एक्स्प्लोर
जेलमध्ये असलेल्या लालू यादव यांच्या विरहात राबडी देवींची कविता
900 कोटींहून जास्त रुपयांच्या चारा घोटाळ्यासंबंधित तीन प्रकरणांमध्ये लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. सध्या ते रांचीच्या बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात बंद आहेत.

पाटणा : बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्व पक्षांचे नेते आपल्या संपूर्ण ताकदीनिशी सभा आणि निवडणूक प्रचारात व्यक्त आहेत. पण बिहारचा मुख्य विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दल (राजद) दुहेरी संकटाचा सामना करत आहे. एकेकाळी बिहारच्या राजकारणाचे केंद्र असलेले आरजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव जेलमध्ये आहेत तर मोठा मुलगा तेजप्रतापने बंडाचं निशाण फडकावलं आहे. या सगळ्यामुळे निराश झालेल्या लालू यादव यांच्या विरहातून पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी एका कविता रचली आहे. राबडी देवीने आपल्या कवितेत अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. त्या लिहितात, 'नैना थोड़े हैं नम दिल में है ज़रा सा गम पर हिम्मत न टूटी न हुआ है हौसला कम बड़बोले पापी को लाएंगे जमीन पर हम इस साज़िश का बदला बदलाव से लेंगे हम कोई कैसे करेगा जुदा कोई कैसे करेगा जुदा जीवन में लालू हैं जन जन में लालू हैं कण कण में लालू हैं हर मन में लालू हैं लालू यादव जेलमध्ये 900 कोटींहून जास्त रुपयांच्या चारा घोटाळ्यासंबंधित तीन प्रकरणांमध्ये लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. सध्या ते रांचीच्या बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात बंद आहेत. हे प्रकरण 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला पशुसंवर्धन मंत्रालयाच्या खजिन्यातून पैशांची अफरातफरी केल्याचं आहे. त्यावेळी झारखंड हा बिहारचाच भाग होता. ज्यावेळी हा कथित घोटाळा झाला, त्यावेळी राजद पक्ष सत्तेत होता आणि लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते. राबडीदेवी यांची कविता
नैना थोड़े हैं नम दिल में है ज़रा सा ग़म पर हिम्मत न टूटी न हुआ है हौसला कम
बड़बोले पापी को लाएंगे ज़मीन पर हम इस साज़िश का बदला बदलाव से लेंगे हम कोई कैसे करेगा जुदा कोई कैसे करेगा जुदा जीवन में लालू है जन जन में लालू है कण कण में लालू है हर मन में लालू है pic.twitter.com/KS7Rvd2TqS — Rabri Devi (@RabriDeviRJD) April 4, 2019
आणखी वाचा























