एक्स्प्लोर

राहुल गांधींनी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं, चार पानी पत्र लिहित स्वीकारली पराभवाची जबाबदारी

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाला आपण जबाबदार असल्याचं या पत्रात राहुल गांधींनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली : राहुल गांधींनी अधिकृतरित्या आपलं काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं आहे. चार पानी पत्र लिहित राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपद सोडल्याचं जाहीर केलं. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाला आपण जबाबदार असल्याचं या पत्रात राहुल गांधींनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या चांगल्या भविष्यासाठी काही मोठे आणि कडक निर्णय घेणं गरजेचं असल्याचंही राहुल गांधींनी पत्रात नमूद केलं आहे. राहुल गांधींनी आपल्या चार पानी पत्रात काँग्रेस नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. कुणालाही आपली सत्ता आणि पद सोडायचं नाही. भारतात सत्तेला चिकटून राहण्याचा मोह नेत्यांना आवरता येत नसल्याचं म्हणत राहुल गांधींनी ट्विटर अकाऊंटवरील आपली ओळखही बदलली आहे. काँग्रेस अध्यक्षऐवजी आता काँग्रेस कार्यकर्ता आणि खासदार असा उल्लेख राहुल गांधींच्या ट्विटर अकाऊंटवर करण्यात आला आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काँग्रेस अध्यक्ष हा उल्लेख काढून टाकला आहे. आता फक्त काँग्रेस नेते आणि खासदार इतकाच उल्लेख राहुल गांधींनी ट्विटरवर ठेवला आहे. राहुल गांधी उद्या मुंबईत काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या गुरुवारी मुंबईत येत आहेत. शिवडी न्यायालयात आरएसएस संदर्भातील प्रकरणात राहुल गांधी हजेरी लावणार आहेत. राहुल गांधी सकाळी साडे नऊ वाजता मुंबई विमानतळावर दाखल होतील. न्यायालयात 11 वाजता हजेरी लावल्यानंतर पुन्हा लगेच दिल्लीला रवाना होणार आहेत. पराभवाची सर्वस्वी जबाबदारी माझी : राहुल गांधी “काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने पक्षाच्या 2019 मधील पराभवाची सर्वस्वी जबाबदारी मी स्वीकारत आहे.  काँग्रेसच्या चांगल्या भविष्यासाठी जबाबदारीमध्ये बदल करण्याची गरज आहे. त्यामुळे मी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. पक्षाला उभारी देण्यासाठी काही मोठे आणि कडक निर्णय घेणं गरजेचं आहे. या पराभवाची जबाबदारी बाकीच्यांनीही घेणं गरजेचं आहे. सत्तेला चिकटून राहण्याची सवय भारतात आहे. ती सोडणं गरजेचं आहे.” असं राहुल गांधी यांनी आपल्या चार पानी पत्रात म्हटलं आहे. “काँग्रेससाठी सेवा करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे, ज्या पक्षाची मूल्य आणि आदर्शांनी देशाची सेवा केली आहे. मी देश आणि संघटनेचे आभार मानतो. जय हिंद” म्हणत राहुल गांधींनी आपल्या पत्राचा शेवट केला आहे. राहुल गांधींनी संसदेच्या परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राहुल यांनी ते अध्यक्ष नसल्याचं सांगत लवकरच अध्यक्षपदाची निवडणूक होण्याचं सूतोवाच केलं. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधींनी 25 मे रोजीच काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. मात्र नेत्यांनी राहुल गांधींच्या मनधरणीचे प्रयत्न चालवले होते. मात्र आज चार पानी पत्र लिहून अधिकृतपणे काँग्रेसचं अध्यक्षपद राहुल गांधींनी सोडलं आहे.
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तामध्ये असंतोषाचा भडका उडाला, मुंगी शिरायलाही जागा नाही इतकी गर्दी, POKच्या गिलगिटमध्ये आंदोलन
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तामध्ये असंतोषाचा भडका उडाला, मुंगी शिरायलाही जागा नाही इतकी गर्दी, POKच्या गिलगिटमध्ये आंदोलन
Virat Kohli and KL Rahul : किंग कोहलीने श्रेयस अय्यरनंतर के. एल. राहुलचा हिशेबही चुकता केला, 'कांतारा स्टाईल मिमिक्री करत हसत सुटला
किंग कोहलीने श्रेयस अय्यरनंतर के. एल. राहुलचा हिशेबही चुकता केला, 'कांतारा स्टाईल मिमिक्री करत हसत सुटला
Mumbai's ED office Fire : कधीकाळी मंत्रालयात आग पेटली होती अन् आता मुंबईमधील ईडी कार्यालयात सुद्धा मध्यरात्री आग लागली; महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावे जळून खाक
कधीकाळी मंत्रालयात आग पेटली होती अन् आता मुंबईमधील ईडी कार्यालयात सुद्धा मध्यरात्री आग लागली; महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावे जळून खाक
Nagpur Crime: नागपूरमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत गँगवॉरचा भडका, प्रवेश गुप्ता न सापडल्याने अविनाश भुसारींना गोळ्या घालून संपवलं
आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत प्रवेश गुप्ताला संपवण्याचा डाव, पण समोर अविनाश भुसारी दिसला अन् धडाधड गोळ्या झाडल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Best Bus News | बेस्ट बसची भाडेवाढ दुप्पट होण्याची दाट शक्यता, 'बेस्ट' प्रवास महागणार?Washim Water Issue | अनेक धरण प्रकल्पांनी गाठला तळ, सर्वच धरणात केवळ 12 टक्के पाणीसाठा शिल्लकPakistan Hanif Abbasi Threatened India | पाणी बंद केल्यास युद्धासाठी तयार रहा,पाकिस्तानची दर्पोक्तीSaamana Editorial On Pakistani | शत्रूराष्ट्रातील हजारो लोक भारतात बिऱ्हाडं थाटतातच कशी? - सामना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तामध्ये असंतोषाचा भडका उडाला, मुंगी शिरायलाही जागा नाही इतकी गर्दी, POKच्या गिलगिटमध्ये आंदोलन
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तामध्ये असंतोषाचा भडका उडाला, मुंगी शिरायलाही जागा नाही इतकी गर्दी, POKच्या गिलगिटमध्ये आंदोलन
Virat Kohli and KL Rahul : किंग कोहलीने श्रेयस अय्यरनंतर के. एल. राहुलचा हिशेबही चुकता केला, 'कांतारा स्टाईल मिमिक्री करत हसत सुटला
किंग कोहलीने श्रेयस अय्यरनंतर के. एल. राहुलचा हिशेबही चुकता केला, 'कांतारा स्टाईल मिमिक्री करत हसत सुटला
Mumbai's ED office Fire : कधीकाळी मंत्रालयात आग पेटली होती अन् आता मुंबईमधील ईडी कार्यालयात सुद्धा मध्यरात्री आग लागली; महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावे जळून खाक
कधीकाळी मंत्रालयात आग पेटली होती अन् आता मुंबईमधील ईडी कार्यालयात सुद्धा मध्यरात्री आग लागली; महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावे जळून खाक
Nagpur Crime: नागपूरमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत गँगवॉरचा भडका, प्रवेश गुप्ता न सापडल्याने अविनाश भुसारींना गोळ्या घालून संपवलं
आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत प्रवेश गुप्ताला संपवण्याचा डाव, पण समोर अविनाश भुसारी दिसला अन् धडाधड गोळ्या झाडल्या
Protest Against Pakistan in Pakistan Occupied Kashmir : बलुचिस्ताननंतर आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा पाकिस्तानविरोधात एल्गार; हजारो नागरिक रस्त्यावर उतरले
Video : बलुचिस्ताननंतर आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा पाकिस्तानविरोधात एल्गार; हजारो नागरिक रस्त्यावर उतरले
Pahalgam Attack:
भारतीय लष्कराचा 'तो' घाव दहशवाद्यांच्या वर्मी बसला, धमकीचा मेसेज पाठवला, "इंडियन आर्मीने सुरुवात केलेय, शेवट आम्ही करु!"
Beed Crime Walmik Karad: वाल्मिक कराडचा मुक्काम असलेल्या जेलमध्ये रणजीत कासलेला धोका? तातडीने हर्सुल कारागृहात हलवलं
वाल्मिक कराडचा मुक्काम असलेल्या जेलमध्ये रणजीत कासलेला धोका? तातडीने हर्सुल कारागृहात हलवलं
वादळी वाऱ्यासह पाऊस, लाईट गेली अन् उड्डाण पुलावरही पाणी; खासदारांनीच बनवला व्हिडिओ
वादळी वाऱ्यासह पाऊस, लाईट गेली अन् उड्डाण पुलावरही पाणी; खासदारांनीच बनवला व्हिडिओ
Embed widget