एक्स्प्लोर

राहुल गांधींनी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं, चार पानी पत्र लिहित स्वीकारली पराभवाची जबाबदारी

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाला आपण जबाबदार असल्याचं या पत्रात राहुल गांधींनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली : राहुल गांधींनी अधिकृतरित्या आपलं काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं आहे. चार पानी पत्र लिहित राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपद सोडल्याचं जाहीर केलं. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाला आपण जबाबदार असल्याचं या पत्रात राहुल गांधींनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या चांगल्या भविष्यासाठी काही मोठे आणि कडक निर्णय घेणं गरजेचं असल्याचंही राहुल गांधींनी पत्रात नमूद केलं आहे. राहुल गांधींनी आपल्या चार पानी पत्रात काँग्रेस नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. कुणालाही आपली सत्ता आणि पद सोडायचं नाही. भारतात सत्तेला चिकटून राहण्याचा मोह नेत्यांना आवरता येत नसल्याचं म्हणत राहुल गांधींनी ट्विटर अकाऊंटवरील आपली ओळखही बदलली आहे. काँग्रेस अध्यक्षऐवजी आता काँग्रेस कार्यकर्ता आणि खासदार असा उल्लेख राहुल गांधींच्या ट्विटर अकाऊंटवर करण्यात आला आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काँग्रेस अध्यक्ष हा उल्लेख काढून टाकला आहे. आता फक्त काँग्रेस नेते आणि खासदार इतकाच उल्लेख राहुल गांधींनी ट्विटरवर ठेवला आहे. राहुल गांधी उद्या मुंबईत काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या गुरुवारी मुंबईत येत आहेत. शिवडी न्यायालयात आरएसएस संदर्भातील प्रकरणात राहुल गांधी हजेरी लावणार आहेत. राहुल गांधी सकाळी साडे नऊ वाजता मुंबई विमानतळावर दाखल होतील. न्यायालयात 11 वाजता हजेरी लावल्यानंतर पुन्हा लगेच दिल्लीला रवाना होणार आहेत. पराभवाची सर्वस्वी जबाबदारी माझी : राहुल गांधी “काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने पक्षाच्या 2019 मधील पराभवाची सर्वस्वी जबाबदारी मी स्वीकारत आहे.  काँग्रेसच्या चांगल्या भविष्यासाठी जबाबदारीमध्ये बदल करण्याची गरज आहे. त्यामुळे मी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. पक्षाला उभारी देण्यासाठी काही मोठे आणि कडक निर्णय घेणं गरजेचं आहे. या पराभवाची जबाबदारी बाकीच्यांनीही घेणं गरजेचं आहे. सत्तेला चिकटून राहण्याची सवय भारतात आहे. ती सोडणं गरजेचं आहे.” असं राहुल गांधी यांनी आपल्या चार पानी पत्रात म्हटलं आहे. “काँग्रेससाठी सेवा करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे, ज्या पक्षाची मूल्य आणि आदर्शांनी देशाची सेवा केली आहे. मी देश आणि संघटनेचे आभार मानतो. जय हिंद” म्हणत राहुल गांधींनी आपल्या पत्राचा शेवट केला आहे. राहुल गांधींनी संसदेच्या परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राहुल यांनी ते अध्यक्ष नसल्याचं सांगत लवकरच अध्यक्षपदाची निवडणूक होण्याचं सूतोवाच केलं. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधींनी 25 मे रोजीच काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. मात्र नेत्यांनी राहुल गांधींच्या मनधरणीचे प्रयत्न चालवले होते. मात्र आज चार पानी पत्र लिहून अधिकृतपणे काँग्रेसचं अध्यक्षपद राहुल गांधींनी सोडलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget