एक्स्प्लोर

Rahul Gandhi : लोक मरत होते आणि पंतप्रधान मोदी थाळी वाजवण्यास सांगत होते; राहुल गांधींची टीका

Rahul Gandhi : कोरोना काळात देशभरात मृत्यूचे तांडव सुरू असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे थाली वाजवण्यास सांगत होते असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर सोडले.

Rahul Gandhi On PM Modi :  काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. कोरोना काळात देशभरात मृत्यूचे तांडव सुरू असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे थाली वाजवण्यास सांगत होते, मोबाईल टॉर्च लावण्यास सांगत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. पंतप्रधान मोदी हे भांडवलदारांसाठी काम करत असल्याचा बोचरा वारही राहुल गांधी यांनी केला.

राजस्थानमधील चुरू येथील एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. राहुल यांनी म्हटले की, आमचे सरकार गरिबांसाठी काम करते. सामान्य लोकांचे सरंक्षण करतो. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी जीएसटी लागू केला आणि आता देशातील शेतकऱ्यांना कर भरावा लागत आहे.  त्यांनी नोटाबंदी केली आणि छोटे व्यापारी, उद्योजकांना उद्धवस्त केले. 

काँग्रेसचे सरकार गरिबांसाठी काम करतंय

राहुल गांधी यांनी जाहीर सभेत म्हटले की, आज लोक पीएम मोदींच्या आश्वासनांवर हसतात. 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. लोकांना ते मिळाले का? मोदींचा हमीभाव म्हणजे अदानीचा हमीभाव आणि काँग्रेसचे सरकार म्हणजे शेतकरी आणि मजुरांचे सरकार असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले. 

तुम्हाला अदानींचे सरकार हवे आहे की शेतकरी, मजूर आणि तरुणांचे सरकार हवे? असा थेट सवाल राहुल यांनी जाहिर सभेत असणाऱ्यांना लोकांना केला. राजस्थान सरकारने लोकांसाठी खूप काम केले असून भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास आम्ही ज्या योजना राबवल्या, त्या रद्द करतील आणि अब्जाधीशांसाठी काम करेल, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

पंतप्रधान मोदी श्रीमंतांसाठी काम करत आहेत

राहुल यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यात साटंलोटं असल्याचा आरोप करणारे भाषण केले. जिकडे पाहावे तिकडे अदानी काही ना काही धंदा करत आहे. विमानतळ, बंदरे, सिमेंट प्लांट, रस्ते सर्व त्याच्या मालकीचे आहेत. ते (पीएम मोदी) श्रीमंतांसाठी काम करतात. ते अदानीला मदत करतात, अदानी पैसे कमवतात आणि तो पैसा परदेशात वापरला जातो, असेही त्यांनी म्हटले.

कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाला काँग्रेसची साथ

कृषी कायद्याबाबत राहुल गांधी म्हणाले, "पीएम मोदींनी कृषी कायदा आणला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असे सांगितले, पण त्याविरोधात देशातील सर्व शेतकऱ्यांनी धरणे-आंदोलन केले. हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून अदानी-अंबानी यांच्या हिताचा असल्याचे सांगितले. काँग्रेसनेदेखील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला साथ दिली आणि हा काळा कायदा हाणून पाडला असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..

व्हिडीओ

Rahul Narvekar Nagpur : आज अधिवेशनात विरोधी नेते पदाचा निकाल लागणार? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले..
Devendra Fadnavis vs Siddharth Kharat : तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही,फडणवीस चिडले
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Dhananjay Munde: धनंजय मुंडे पोटतिडकीने म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक समता संपलेय; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला
धनंजय मुंडे पोटतिडकीने म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक समता संपलेय; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला
Embed widget