एक्स्प्लोर

उमेदवारांनाही 24 हजारापेक्षा जास्त रक्कम नाहीच!

नवी दिल्ली: देशातील पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसोबतच महाराष्ट्रातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची लगबग सुरु आहे. त्यातच नोटाबंदीमुळे रिझर्व बँकेने प्रत्येक व्यक्तीला आठवड्याला बँकेतून 24 हजार काढण्याची मुभा दिल्याने, निवडणुकीत उभ्या असलेल्या अनेक उमेदवारांची गोची झाली आहे. त्यामुळे उमेदवारांसाठीची ही मर्यादा वाढवावी, अशी मागणी निवडणूक आयोगाने रिझर्व बँकेकडे केली होती. पण रिझर्व बँकेने ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे यावर निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे. आयोगाने बुधवारी रिझर्व बँकेकडे पैसे काढण्याची मर्यादा वाढवून 2 लाख करण्याची मागणी केली होती. यासंबंधी आयोगाने सांगितले होते की, नोटाबंदीमुळे पैसे काढण्यावर जी मर्यादा घातली आहे, त्यातून उमेदवारांना आपल्या प्रचाराचा खर्च करणे अवघड झाले आहे. त्यामुळे ही वाढवावी. पण रिझर्व बँकेने ते शक्य नसल्याचे आयोगाला कळवलं आहे. दरम्यान, यावर आयोगाने रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या पत्राद्वारे आयोगाने रिझर्व बँकेला परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे मत गव्हर्नरांसमोर मांडले आहे. या पत्रात आयोगाने म्हणले आहे की, ''निष्पक्ष आणि स्वतंत्र निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची अपेक्षा सर्वजण व्यक्त करताता. शिवाय, सर्व उमेदवारांना त्यांचा घटनात्मक अधिकार प्रदान करणे, हे आयोगाचे कर्तव्य असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी आयोगाच्या नियामावलींचे पालन होणे गरजेचे आहे, पण याबाबत रिझर्व बँकेला परिस्थीतीचे गांभीर्य नसल्याचं वाटतं. असं म्हणलं आहे. याशिवाय, आयोगाने या पत्राद्वारे रिझर्व बँकेला आपल्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. तसेच विधानसभा क्षेत्रातील निवडणूक अधिकारी ज्या उमेदवारांना प्रमाणपत्र देऊन जाहीर करतील, त्याना एक नवे बँक खाते काढून त्याद्वारे आठवड्याला दोन लाख रुपयापर्यंत काढण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच ही सुविधा 11 मार्च म्हणजे मतमोजणीच्या तारखेपर्यंत उपलब्ध करुन द्यावी असेही सांगितले आहे. रिझर्व बँकेच्या मर्यादेमुळे प्रत्येक उमेदवार आठवड्याला 24 हजार याप्रमाणे निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत 96 हजार रुपयेच काढू शकेल, हे रिझर्व बँकेच्या निदर्शनास आणून दिलं होतं. त्यामुळे आयोगाने कायद्याचा आधार घेऊन उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमधील विधानसभा निवडणुकीतील उमेदवार 28 लाखापर्यंत खर्च करु शकतो असं सांगितलं आहे. तसेच गोवा आणि मणिपूरमध्ये ही सीमा 20 लाख रुपयापर्यंत आहे. निवडणुकीच्या प्रचारातील बहुतेक खर्चाचे पेमेंट चेकने केले तरी, अनेक लहानसहान खर्च करण्यासाठी रोख रकमेची गरज असते. ग्रामीण भागात बँकिंग सुविधा उपलब्ध नसल्याने, याचा सर्वाधिक त्रास उमेदवारांना सहन करावा लागत असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Rahul Gandhi : मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Embed widget