एक्स्प्लोर

राहुल गांधींनी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं, चार पानी पत्र लिहित स्वीकारली पराभवाची जबाबदारी

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाला आपण जबाबदार असल्याचं या पत्रात राहुल गांधींनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली : राहुल गांधींनी अधिकृतरित्या आपलं काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं आहे. चार पानी पत्र लिहित राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपद सोडल्याचं जाहीर केलं. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाला आपण जबाबदार असल्याचं या पत्रात राहुल गांधींनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या चांगल्या भविष्यासाठी काही मोठे आणि कडक निर्णय घेणं गरजेचं असल्याचंही राहुल गांधींनी पत्रात नमूद केलं आहे. राहुल गांधींनी आपल्या चार पानी पत्रात काँग्रेस नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. कुणालाही आपली सत्ता आणि पद सोडायचं नाही. भारतात सत्तेला चिकटून राहण्याचा मोह नेत्यांना आवरता येत नसल्याचं म्हणत राहुल गांधींनी ट्विटर अकाऊंटवरील आपली ओळखही बदलली आहे. काँग्रेस अध्यक्षऐवजी आता काँग्रेस कार्यकर्ता आणि खासदार असा उल्लेख राहुल गांधींच्या ट्विटर अकाऊंटवर करण्यात आला आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काँग्रेस अध्यक्ष हा उल्लेख काढून टाकला आहे. आता फक्त काँग्रेस नेते आणि खासदार इतकाच उल्लेख राहुल गांधींनी ट्विटरवर ठेवला आहे. राहुल गांधी उद्या मुंबईत काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या गुरुवारी मुंबईत येत आहेत. शिवडी न्यायालयात आरएसएस संदर्भातील प्रकरणात राहुल गांधी हजेरी लावणार आहेत. राहुल गांधी सकाळी साडे नऊ वाजता मुंबई विमानतळावर दाखल होतील. न्यायालयात 11 वाजता हजेरी लावल्यानंतर पुन्हा लगेच दिल्लीला रवाना होणार आहेत. पराभवाची सर्वस्वी जबाबदारी माझी : राहुल गांधी “काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने पक्षाच्या 2019 मधील पराभवाची सर्वस्वी जबाबदारी मी स्वीकारत आहे.  काँग्रेसच्या चांगल्या भविष्यासाठी जबाबदारीमध्ये बदल करण्याची गरज आहे. त्यामुळे मी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. पक्षाला उभारी देण्यासाठी काही मोठे आणि कडक निर्णय घेणं गरजेचं आहे. या पराभवाची जबाबदारी बाकीच्यांनीही घेणं गरजेचं आहे. सत्तेला चिकटून राहण्याची सवय भारतात आहे. ती सोडणं गरजेचं आहे.” असं राहुल गांधी यांनी आपल्या चार पानी पत्रात म्हटलं आहे. “काँग्रेससाठी सेवा करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे, ज्या पक्षाची मूल्य आणि आदर्शांनी देशाची सेवा केली आहे. मी देश आणि संघटनेचे आभार मानतो. जय हिंद” म्हणत राहुल गांधींनी आपल्या पत्राचा शेवट केला आहे. राहुल गांधींनी संसदेच्या परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राहुल यांनी ते अध्यक्ष नसल्याचं सांगत लवकरच अध्यक्षपदाची निवडणूक होण्याचं सूतोवाच केलं. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधींनी 25 मे रोजीच काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. मात्र नेत्यांनी राहुल गांधींच्या मनधरणीचे प्रयत्न चालवले होते. मात्र आज चार पानी पत्र लिहून अधिकृतपणे काँग्रेसचं अध्यक्षपद राहुल गांधींनी सोडलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

DRDO Bomb Test : शत्रूची आता खैर नाही! DRDO कडून 'हाय कॅलिबर बॉम्ब'ची यशस्वी चाचणी
शत्रूची आता खैर नाही! DRDO कडून 'हाय कॅलिबर बॉम्ब'ची यशस्वी चाचणी
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
जगात सर्वाधिक इंटरनेचा वापर करणार देश कोणता? भारताचा कितव्या स्थानी? जाणून घ्या सविस्तर माहिती
जगात सर्वाधिक इंटरनेचा वापर करणार देश कोणता? भारताचा कितव्या स्थानी? जाणून घ्या सविस्तर माहिती
N S Raja Subramani: देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर

व्हिडीओ

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
Embed widget