एक्स्प्लोर

'भविष्य का भारत' चर्चासत्रात सरसंघचालकांनी दिलेली प्रश्नांची उत्तरं जशीच्या तशी

दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या संघाच्या तीन दिवसीय ‘भविष्य का भारत’ या चर्चासत्राचा समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाचं समर्थन केलं. राज्यघटनेत आरक्षणाबाबत जी तरतूद आहे, त्यास संघाचं पूर्ण समर्थन आहे, असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. तसेच, एससी-एसटी अॅक्टचा दुरुपयोग होता कामा नये, असंही भागवत म्हणाले. दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या संघाच्या तीन दिवसीय ‘भविष्य का भारत’ या चर्चासत्राचा समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. संघ आणि जातीव्यवस्था प्रश्न : हिंदू समाज जातीव्यवस्थेकडे कसं पाहतो? हिंदू समाजात एससी/एसटी समाजाचं महत्त्व काय? सरसंघचालक : जातीव्यवस्था म्हणतात हे चुकीचं आहे. ही व्यवस्था कुठे आहे. ही तर अव्यवस्था आहे. जातीव्यवस्था संपणार हे ठरलेलं आहे. आमचा जातीय विषमतेवर विश्वास नाही. हा एक मोठा प्रवास आहे आणि आम्हाला तो करावाच लागेल. आम्ही संघात कुणाची जात विचारत नाही. जेव्हा मला सरसंघचालक म्हणून निवडण्यात आलं तेव्हाही माध्यमांनी चालवलं की भागवतांना संघाने निवडलं मात्र ओबीसी समाजाला संघाचं प्रतिनिधीत्व द्यायचंय त्यामुळे सोनीजींना बनवलं गेलं. जेव्हा सोनीजींनी मी विचारलं तुम्ही ओबीसीमध्ये येता का? ते हसले आणि आजपर्यंत मला समजलेलं नाही  सोनीजी जातीने कोण आहेत. संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी कार्यकारिणी लवकरच दिसेल. म्हणूनच म्हटलं प्रवास खूप मोठा आहे. प्रश्न : आरक्षणाबाबत संघाची भूमिका काय? जातीव्यवस्था कधीपर्यंत राहील? संघर्षावर उपाय काय? सरसंघचालक : सामाजिक विषमतेला हटवून सर्वांना समान संधी देण्यासाठी संविधान सक्षम आहे. संविधानात आरक्षणासाठी जी तरतूद आहे, त्याला संघाचं पूर्ण समर्थन आहे. ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळालाय त्यांनाच तो कधीपर्यंत घ्यायचा हे ठरवावं लागेल. जेव्हा त्यांना वाटेल, ते ठरवतील. क्रीमी लेयरचं काय करायचं हेही समाजच ठरवेल. आरक्षण ही समस्या नाही, मात्र आरक्षणावर होणारं राजकारण ही समस्या आहे. हातात हात घेऊन जो खड्ड्यात पडलाय त्याला वर आणलं पाहिजे. 1000 वर्षांचा अपमान दूर करण्यासाठी 100-150 वर्षं झुकणं काही महागडा सौदा नाही. सर्वजण तयार आहेत. समलैंगिकता आणि कलम 377 चर्चेचा विषय आहे, तृतीयपंथीयांबाबत संघाचं मत काय? सरसंघचालक : हे सर्वचजण समाजाचा एक भाग आहेत. त्यांची व्यवस्था समाजालाच करावी लागेल. आता वेळ बदलला आहे. त्यामुळे समाजाने ती करणं गरजेचं आहे. जर कुणामध्ये वेगळेपण आहे तर त्यामुळे समाजात आपण कुणीतरी वेगळे आहोत ही भावना तयार होता कामा नये. तसंच सर्वजण सारखेच आहेत, समाज स्वस्थ राहील याचीही व्यवस्था करावी लागेल. राम मंदि प्रकरणावर शाह बानोसारखाच कायदा बनवणं शक्य आहे? सरसंघचालक : अध्यादेश काढणं सरकारच्या हातात आहे, संवादाचा भाग रामजन्मभूमीकडे आहे. मी दोन्हीमध्ये नाही. मात्र चर्चा व्हावी असं संघाला वाटतं. संघाचा प्रमुख या नात्याने असं वाटतं की भव्य राम मंदिर लवकरच बांधलं जावं. पण ते फक्त भगवान राम नाहीत. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. त्यांना इमामे हिंदही मानतात. जर राम मंदिर बांधलं जाईल, तर हिंदू-मुस्लीम यांच्यातील तणावाचं कारणच संपून जाईल. राम मंदिर जसं बांधलं जाईल तसं लवकरात लवकर बांधलं जावं. प्रश्न : पर्यावरणाच्या नावाखाली हिंदू सणांना विरोध केला जातो सरसंघचालक : पर्यावरणाच्या नावाखाली विरोध होतोय तर काही सण पर्यावरणपुरक नाहीत. आणि फक्त  हिंदूंच्याच सणांना विरोध का? मात्र समाजाचं मन बदलेल तेव्हा बदलेल. लोक मानतील पण ज्याप्रकारे सण साजरे केले जातात त्यामुळे संशय उत्पन्न होतो. हिंदी कधी राष्ट्रभाषा बनेल? अनेक संस्थांमध्ये इंग्रजीचं प्रभुत्व आहे. जे हिंदी किंवा संस्कृत असावं सरसंघचालक : इंग्रजीशी कोणतंही शत्रुत्व नाही, मात्र चांगलं हिंदी बोलणारे असतील, एक भाषा आपण शिकू. एका भाषेमुळे जर देशात कटुता निर्माण होत असेल तर आपलं मन कसं बनावं हा विचार करावा लागेल. हिंदीव्यतिरिक्त दुसऱ्या भाषांपैकी कोणतीही एक भाषा हिंदीभाषिक शिकेल तर हिंदीतर भाषा शिकण्यात पुढे येईल. संस्कृतला आपण प्राधान्य देत नसल्यामुळे संस्कृत शाळा कमी होत चालल्या आहेत. आपण आपल्या मातृभाषेचा आदर केलाच पाहिजे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती 
1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती 
LPG Gas Crisis: मोठी बातमी : राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार; व्यावसायिकांना मोठा दिलासा
राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार; व्यावसायिकांना मोठा दिलासा
PM Modi: पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
The Indian Navy new stealth warship Taragiri: भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट
भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget