एक्स्प्लोर

'भविष्य का भारत' चर्चासत्रात सरसंघचालकांनी दिलेली प्रश्नांची उत्तरं जशीच्या तशी

दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या संघाच्या तीन दिवसीय ‘भविष्य का भारत’ या चर्चासत्राचा समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाचं समर्थन केलं. राज्यघटनेत आरक्षणाबाबत जी तरतूद आहे, त्यास संघाचं पूर्ण समर्थन आहे, असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. तसेच, एससी-एसटी अॅक्टचा दुरुपयोग होता कामा नये, असंही भागवत म्हणाले. दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या संघाच्या तीन दिवसीय ‘भविष्य का भारत’ या चर्चासत्राचा समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. संघ आणि जातीव्यवस्था प्रश्न : हिंदू समाज जातीव्यवस्थेकडे कसं पाहतो? हिंदू समाजात एससी/एसटी समाजाचं महत्त्व काय? सरसंघचालक : जातीव्यवस्था म्हणतात हे चुकीचं आहे. ही व्यवस्था कुठे आहे. ही तर अव्यवस्था आहे. जातीव्यवस्था संपणार हे ठरलेलं आहे. आमचा जातीय विषमतेवर विश्वास नाही. हा एक मोठा प्रवास आहे आणि आम्हाला तो करावाच लागेल. आम्ही संघात कुणाची जात विचारत नाही. जेव्हा मला सरसंघचालक म्हणून निवडण्यात आलं तेव्हाही माध्यमांनी चालवलं की भागवतांना संघाने निवडलं मात्र ओबीसी समाजाला संघाचं प्रतिनिधीत्व द्यायचंय त्यामुळे सोनीजींना बनवलं गेलं. जेव्हा सोनीजींनी मी विचारलं तुम्ही ओबीसीमध्ये येता का? ते हसले आणि आजपर्यंत मला समजलेलं नाही  सोनीजी जातीने कोण आहेत. संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी कार्यकारिणी लवकरच दिसेल. म्हणूनच म्हटलं प्रवास खूप मोठा आहे. प्रश्न : आरक्षणाबाबत संघाची भूमिका काय? जातीव्यवस्था कधीपर्यंत राहील? संघर्षावर उपाय काय? सरसंघचालक : सामाजिक विषमतेला हटवून सर्वांना समान संधी देण्यासाठी संविधान सक्षम आहे. संविधानात आरक्षणासाठी जी तरतूद आहे, त्याला संघाचं पूर्ण समर्थन आहे. ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळालाय त्यांनाच तो कधीपर्यंत घ्यायचा हे ठरवावं लागेल. जेव्हा त्यांना वाटेल, ते ठरवतील. क्रीमी लेयरचं काय करायचं हेही समाजच ठरवेल. आरक्षण ही समस्या नाही, मात्र आरक्षणावर होणारं राजकारण ही समस्या आहे. हातात हात घेऊन जो खड्ड्यात पडलाय त्याला वर आणलं पाहिजे. 1000 वर्षांचा अपमान दूर करण्यासाठी 100-150 वर्षं झुकणं काही महागडा सौदा नाही. सर्वजण तयार आहेत. समलैंगिकता आणि कलम 377 चर्चेचा विषय आहे, तृतीयपंथीयांबाबत संघाचं मत काय? सरसंघचालक : हे सर्वचजण समाजाचा एक भाग आहेत. त्यांची व्यवस्था समाजालाच करावी लागेल. आता वेळ बदलला आहे. त्यामुळे समाजाने ती करणं गरजेचं आहे. जर कुणामध्ये वेगळेपण आहे तर त्यामुळे समाजात आपण कुणीतरी वेगळे आहोत ही भावना तयार होता कामा नये. तसंच सर्वजण सारखेच आहेत, समाज स्वस्थ राहील याचीही व्यवस्था करावी लागेल. राम मंदि प्रकरणावर शाह बानोसारखाच कायदा बनवणं शक्य आहे? सरसंघचालक : अध्यादेश काढणं सरकारच्या हातात आहे, संवादाचा भाग रामजन्मभूमीकडे आहे. मी दोन्हीमध्ये नाही. मात्र चर्चा व्हावी असं संघाला वाटतं. संघाचा प्रमुख या नात्याने असं वाटतं की भव्य राम मंदिर लवकरच बांधलं जावं. पण ते फक्त भगवान राम नाहीत. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. त्यांना इमामे हिंदही मानतात. जर राम मंदिर बांधलं जाईल, तर हिंदू-मुस्लीम यांच्यातील तणावाचं कारणच संपून जाईल. राम मंदिर जसं बांधलं जाईल तसं लवकरात लवकर बांधलं जावं. प्रश्न : पर्यावरणाच्या नावाखाली हिंदू सणांना विरोध केला जातो सरसंघचालक : पर्यावरणाच्या नावाखाली विरोध होतोय तर काही सण पर्यावरणपुरक नाहीत. आणि फक्त  हिंदूंच्याच सणांना विरोध का? मात्र समाजाचं मन बदलेल तेव्हा बदलेल. लोक मानतील पण ज्याप्रकारे सण साजरे केले जातात त्यामुळे संशय उत्पन्न होतो. हिंदी कधी राष्ट्रभाषा बनेल? अनेक संस्थांमध्ये इंग्रजीचं प्रभुत्व आहे. जे हिंदी किंवा संस्कृत असावं सरसंघचालक : इंग्रजीशी कोणतंही शत्रुत्व नाही, मात्र चांगलं हिंदी बोलणारे असतील, एक भाषा आपण शिकू. एका भाषेमुळे जर देशात कटुता निर्माण होत असेल तर आपलं मन कसं बनावं हा विचार करावा लागेल. हिंदीव्यतिरिक्त दुसऱ्या भाषांपैकी कोणतीही एक भाषा हिंदीभाषिक शिकेल तर हिंदीतर भाषा शिकण्यात पुढे येईल. संस्कृतला आपण प्राधान्य देत नसल्यामुळे संस्कृत शाळा कमी होत चालल्या आहेत. आपण आपल्या मातृभाषेचा आदर केलाच पाहिजे.

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसच्या काळात हजारो कोटींचे घोटाळे ते जनतेचा विश्वासघात, जवाहरलाल नेहरुंचा विक्रम मोडल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
काँग्रेसच्या काळात हजारो कोटींचे घोटाळे ते जनतेचा विश्वासघात, जवाहरलाल नेहरुंचा विक्रम मोडल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
West Bengal : TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री

व्हिडीओ

Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report
Is Mamata Banerjee merging TMC with Congress : ‘तृणमूल’ होणार‘काँग्रेस’? | Special Report
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
West Bengal : TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Embed widget