जेव्हा त्यांना वाटेल, ते ठरवतील. क्रीमी लेयरचं काय करायचं हेही समाजच ठरवेल. आरक्षण ही समस्या नाही, मात्र आरक्षणावर होणारं राजकारण ही समस्या आहे. हातात हात घेऊन जो खड्ड्यात पडलाय त्याला वर आणलं पाहिजे. 1000 वर्षांचा अपमान दूर करण्यासाठी 100-150 वर्षं झुकणं काही महागडा सौदा नाही. सर्वजण तयार आहेत. समलैंगिकता आणि कलम 377 चर्चेचा विषय आहे, तृतीयपंथीयांबाबत संघाचं मत काय? सरसंघचालक : हे सर्वचजण समाजाचा एक भाग आहेत. त्यांची व्यवस्था समाजालाच करावी लागेल. आता वेळ बदलला आहे. त्यामुळे समाजाने ती करणं गरजेचं आहे. जर कुणामध्ये वेगळेपण आहे तर त्यामुळे समाजात आपण कुणीतरी वेगळे आहोत ही भावना तयार होता कामा नये. तसंच सर्वजण सारखेच आहेत, समाज स्वस्थ राहील याचीही व्यवस्था करावी लागेल. राम मंदि प्रकरणावर शाह बानोसारखाच कायदा बनवणं शक्य आहे? सरसंघचालक : अध्यादेश काढणं सरकारच्या हातात आहे, संवादाचा भाग रामजन्मभूमीकडे आहे. मी दोन्हीमध्ये नाही. मात्र चर्चा व्हावी असं संघाला वाटतं. संघाचा प्रमुख या नात्याने असं वाटतं की भव्य राम मंदिर लवकरच बांधलं जावं. पण ते फक्त भगवान राम नाहीत. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. त्यांना इमामे हिंदही मानतात. जर राम मंदिर बांधलं जाईल, तर हिंदू-मुस्लीम यांच्यातील तणावाचं कारणच संपून जाईल. राम मंदिर जसं बांधलं जाईल तसं लवकरात लवकर बांधलं जावं. प्रश्न : पर्यावरणाच्या नावाखाली हिंदू सणांना विरोध केला जातो सरसंघचालक : पर्यावरणाच्या नावाखाली विरोध होतोय तर काही सण पर्यावरणपुरक नाहीत. आणि फक्त  हिंदूंच्याच सणांना विरोध का? मात्र समाजाचं मन बदलेल तेव्हा बदलेल. लोक मानतील पण ज्याप्रकारे सण साजरे केले जातात त्यामुळे संशय उत्पन्न होतो. हिंदी कधी राष्ट्रभाषा बनेल? अनेक संस्थांमध्ये इंग्रजीचं प्रभुत्व आहे. जे हिंदी किंवा संस्कृत असावं सरसंघचालक : इंग्रजीशी कोणतंही शत्रुत्व नाही, मात्र चांगलं हिंदी बोलणारे असतील, एक भाषा आपण शिकू. एका भाषेमुळे जर देशात कटुता निर्माण होत असेल तर आपलं मन कसं बनावं हा विचार करावा लागेल. हिंदीव्यतिरिक्त दुसऱ्या भाषांपैकी कोणतीही एक भाषा हिंदीभाषिक शिकेल तर हिंदीतर भाषा शिकण्यात पुढे येईल. संस्कृतला आपण प्राधान्य देत नसल्यामुळे संस्कृत शाळा कमी होत चालल्या आहेत. आपण आपल्या मातृभाषेचा आदर केलाच पाहिजे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव यांचेही नाव
मोठी बातमी! भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव यांचेही नाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
Gujarat Local Body Election Results 2026: क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा राजकोट महापालिकेत पराभव; भाजपने राखला बालेकिल्ला, काँग्रेसला धक्का
क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा राजकोट महापालिकेत पराभव; भाजपने राखला बालेकिल्ला, काँग्रेसला धक्का
Odisha News: बँक अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणाला कंटाळला, बहिणीचे पैसे काढण्यासाठी भावाने चक्क स्मशानभूमीत पुरलेला सांगाडा आणला, नेमकं काय घडलं?
बँक अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणाला कंटाळला, बहिणीचे पैसे काढण्यासाठी भावाने चक्क स्मशानभूमीत पुरलेला सांगाडा आणला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Vidhan Parishad  BJP Candidate List : विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर
Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर व्हिडिओ कांड, शाहिदच्या मित्राला कराडमधून अटक; पोलीस तपासात आणखी व्हिडिओ, आणखी गुन्हा दाखल
कोल्हापूर व्हिडिओ कांड, शाहिदच्या मित्राला कराडमधून अटक; पोलीस तपासात आणखी व्हिडिओ, आणखी गुन्हा दाखल
Mhada Lottery 2026: मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
मोठी बातमी! भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव यांचेही नाव
मोठी बातमी! भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव यांचेही नाव
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
Eknath Shinde : विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, शिवसेना कोणाला संधी देणार?
पक्षांतर्गत नाराजी, नेत्यांची वक्तव्य ते विधानपरिषदेची उमेदवार निवड, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
Embed widget