एक्स्प्लोर

RBI च्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल! जागतिक स्तरावर भारताची पेमेंट प्रणाली होणार मजबूत, जाणून घ्या सविस्तर माहिती

RBI Rules News : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आपल्या नियमांमध्ये महत्वपूर्ण बदल केला आहे. परदेशातून पैसे मिळण्यास होणारा विलंब लवकरच संपणार आहे

RBI Rules News : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आपल्या नियमांमध्ये महत्वपूर्ण बदल केला आहे. परदेशातून पैसे मिळण्यास होणारा विलंब लवकरच संपणार आहे. बँकांना आंतरराष्ट्रीय व्यवहार झाल्याच्या त्याच दिवशी ग्राहकांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळं जागतिक स्तरावर भारताची पेमेंट प्रणाली मजबूत करणे हा आहे. यामुळे व्यवहारांना गती मिळेल, विलंब कमी होईल आणि ग्राहकांना अधिक पारदर्शकता व सोय मिळेल.

आतापर्यंत, जेव्हा कोणी परदेशातून पैसे पाठवायचे, तेव्हा ते त्यांच्या खात्यात जमा व्हायला अनेकदा एक-दोन दिवस किंवा त्याहूनही जास्त वेळ लागायचा. यामुळे लोकांना, विशेषतः जे आपल्या कुटुंबासाठी किंवा व्यवसायासाठी या पैशांवर अवलंबून आहेत, त्यांना गैरसोय होत असे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आरबीआयने हा नवीन नियम लागू केला आहे. नवीन नियमानुसार, जर बँकेला परकीय चलन बाजाराच्या वेळेत परकीय चलन प्राप्त झाले, तर त्यांनी ते त्याच दिवशी ग्राहकाच्या खात्यात जमा करणे बंधनकारक आहे. जर चलन बाजाराच्या वेळेनंतर आले, तर ते पुढील कामकाजाच्या दिवशी जमा केले पाहिजे. सर्व व्यवहार फेमा (FEMA) नियमांनुसार केले जातील.

हे झाले बदल

आरबीआयने (RBI) केवळ निधी जमा करण्यासाठी अंतिम मुदतच निश्चित केली नाही, तर बँकांना येणाऱ्या चलनाबद्दल ग्राहकांना त्वरित माहिती देण्याचे निर्देशही दिले आहेत. जर ही माहिती बँकिंग वेळेनंतर मिळाली, तर ग्राहकाला पुढील कामकाजाच्या दिवसाच्या सुरुवातीपर्यंत माहिती देणे आवश्यक आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या निधीच्या स्थितीबद्दल स्पष्ट माहिती मिळेल. याव्यतिरिक्त, आरबीआयने बँक प्रक्रिया सुधारण्यावरही भर दिला आहे. सध्या, अनेक बँका दिवसाच्या शेवटी त्यांच्या खात्यांचा ताळमेळ घालतात, ज्यामुळे विलंब होतो. आता त्यांना जलद जमा सुनिश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया रिअल-टाइममध्ये, किंवा किमान दर तासाला अद्ययावत करण्यास सांगितले आहे.

बँकांना तंत्रज्ञानाच्या बाबतीत त्यांच्या प्रणाली अधिक मजबूत करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आरबीआयला बँकांकडून अशी अपेक्षा आहे की, त्यांनी असे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करावेत जिथे ग्राहक त्यांच्या व्यवहारांचा मागोवा घेऊ शकतील, आवश्यक कागदपत्रे सादर करू शकतील आणि व्यवहारांची सद्यस्थिती पाहू शकतील. बँकांना एसटीपी (STP) सारख्या स्वयंचलित प्रणालींचा अवलंब करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. यामुळे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय निधी थेट ग्राहकांच्या खात्यात हस्तांतरित करता येईल, ज्यामुळे वेळेची बचत होईल आणि चुका होण्याची शक्यता कमी होईल.

हा नवीन नियम जारी झाल्यानंतर सहा महिन्यांनी अंमलात येईल, ज्यामुळे बँकांना त्यांच्या प्रणाली अद्ययावत करण्यासाठी वेळ मिळेल. हा निर्देश पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स ॲक्ट 2007 अंतर्गत जारी करण्यात आला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे परदेशातून पैसे मिळवणाऱ्या लाखो लोकांना दिलासा मिळेल. यामुळे केवळ व्यवहारांना गतीच मिळणार नाही, तर पारदर्शकता आणि विश्वासही वाढेल.

 

महत्त्वाच्या बातम्या

AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
CJP : कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?  सौरव दास, आशुतोष रांका यांच्यावर कोणती जबाबदारी?
कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?
PM Modi Instagram Reel :'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
Mohan Bhagwat On LGBTQ Marriage : समलैंगिक विवाहाला संघाकडून संमती मिळेल का? Gen Z च्या प्रश्नावर मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
समलैंगिक विवाहाला संघाकडून संमती मिळेल का? Gen Z च्या प्रश्नावर मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Embed widget