एक्स्प्लोर

शिवसेना इफेक्ट : एनडीएतील सहकाऱ्यांची धाकधूक वाढली; संवाद संपत असल्याची खंत

सत्तास्थापनेच्या संघर्षातून शिवसेना राज्यासह केंद्रातील युतीमधूनही बाहेर पडली आहे. याचा परिणाम आता एनडीएतील घटकपक्षांवर होताना दिसत आहे. परिणामी मित्रपक्षातील संवाद वाढवा यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षातून शिवसेना केंद्रातील एनडीए सरकारमधून बाहेर पडली आहे. याचा परिणाम आता एनडीएतील अन्य घटकपक्षांवर होत असलेला दिसून येत आहे. शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्यानंतर घटकपक्षांची चिंता वाढली आहे. एनडीएतील मित्रपक्षांमध्ये संवाद कमी होत असल्याने त्याचा परिणाम युतीवर होण्याची शक्यता घटकपक्षांना वाटत आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेत समसमान वाटपाच्या मुद्यावरुन शिवसेना राज्यातील युतीतून बाहेर पडली आहे. तर, शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने शिवसेना केंद्रातील एनडीए सरकारमधूनही बाहेर पडली. शिवसेना एनडीएमधून बाहेर पडल्याने इतर घटकपक्षांची धाकधूक वाढली आहे. एनडीएत संवाद वाढायला हवा - बिहारमधील जेडीयूच्या एका नेत्याने एनडीएत संवाद कमी होत असल्याचे वक्तव्य केले आहे. यावर लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी चिंता व्यक्त केली आहे. याविषयी एबीपी न्यूजशी बोलताना चिराग पासवान म्हणाले, की जर कोणाला युतीमध्ये समन्वय कमी असल्याचे वाटत असेल, तर सर्वांनी त्याच्या तक्रारीचे निवारण करायला हवे. पुढे ते म्हणाले, की ज्याप्रमाणे अधिवेशनाच्या अगोदर युतीतील मित्रपक्षांची बैठक घेतली जाते. त्याप्रकारच्या बैठकी वाढवण्याची गरज आहे. जेडीयूची समन्वय समिती तयार करण्याची मागणी एनडीएतील मित्रपक्षांमध्ये संवादाची कमतरता जाणवत आहे, ती दूर करण्यासाठी पूर्वीसारखी समन्वय समिती तयार करण्याची गरज आहे, अशी माहिती जेडीयूचे प्रधान महासचिव सी त्यागी यांनी मंगळवारी एबीपी न्यूजशी बोलताना दिली. राम मंदिर, तिेहेरी तलाक, एनआरसी आणि समान आचार संहिता सारख्या महत्वाच्या मुद्यांवरही मित्रपक्षांमध्ये चर्चा झाली नाही. जे एनडीएसाठी चांगले नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी एनडीएचे घोषणापत्र प्रदर्शित करण्याची मागणी केली आहे. एनडीएच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो निर्णय सूत्रांच्या माहितीनुसार, 18 नोव्हेंबर दिवशी सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनाच्या आधी एनडीएची बैठक होणार आहे. यामध्ये युतीत समन्वय समिती तयार करण्याची मागणी घटकपक्ष करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळूनही सत्तास्थापन करता आली नाही. त्यामुळं शिवसेना एनडीएतून बाहेर पडली. झारखंडमध्ये होणाऱ्या निवडणुकीतही एनडीएतील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरुन एकवाक्यता झालेली नाही. त्यानंतर भाजप वगळता एनडीएतील अन्य मित्रपक्ष अशीच मागणी करत आहे. संबंधित बातम्या - नरेंद्र मोदींपासून सत्य का लपून ठेवले? अमित शाहांना संजय राऊतांचा सवाल शिवसेनेचा आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचंच डोकं फुटेल : दिलीप लांडे शिवसेना आमदारांना मतदारसंघात परतण्याचे आदेश; आता सत्तास्थापनेलाच परत येणार

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget