एक्स्प्लोर

Rahul Gandhi : राहुल गांधींकडून नोकऱ्यांमधील ओबीसींच्या प्रमाणाचा मुद्दा तर अमित शाह म्हणतात...

Rahul Gandhi Vs Amit Shah : महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेच्या दरम्यान राहुल गांधी यांनी ओबीसी सचिवांच्या नियुक्तीबाबत प्रश्न उपस्थित केला तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्याकडे खासदार असल्याचे म्हटले.

नवी दिल्ली आगामी लोकसभा निवडणुकीत ओबीसी मतदार निर्णायक भूमिका बजावणार असल्याची चर्चा सुरू असताना आज लोकसभेत त्याचे प्रतिबिंब दिसून आले. लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर चर्चा  (Womens Reservation Bill ) सुरू असताना काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ओबीसींना मिळणाऱ्या संधीबाबत प्रश्न उपस्थित केले. केंद्र सरकारच्या 90 सचिवांपैकी 3 सचिव ओबीसी प्रवर्गातील असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तर, आपल्या भाषणात गृहमंत्री अमित शाह  (Amit Shah) यांनी भाजपचे 85 खासदार असल्याचे सांगत राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले. 

केंद्र सरकारमध्ये फक्त 3 ओबीसी सचिव

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, 90 सचिव सरकारला सांभाळत आहेत. आणि यापैकी किती ओबीसी येतात? फक्त 3 ओबीसी सचिव आहेत. ते बजेटच्या केवळ 5 टक्के नियंत्रित करतात. ही चर्चा भारतातील जनतेला सत्ता हस्तांतरित करण्याबाबत आहे. हा ओबीसी समाजाचा अपमान आहे. तुम्ही आजच विधेयक लागू करा आणि आजच महिलांना एक तृतीयांश आरक्षण द्या, अशी मागणी त्यांनी केली. जातनिहाय जनगणना करा अन्यथा आम्ही ती करू असेही राहुल गांधी यांनी म्हटले.

ओबीसींच्या मुद्यावर जोर 

राहुल गांधी यांच्या संपूर्ण भाषणात ओबीसी मुद्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. ओबीसी कोट्याशिवाय असलेले हे विधेयक अपूर्ण असून ओबीसी आरक्षण लागू करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली. 

राहुल यांनी म्हटले की, सरकार अनेक मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करते. यातील एक मुद्दा जात जनगणना आहे. विरोधी पक्षाने जात जनगणनेचा मुद्दा उपस्थित करताच भाजप अचानक इतर मुद्दे आणून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ओबीसी समाज आणि भारतातील लोक दुसरीकडे पाहू लागतील याचे कारण मला समजत नसल्याचे त्यांनी म्हटले. 

अमित शाह काय म्हणाले?

अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शाह यांनी आपल्या भाषणात म्हटले की, सरकार हे सचिव चालवतात. सरकार मंत्रिमंडळ चालवते. देश चालवणाऱ्या लोकांमध्ये फक्त तीन ओबीसी आहेत. मी म्हणतो देश सरकार चालवते. कॅबिनेट देशाची धोरणे ठरवते. या देशाची संसद ती करते. भाजपचे 29 टक्के खासदार म्हणजेच  85 खासदार ओबीसी आहेत. तुलना करायची असेल तर करा. केंद्रीय मंत्रिमंडळात 29 मंत्री ओबीसी आहेत. आम्ही ओबीसीतून पंतप्रधान दिला असल्याचे शाह यांनी सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात मध्यरात्री तरुणासोबत नेमकं काय घडलं? वायरीने खांबाला बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
कोल्हापुरात मध्यरात्री तरुणासोबत नेमकं काय घडलं? वायरीने खांबाला बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
मोठी बातमी! अनगरच्या निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना धक्का नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने काय बदललं?
मोठी बातमी! अनगरच्या निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना धक्का नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने काय बदललं?
Kolhapur News: कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jaisingh Mohite on BJP : विधानसभेला आतून मदत करण्यासाठी 50 कोटींची ऑफर, मोहितेंनी केली भाजपची पोलखोल
Sanjay Raut Full PC : एक महिन्यांनंतर राऊत मैदानात; निलेश राणेंचं कौतुक तर शिंदेंवर
Devendra Fadnavis On Nagarparishad Election Postponed : निवडणुका पुढे ढकलणं अतिशय चुकीचं
Dhairyasheel Mohite Speech : मी शंकरराव मोहिते पाटलांचा नातू, असेल हिम्मत तर आत टाकून दाखवा
Local Body Election:राज्यात नगराध्यक्षपदाच्या 22 निवडणुका लांबणीवर,अनगरचीही निवडणूक प्रक्रिया स्थगित

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात मध्यरात्री तरुणासोबत नेमकं काय घडलं? वायरीने खांबाला बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
कोल्हापुरात मध्यरात्री तरुणासोबत नेमकं काय घडलं? वायरीने खांबाला बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
मोठी बातमी! अनगरच्या निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना धक्का नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने काय बदललं?
मोठी बातमी! अनगरच्या निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना धक्का नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने काय बदललं?
Kolhapur News: कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
Winter Session Of Parliament: संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्ध पुन्हा येतोय, फक्त वेगळ्या भूमिकेत; नव्या मालिकेत साकारणार ताकदीचं पात्र
'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्ध पुन्हा येतोय, फक्त वेगळ्या भूमिकेत; नव्या मालिकेत साकारणार ताकदीचं पात्र
Virat Kohli News : रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
Buldhana BJP : कुणी कुणाला मतं टाकली हे जर कुणाला बारकाईने समजत असेल तर ते फक्त आणि फक्त मला समजतं; भाजप आमदाराचं धक्कादायक वक्तव्य
कुणी कुणाला मतं टाकली हे जर कुणाला बारकाईने समजत असेल तर ते फक्त आणि फक्त मला समजतं; भाजप आमदाराचं धक्कादायक वक्तव्य
Embed widget