एक्स्प्लोर

Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी

Rahul Gandhi Slams Modi Government: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 2015 आणि 2026 दरम्यान 148 परीक्षा घोटाळे झाले, 87 परीक्षा रद्द तर 9 कोटी विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाल्याचं म्हटलं. 

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट यूजी परीक्षा पेपरफुटीवरुन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला बोल केला. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट करत 22 लाख विद्यार्थ्यांची फसवणूक झाली असून त्यांची मेहनत वाया गेल्याचं म्हटलं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी या मुद्यावर एक शब्द देखील बोलले नाहीत, असं राहुल गांधी म्हणाले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तातडीनं पदावरुन हटवलं जावं अन्यथा पंतप्रधानांनी त्याची जबाबदारी स्वीकारावी, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. 

22 लाख मुलांची फसवणूक झाली : राहुल गांधी 

राहुल गांधी म्हणाले की  नीटसाठी 22 लाख विद्यार्थ्यांनी दोन वर्ष दिवसरात्र मेहनत केली, ती मेहनत वाया गेली. पूर्ण देशाला माहिती आहे, व्हाटसअपवर परीक्षेच्या दोन दिवस अगोदर पेपर वाटण्यात आला. धर्मेंद्र प्रधान जी भारताचे शिक्षण मंत्री म्हणतात मला काही देणं घेणं नाही. कमिटीनं च्या सूचना दिल्या होत्या त्यांनी कचऱ्याच्या डब्यात फेकल्या, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.   

राहुल गांधी म्हणाले की, नीटच्या 22 लाख मुलांची फसवणूक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर एक शब्द बोलत नाहीत. धर्मेंद्र प्रधान यांना हटवलं जावं, अन्यथा पंतप्रधानांनी स्वत: स्वीकराली पाहिजे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.  

राहुल गांधी यांचा हल्लाबोल सुरुच

राहुल गांधी यांनी नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर दोन विद्यार्थ्यांनी जीवन संपवल्याचा मुद्दा मांडत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. राहुल गांधी म्हणाले की भाजप सरकारमध्ये परीक्षा घोटाळा करणाऱ्यांना संरक्षण दिलं जातं. तर, मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागतोय, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.  
 
राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीच्या 21 वर्षीय ऋतिक मिश्रा आणि गोव्यातील एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येचा मुद्दा मांडला. परीक्षा रद्द झाल्यानं विद्यार्थी मानसिकदृष्ट्या खचले आहेत. हे विद्यार्थी परीक्षेमुळं पराभूत झाले नाहीत तरयांना एका भ्रष्ट पद्धतीनं मारलं आहे, या आत्महत्या नसून व्यवस्थेनं केलेली हत्या असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.  

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांन म्हटलं की 2015 ते 2026 या दरम्यान देशात 148 परीक्षा घोटाळे झाले आहेत. या दरम्यान 87 परीक्षा रद्द झाल्या आहेत तर 9 कोटी विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाला आहे. या प्रकरणांमध्ये केवळ एका प्रकरणात शिक्षा झाली आहे. राहुल गांधी यांच्या दाव्यानुसार 17  प्रकरणांमध्ये सीबीआय आणि ईडीनं 11 प्रकरणांमध्ये चौकशी केली मात्र, कोणालाच शिक्षा झाली नाही, असं राहुल गांधी म्हणाले. 

परीक्षा  घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी आणि मंत्र्यांविरोधात कोणताही कठोर कारवाई होत नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. एखाद्याला पदावरुन हटवलं गेल्यास लगचेच त्याला मोठ्या पदावर बसवलं जातं. राहुल गांधी म्हणाले की चोरी करणाऱ्यांना बक्षीस मिळतं आणि परीक्षा देणारे विद्यार्थी जीव गमावतात, असंही ते म्हणाले. 

दरम्यान, पेपरफुटीमुळं रद्द झालेली नीट यूजी परीक्षा रद्द करावी लागली होती. आता पुन्हा नीट यूजी परीक्षा 21 जूनला आयोजित केली जाणार आहे.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जगात सर्वाधिक इंटरनेचा वापर करणार देश कोणता? भारताचा कितव्या स्थानी? जाणून घ्या सविस्तर माहिती
जगात सर्वाधिक इंटरनेचा वापर करणार देश कोणता? भारताचा कितव्या स्थानी? जाणून घ्या सविस्तर माहिती
N S Raja Subramani: देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
Balen Shah : नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
LPG New Rules : गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारनं उचललं मोठं पाऊल, 1 जूनपासून गॅस सिलेंडच्या नियमांमध्ये बदल
LPG New Rules : गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारनं उचललं मोठं पाऊल, 1 जूनपासून गॅस सिलेंडच्या नियमांमध्ये बदल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
Satara Sangli Vidhan Parishad : सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
IPL 2026: आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका, फायद्यात कोण?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका
N S Raja Subramani: देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
Balen Shah : नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
Embed widget