एक्स्प्लोर

'भविष्य का भारत' चर्चासत्रात सरसंघचालकांनी दिलेली प्रश्नांची उत्तरं जशीच्या तशी

दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या संघाच्या तीन दिवसीय ‘भविष्य का भारत’ या चर्चासत्राचा समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाचं समर्थन केलं. राज्यघटनेत आरक्षणाबाबत जी तरतूद आहे, त्यास संघाचं पूर्ण समर्थन आहे, असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. तसेच, एससी-एसटी अॅक्टचा दुरुपयोग होता कामा नये, असंही भागवत म्हणाले. दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या संघाच्या तीन दिवसीय ‘भविष्य का भारत’ या चर्चासत्राचा समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. संघ आणि जातीव्यवस्था प्रश्न : हिंदू समाज जातीव्यवस्थेकडे कसं पाहतो? हिंदू समाजात एससी/एसटी समाजाचं महत्त्व काय? सरसंघचालक : जातीव्यवस्था म्हणतात हे चुकीचं आहे. ही व्यवस्था कुठे आहे. ही तर अव्यवस्था आहे. जातीव्यवस्था संपणार हे ठरलेलं आहे. आमचा जातीय विषमतेवर विश्वास नाही. हा एक मोठा प्रवास आहे आणि आम्हाला तो करावाच लागेल. आम्ही संघात कुणाची जात विचारत नाही. जेव्हा मला सरसंघचालक म्हणून निवडण्यात आलं तेव्हाही माध्यमांनी चालवलं की भागवतांना संघाने निवडलं मात्र ओबीसी समाजाला संघाचं प्रतिनिधीत्व द्यायचंय त्यामुळे सोनीजींना बनवलं गेलं. जेव्हा सोनीजींनी मी विचारलं तुम्ही ओबीसीमध्ये येता का? ते हसले आणि आजपर्यंत मला समजलेलं नाही  सोनीजी जातीने कोण आहेत. संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी कार्यकारिणी लवकरच दिसेल. म्हणूनच म्हटलं प्रवास खूप मोठा आहे. प्रश्न : आरक्षणाबाबत संघाची भूमिका काय? जातीव्यवस्था कधीपर्यंत राहील? संघर्षावर उपाय काय? सरसंघचालक : सामाजिक विषमतेला हटवून सर्वांना समान संधी देण्यासाठी संविधान सक्षम आहे. संविधानात आरक्षणासाठी जी तरतूद आहे, त्याला संघाचं पूर्ण समर्थन आहे. ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळालाय त्यांनाच तो कधीपर्यंत घ्यायचा हे ठरवावं लागेल. जेव्हा त्यांना वाटेल, ते ठरवतील. क्रीमी लेयरचं काय करायचं हेही समाजच ठरवेल. आरक्षण ही समस्या नाही, मात्र आरक्षणावर होणारं राजकारण ही समस्या आहे. हातात हात घेऊन जो खड्ड्यात पडलाय त्याला वर आणलं पाहिजे. 1000 वर्षांचा अपमान दूर करण्यासाठी 100-150 वर्षं झुकणं काही महागडा सौदा नाही. सर्वजण तयार आहेत. समलैंगिकता आणि कलम 377 चर्चेचा विषय आहे, तृतीयपंथीयांबाबत संघाचं मत काय? सरसंघचालक : हे सर्वचजण समाजाचा एक भाग आहेत. त्यांची व्यवस्था समाजालाच करावी लागेल. आता वेळ बदलला आहे. त्यामुळे समाजाने ती करणं गरजेचं आहे. जर कुणामध्ये वेगळेपण आहे तर त्यामुळे समाजात आपण कुणीतरी वेगळे आहोत ही भावना तयार होता कामा नये. तसंच सर्वजण सारखेच आहेत, समाज स्वस्थ राहील याचीही व्यवस्था करावी लागेल. राम मंदि प्रकरणावर शाह बानोसारखाच कायदा बनवणं शक्य आहे? सरसंघचालक : अध्यादेश काढणं सरकारच्या हातात आहे, संवादाचा भाग रामजन्मभूमीकडे आहे. मी दोन्हीमध्ये नाही. मात्र चर्चा व्हावी असं संघाला वाटतं. संघाचा प्रमुख या नात्याने असं वाटतं की भव्य राम मंदिर लवकरच बांधलं जावं. पण ते फक्त भगवान राम नाहीत. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. त्यांना इमामे हिंदही मानतात. जर राम मंदिर बांधलं जाईल, तर हिंदू-मुस्लीम यांच्यातील तणावाचं कारणच संपून जाईल. राम मंदिर जसं बांधलं जाईल तसं लवकरात लवकर बांधलं जावं. प्रश्न : पर्यावरणाच्या नावाखाली हिंदू सणांना विरोध केला जातो सरसंघचालक : पर्यावरणाच्या नावाखाली विरोध होतोय तर काही सण पर्यावरणपुरक नाहीत. आणि फक्त  हिंदूंच्याच सणांना विरोध का? मात्र समाजाचं मन बदलेल तेव्हा बदलेल. लोक मानतील पण ज्याप्रकारे सण साजरे केले जातात त्यामुळे संशय उत्पन्न होतो. हिंदी कधी राष्ट्रभाषा बनेल? अनेक संस्थांमध्ये इंग्रजीचं प्रभुत्व आहे. जे हिंदी किंवा संस्कृत असावं सरसंघचालक : इंग्रजीशी कोणतंही शत्रुत्व नाही, मात्र चांगलं हिंदी बोलणारे असतील, एक भाषा आपण शिकू. एका भाषेमुळे जर देशात कटुता निर्माण होत असेल तर आपलं मन कसं बनावं हा विचार करावा लागेल. हिंदीव्यतिरिक्त दुसऱ्या भाषांपैकी कोणतीही एक भाषा हिंदीभाषिक शिकेल तर हिंदीतर भाषा शिकण्यात पुढे येईल. संस्कृतला आपण प्राधान्य देत नसल्यामुळे संस्कृत शाळा कमी होत चालल्या आहेत. आपण आपल्या मातृभाषेचा आदर केलाच पाहिजे.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 'सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
मुलाला वडिलोपार्जितचं सोनं मिळालं, पण बायकोला आयफोन घेण्यासाठी विकून टाकलं, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
मुलाला वडिलोपार्जितचं सोनं मिळालं, पण बायकोला आयफोन घेण्यासाठी विकून टाकलं, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
DUSU Election Result : दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला, NSUI चा पराभव, उपाध्यक्षपदी अपक्षानं मारली बाजी 
दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला,उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराचा विजय
विराट आणि रोहितचं तुफान वादळ पुन्हा धडाडणार! टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध 8 सामने खेळणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक 
विराट आणि रोहितचं तुफान वादळ पुन्हा धडाडणार! टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध 8 सामने खेळणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक 

व्हिडीओ

Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
LPG Rule Change : कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
DUSU Election Result : दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला, NSUI चा पराभव, उपाध्यक्षपदी अपक्षानं मारली बाजी 
दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला,उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराचा विजय
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
Pune Crime News : आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
Varun Sardesai : आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांकडे एकजरी पुरावा असेल तर दाखवावा, मग बोलावं, वरुण सरदेसाईंनी सर्व आरोप फेटाळले
आदित्य ठाकरे सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियनला भेटले नव्हते, ओळखत नव्हते : वरुण सरदेसाई
Disha Salian Case: आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
Embed widget