एक्स्प्लोर

राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने जुने हिशोब चुकते होत आहेत?

पण ही बदलेलली भाजप आहे आणि त्यात अमित शाह-अहमद पटेलांच्या नात्याला वैयक्तिक दुश्मनीचीही किनार आहे.

नवी दिल्ली : गुजरात राज्यसभेची निवडणूक ही आज देशात चर्चेचा विषय बनली आहे. 2014 नंतर काँग्रेस-भाजपमधली ही सर्वात प्रतिष्ठेची लढाई म्हणता येईल. ही निवडणुक भाजप-काँग्रेसमधली दिसत असली तरी याला वैयक्तिक दुश्मनीचीही किनार आहे. कारण अहमद पटेल-अमित शहा-नरेंद्र मोदी हे या रणमैदानातले तीन प्रमुख मोहरे आहेत. या निवडणुकीत एवढं घमासान होण्यामागे या तिघांचे जुने संबंधही कारणीभूत आहेत. अहमद पटेल आणि अमित शाह...गुजरात राज्यसभेसाठी जो बुद्धिबळाचा खेळ चालू आहे, त्यात हे दोन वजीर एकमेकांसमोर आहेत. दोघेही गुजरातमधले. एक काँग्रेसचे चाणक्य तर दुसरे भाजपचे. आमदारांशी डील करण्याचं जे कसब अहमदभाई इतकी वर्षे दाखवत आले, त्याच खेळात अमित शाहदेखील माहिर आहेत. त्यामुळेच गुजरात राज्यसभा निवडणुकीत इतका रोमांच निर्माण झाला आहे. आकडे पाहिले तर भाजपचे दोन खासदार निवडून येतात, पण तिसरा निवडून येईल इतपत संख्याबळ भाजपकडे सुरुवातीला अजिबातच नव्हतं. वाजपेयी-अडवाणींची भाजप असती, तर कदाचित तिसरी जागा काही जमणार नाही, असं समजून अहमद पटेलांसाठी ती सोडलीही गेली असती. पण ही बदलेलली भाजप आहे आणि त्यात अमित शाह-अहमद पटेलांच्या नात्याला वैयक्तिक दुश्मनीचीही किनार आहे. 2010 ते 2012 या जवळपास दोन वर्षांच्या काळात अमित शाह हे तडीपार होते. सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात कोर्टानं त्यांना हा आदेश दिला होता. सीबीआयच्या याचिकेवर. ज्या सीबीआयची चावी एका अर्थाने तेव्हा काँग्रेसच्या म्हणजे पर्यायाने अहमदभाईंच्याच हातात होती. गृहराज्यमंत्री असलेले अमित शाह हे जवळपास दोन वर्षे गुजरातमध्ये परत येण्यासाठी धडपडत होते. कोर्टाची दारंही अनेकदा ठोठावली. अगदी 2012 ची गुजरात विधानसभा निवडणुक जवळ आली तरीही अमित शाहांना परवानगी मिळत नव्हती. प्रकरण कोर्टाचं असलं तरी सीबीआयची भूमिका या सगळ्यात महत्त्वाची राहिली होती आणि ती कुणाच्या इशाऱ्यावर असणार हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळेच जुने हिशोब चुकते करण्यासाठी अमित शहांनी ही वेळ निवडली असावी. दुसरीकडे अहमद पटेल आणि नरेंद्र मोदी यांचे संबंधही तितकेच इंटरेस्टिंग आहेत. 2014 ची लोकसभा निवडणुक ऐन भरात असतानाच मोदींनी दूरदर्शनला दिलेल्या एका मुलाखतीत अहमद पटेलांबद्दल केलेलं एक वक्तव्य गाजलेलं होतं. "अहमद पटेल हे माझे काँग्रेसमधल्या सर्वात चांगल्या मित्रांपैकी होते. आता ते तसे राहिले नाहीत. कदाचित त्यांना आता काही अडचणी असतील, त्यामुळे ते मला टाळतात. माझा साधा फोनही ते उचलत नाहीत. पण कधी काळी मी त्यांच्या घरी जाऊन डिनर करायचो. हे नातं एका चांगल्या मैत्रीचं होतं. मला वाटतं अशी वैयक्तिक मैत्री कायम राहिली पाहिजे," असं मोदी म्हणाले होते. मोदींच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण देता देता पटेलांची तारांबळ उडाली होती. लोकसभा निवडणुकीत मतदारांची दिशाभूल करण्यासाठीच मोदी असं वक्तव्य करत असल्याचं पटेलांनी म्हटलं. शिवाय ते केवळ एकदाच, 80 च्या दशकात आमच्याकडे जेवायला आले होते. त्याची कल्पनाही मी राजीव गांधींना दिली होती. मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतरही कधी त्यांना भेटायला गेलो नाही. जर त्यांच्याकडून काही मदत मागायला भेटल्याचं त्यांनी सिद्ध केलं तर राजकारण सोडून देईन अशी तिखट प्रतिक्रिया अहमद पटेल यांनी दिलेली होती. अर्थात पटेलांशी शाहांचे संबंध जितके तणावाचे आहेत, तितके मोदींचे नाहीत ही गोष्ट खरी आहे. मात्र लोकसभेच्या प्रचारात मोदी पटेलांचा उल्लेख अहमद मियाँ असा खोचकपणे करायचे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसचं नैतिक मनोधैर्य खच्ची करण्यासाठी भाजपने अहमद पटेलांसाठी सापळा रचला हे उघड आहे. पण यानिमित्ताने अमित शाहांना अहमद पटेलांचा जुना हिशेब चुकता करायची संधी मिळणार आहे. शिवाय वार पटेलांवर असला तरी त्याचे घाव सोनिया गांधींवर बसणार आहेत. ज्यानं मोदींचाही उद्देश सफल होणार आहे. त्यामुळेच मोदी, शाह, पटेल या तीन मोहऱ्यांचे आपापसातले संबंध या निवडणुकीत राजकारणाच्या गडद छटा दाखवत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis on OBC Census: मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
Embed widget