एक्स्प्लोर

Priyanka Gandhi On Pahalgam Terror Attack: अमित शाहांनी सांगितलं, पहलगाममधील दहशतवाद्यांना ठार केलं; पण प्रियंका गांधींच्या प्रश्नानं संपूर्ण सभागृह शांत, नेमकं काय घडलं?

Priyanka Gandhi On Pahalgam Terror Attack: लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले होते. पण सरकारने त्यांना देवाच्या भरोशावर सोडले, अशी टीका प्रियंका गांधींनी केली.

Priyanka Gandhi On Pahalgam Terror Attack नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला (Pahalgam Terror Attack) करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज लोकसभेत दिली. लोकसभेत कालपासून ऑपरेशन सिंदूरवर (Opration Sindhoor) चर्चा सुरु आहे. आज चर्चेच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी सरकारची बाजू मांडली. यावेळी अमित शाह यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या सुलेमान, जिब्रान आणि अफझल या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचं सांगितलं. पहलगाममध्ये ज्या रायफलने हल्ला करण्यात आला होता, त्याही दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अमित शाह यांनी दिली. 

आपल्या भाषणादरम्यान अमित शाहांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर देखील आरोप केले. पंडित जवाहरलाल नेहरुंनी एकतर्फी शस्त्रसंधी केल्याने आज पाकव्याप्त काश्मीर असल्याचा हल्लाबोल अमित शाहांनी केला. तसेच इंदिरा गांधींनी 1972 मध्ये पीओके परत घेण्याची संधी गमावल्याचा आरोपही अमित शाह यांनी केला. दरम्यान, अमित शाह यांच्या भाषणानंतर काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी भाषण केलं. यावेळी सरकारने सर्व सांगितलं, इतिहासही सांगितला, पण एक गोष्ट राहिली, पहलगाममध्ये हल्ला कसा झाला, तो का झाला? हा प्रश्न अजूनही सतावत आहे, असं प्रियंका गांधी म्हणाल्या. प्रियंका गांधींच्या या प्रश्नानंतर संपूर्ण सभागृह शांत झाल्याचं पाहायला मिळालं. 

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले, युद्ध सुरू होण्यापूर्वीच थांबले- प्रियंका गांधी

प्रियांका गांधी यांनी शुभम द्विवेदी यांच्या पत्नीचा उल्लेख करून म्हटले की, लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले होते. पण सरकारने त्यांना देवाच्या भरोशावर  सोडले. हल्ल्याला कोण जबाबदार आहे? नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी संरक्षणमंत्र्यांची नाही का, ती गृहमंत्र्यांची जबाबदारी नाही का?, असा हल्लाबोल प्रियंका गांधी यांनी केला. सरकारची अशी कोणतीही यंत्रणा नाही ज्याला असा भयानक हल्ला नियोजित असल्याची कल्पना आहे. हे एजन्सींचे अपयश आहे की नाही?, हे मोठे अपयश आहे, अशी टीका प्रियंका गांधींनी केली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले, युद्ध सुरू होण्यापूर्वीच थांबले. हे थांबवण्याची घोषणा आपल्या सरकार किंवा सैन्याने केली नाही तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हे आपल्या पंतप्रधानांच्या बेजबाबदारपणाचे सर्वात मोठे प्रतीक आहे. आज देशाला पोकळ भाषणे ऐकायची नाहीत, त्यांना सर्वकाही जाणून घ्यायचे आहे. 22 एप्रिल रोजी काय घडले हे जाणून घ्यायचे आहे, परंतु तुम्ही (सत्ताधारी पक्ष) स्वतःची पाठ थोपटण्यात व्यस्त आहात, असं प्रियंका गांधींनी सांगितले. 

