एक्स्प्लोर

RBI च्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल! जागतिक स्तरावर भारताची पेमेंट प्रणाली होणार मजबूत, जाणून घ्या सविस्तर माहिती

RBI Rules News : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आपल्या नियमांमध्ये महत्वपूर्ण बदल केला आहे. परदेशातून पैसे मिळण्यास होणारा विलंब लवकरच संपणार आहे

RBI Rules News : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आपल्या नियमांमध्ये महत्वपूर्ण बदल केला आहे. परदेशातून पैसे मिळण्यास होणारा विलंब लवकरच संपणार आहे. बँकांना आंतरराष्ट्रीय व्यवहार झाल्याच्या त्याच दिवशी ग्राहकांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळं जागतिक स्तरावर भारताची पेमेंट प्रणाली मजबूत करणे हा आहे. यामुळे व्यवहारांना गती मिळेल, विलंब कमी होईल आणि ग्राहकांना अधिक पारदर्शकता व सोय मिळेल.

आतापर्यंत, जेव्हा कोणी परदेशातून पैसे पाठवायचे, तेव्हा ते त्यांच्या खात्यात जमा व्हायला अनेकदा एक-दोन दिवस किंवा त्याहूनही जास्त वेळ लागायचा. यामुळे लोकांना, विशेषतः जे आपल्या कुटुंबासाठी किंवा व्यवसायासाठी या पैशांवर अवलंबून आहेत, त्यांना गैरसोय होत असे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आरबीआयने हा नवीन नियम लागू केला आहे. नवीन नियमानुसार, जर बँकेला परकीय चलन बाजाराच्या वेळेत परकीय चलन प्राप्त झाले, तर त्यांनी ते त्याच दिवशी ग्राहकाच्या खात्यात जमा करणे बंधनकारक आहे. जर चलन बाजाराच्या वेळेनंतर आले, तर ते पुढील कामकाजाच्या दिवशी जमा केले पाहिजे. सर्व व्यवहार फेमा (FEMA) नियमांनुसार केले जातील.

हे झाले बदल

आरबीआयने (RBI) केवळ निधी जमा करण्यासाठी अंतिम मुदतच निश्चित केली नाही, तर बँकांना येणाऱ्या चलनाबद्दल ग्राहकांना त्वरित माहिती देण्याचे निर्देशही दिले आहेत. जर ही माहिती बँकिंग वेळेनंतर मिळाली, तर ग्राहकाला पुढील कामकाजाच्या दिवसाच्या सुरुवातीपर्यंत माहिती देणे आवश्यक आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या निधीच्या स्थितीबद्दल स्पष्ट माहिती मिळेल. याव्यतिरिक्त, आरबीआयने बँक प्रक्रिया सुधारण्यावरही भर दिला आहे. सध्या, अनेक बँका दिवसाच्या शेवटी त्यांच्या खात्यांचा ताळमेळ घालतात, ज्यामुळे विलंब होतो. आता त्यांना जलद जमा सुनिश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया रिअल-टाइममध्ये, किंवा किमान दर तासाला अद्ययावत करण्यास सांगितले आहे.

बँकांना तंत्रज्ञानाच्या बाबतीत त्यांच्या प्रणाली अधिक मजबूत करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आरबीआयला बँकांकडून अशी अपेक्षा आहे की, त्यांनी असे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करावेत जिथे ग्राहक त्यांच्या व्यवहारांचा मागोवा घेऊ शकतील, आवश्यक कागदपत्रे सादर करू शकतील आणि व्यवहारांची सद्यस्थिती पाहू शकतील. बँकांना एसटीपी (STP) सारख्या स्वयंचलित प्रणालींचा अवलंब करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. यामुळे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय निधी थेट ग्राहकांच्या खात्यात हस्तांतरित करता येईल, ज्यामुळे वेळेची बचत होईल आणि चुका होण्याची शक्यता कमी होईल.

हा नवीन नियम जारी झाल्यानंतर सहा महिन्यांनी अंमलात येईल, ज्यामुळे बँकांना त्यांच्या प्रणाली अद्ययावत करण्यासाठी वेळ मिळेल. हा निर्देश पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स ॲक्ट 2007 अंतर्गत जारी करण्यात आला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे परदेशातून पैसे मिळवणाऱ्या लाखो लोकांना दिलासा मिळेल. यामुळे केवळ व्यवहारांना गतीच मिळणार नाही, तर पारदर्शकता आणि विश्वासही वाढेल.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
देशात NEET घोटाळा, CBSEचा तमाशा सुरु असतानाच दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंगच्या इमारतीत आगीचा भडका; कार्यालयातील आग संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप
देशात NEET घोटाळा, CBSEचा तमाशा सुरु असतानाच दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंगच्या इमारतीत आगीचा भडका; कार्यालयातील आग संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
Embed widget