एक्स्प्लोर

Rahul Gandhi: महाराष्ट्रात फक्त तीन महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी गळ्याला दोरी लावली; राहुल गांधी म्हणाले, ही आकडेवारी नसून उद्ध्वस्त घरे आहेत, आणि सरकार? गप्प

Rahul Gandhi: राहुल गांधी म्हणाले की, "शेतकरी दिवसेंदिवस कर्जात बुडत आहेत, बियाणे महाग आहेत, खते महाग आहेत, डिझेल महाग आहे.. पण किमान आधारभूत किमतीची हमी नाही.

Rahul Gandhi on Maharashtra Farmer: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi on Maharashtra Farmer) यांनी मोदी सरकारवर आणि महायुती सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या दुर्दशेबद्दल उदासीन आहे, तर शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली अधिकाधिक बुडत आहेत. एक्सवरील एका पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी सरकारवर कर्जमाफी आणि पिकांसाठी किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. त्यांनी लिहिले की, "कल्पना करा... महाराष्ट्रात फक्त तीन महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही फक्त एक आकडेवारी आहे का? नाही. ही 767 उद्ध्वस्त घरे आहेत. 767 कुटुंबे जी कधीही सावरू शकणार नाहीत आणि सरकार? गप्प आहे. उदासीनतेने पाहत आहे." 'शेतकरी दिवसेंदिवस कर्जात बुडत आहेत'

राहुल गांधी म्हणाले की, "शेतकरी दिवसेंदिवस कर्जात बुडत आहेत, बियाणे महाग आहेत, खते महाग आहेत, डिझेल महाग आहे.. पण किमान आधारभूत किमतीची हमी नाही. जेव्हा ते कर्जमाफीची मागणी करतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण ज्यांच्याकडे कोटी आहेत? मोदी सरकार त्यांचे कर्ज सहजपणे माफ करते. आजच्या बातम्या पहा, अनिल अंबानींचा 48 हजार कोटी रुपयांचा एसबीआय घोटाळा.

'शेतकऱ्याचे आयुष्य अर्धे होत आहे'

ते म्हणाले, "पंतप्रधान मोदी म्हणाले होते की ते शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करतील, आज परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याचे आयुष्य अर्धे होत आहे. ही व्यवस्था शेतकऱ्यांना मारत आहे. शांतपणे, पण सतत आणि मोदीजी स्वतःच्या जनसंपर्काचा तमाशा पाहत आहेत."

महाराष्ट्र विधानसभेतून विरोधी पक्षाचा सभात्याग

दरम्यान, काल बुधवारी राज्यातील शेतकरी आत्महत्या आणि सोयाबीन शेतकऱ्यांना थकबाकी न मिळाल्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी महाराष्ट्र विधानसभेतून दोनदा सभात्याग केला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सांगितले की, या वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान महाराष्ट्रात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांनी सांगितले की 200 प्रकरणे मदतीसाठी अपात्र घोषित करण्यात आली आहेत, तर 194 प्रकरणांमध्ये चौकशी प्रलंबित आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MGNREGA : 'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
Devendra Fadnavis: इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती

व्हिडीओ

Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले
Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | 15 DEC 2025 : ABP Majha
Maharashtra Election Commission PC : पालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार?, ४ वाजता पत्रकार परिषद
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Tejasvee Ghosalkar PC : ठाकरेंना जय महाराष्ट्र, तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MGNREGA : 'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
Devendra Fadnavis: इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, याचा रेकॉर्ड करायचाय; नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा
मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, याचा रेकॉर्ड करायचाय; नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा
Video: सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद यांना रडू कोसळले
Video: सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद यांना रडू कोसळले
Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
Pune Accident News: चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं; बस थेट मेट्रोच्या पिलरला धडकली, मागून आलेल्या ट्रकचीही धडक, शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी
चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं; बस थेट मेट्रोच्या पिलरला धडकली, मागून आलेल्या ट्रकचीही धडक, शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी
Embed widget