संबंधित बातमी:

22 मेपासून ट्रेस, सिग्नल मिळताच ठोकलं; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना कसं घेरलं?, अमित शाहांनी सगळं सांगितलं!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tara Sutaria Veer Paharia Breakup: कॉन्सर्टमधील 'तो' व्हिडिओ भारी पडला, तारा अन् वीर पहारियानं घेतला नातं संपवण्याचा निर्णय? ब्रेकअपच्या चर्चांनी चाहतेही शॉक
कॉन्सर्टमधील 'तो' व्हिडिओ भारी पडला, तारा अन् वीर पहारियानं घेतला नातं संपवण्याचा निर्णय? ब्रेकअपच्या चर्चांनी चाहतेही शॉक
Stranger Things season 5 episode 9 update: नेटफ्लिक्सवर स्ट्रेंजर थिंग्सचा आणखी एक एपिसोड येणार? तो शेवट खोटा, Vecna चा डाव कोणालाच कळला नाही?
नेटफ्लिक्सवर स्ट्रेंजर थिंग्सचा आणखी एक एपिसोड येणार? तो शेवट खोटा, Vecna चा डाव कोणालाच कळला नाही?
लेकीच्या सासऱ्यावर आईचा जीव जडला अन् सासरच्या घरातून लेकीलाच हाकलून बाहेर काढलं! जावयाला म्हणाली, माझ्या लेकीचं दुसऱ्यासोबत लफडं सुरुय! आईच्या भलत्याच भानगडीनं संतापलेल्या लेकीनं..
लेकीच्या सासऱ्यावर आईचा जीव जडला अन् सासरच्या घरातून लेकीलाच हाकलून बाहेर काढलं! जावयाला म्हणाली, माझ्या लेकीचं दुसऱ्यासोबत लफडं सुरुय! आईच्या भलत्याच भानगडीनं संतापलेल्या लेकीनं..
Raj Thackeray on Mumbai: राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन

व्हिडीओ

Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Raj Thackeray Majha Katta: भाजपचा मुंबईवर डोळा, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tara Sutaria Veer Paharia Breakup: कॉन्सर्टमधील 'तो' व्हिडिओ भारी पडला, तारा अन् वीर पहारियानं घेतला नातं संपवण्याचा निर्णय? ब्रेकअपच्या चर्चांनी चाहतेही शॉक
कॉन्सर्टमधील 'तो' व्हिडिओ भारी पडला, तारा अन् वीर पहारियानं घेतला नातं संपवण्याचा निर्णय? ब्रेकअपच्या चर्चांनी चाहतेही शॉक
Stranger Things season 5 episode 9 update: नेटफ्लिक्सवर स्ट्रेंजर थिंग्सचा आणखी एक एपिसोड येणार? तो शेवट खोटा, Vecna चा डाव कोणालाच कळला नाही?
नेटफ्लिक्सवर स्ट्रेंजर थिंग्सचा आणखी एक एपिसोड येणार? तो शेवट खोटा, Vecna चा डाव कोणालाच कळला नाही?
लेकीच्या सासऱ्यावर आईचा जीव जडला अन् सासरच्या घरातून लेकीलाच हाकलून बाहेर काढलं! जावयाला म्हणाली, माझ्या लेकीचं दुसऱ्यासोबत लफडं सुरुय! आईच्या भलत्याच भानगडीनं संतापलेल्या लेकीनं..
लेकीच्या सासऱ्यावर आईचा जीव जडला अन् सासरच्या घरातून लेकीलाच हाकलून बाहेर काढलं! जावयाला म्हणाली, माझ्या लेकीचं दुसऱ्यासोबत लफडं सुरुय! आईच्या भलत्याच भानगडीनं संतापलेल्या लेकीनं..
Raj Thackeray on Mumbai: राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत काल हद्दपार झालेला राष्ट्रवादीचा उमेदवार आज समर्थकांसह थेट अजित पवारांसमोर प्रकटला; दादांनी मग नेमकं काय केलं?
सांगलीत काल हद्दपार झालेला राष्ट्रवादीचा उमेदवार आज समर्थकांसह थेट अजित पवारांसमोर प्रकटला; दादांनी मग नेमकं काय केलं?
काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल
काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
Iran Crisis: इराणमध्ये महागाईविरोधात 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका, आठ मुलांसह 45 जणांचा जीव गेला; तेहरान विमानतळ, इंटरनेट अन् फोनसेवाही बंद
इराणमध्ये महागाईविरोधात 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका, आठ मुलांसह 45 जणांचा जीव गेला; तेहरान विमानतळ, इंटरनेट अन् फोनसेवाही बंद
Embed widget