एक्स्प्लोर

जुन्या विचाराने गेलो असतो तर राम मंदिर, करतारपुर प्रश्न सुटले नसते; मोदींची काँग्रेसवर टीका

आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण दिलं. यावेळी सरकारमधील विकासकामांचा पाढा त्यांनी वाचला.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या विचाराने गेलो असतो तर देश बदलला नसता, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिलेल्या भाषणात केलंय. जुन्या विचारांनी गेलो असतो तर देश बदलला नसता अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता केली. आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं लोकसभेत अभिभाषण झालं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत भाषण केलं. राष्ट्रपतींचे अभिभाषण देशाला नवी दिशा देणारं असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. विकासकामामुळेच जनतेने पुन्हा काम करण्याची संधी दिल्याचेही त्यांनी सांगितले. करतारपुर कॉरिडोर, राम मंदिर, असे प्रश्न जुन्या मार्गाने गेलो असतो तर सुटले नसते, असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण दिलं. यावेळी भाजप सरकारच्या काळात झालेल्या विकासकामांचा पाढा त्यांनी वाचून दाखवला. मोदींनी आपल्या भाषणातून नव्या भारताचं चित्र मांडलं. राष्ट्रपतींचं भाषण देशाला नवी दिशा देणारं आहे. त्याचबरोबर लोकांमध्ये विश्वासाचं वातावरण तयार करणार असल्याचे मोदी म्हणाले. भाजप पदाधिकाऱ्याला धमकवल्याप्रकरणी अपक्ष आमदाराला अटक आणि सुटका मोदींच्या भाषणातील मुख्य मुद्दे - मोदींच्या भाषणात यावेळी ईशान्य भारताचा उल्लेख अधिक होता. केंद्र सरकारच्या कामामुळे ईशान्य भारतात नवी पहाट उगवल्याचे मोदी म्हणाले. ईशान्य भारतातील राज्यांना जी दिल्ली मागील पाच वर्ष दूर वाटत होती ती आता जवल आलीय वीज असो, रेल्वे असो, विमानतळ असो, मोबाइल कनेक्टिव्हिटी असो, आम्ही हे सर्व करण्याचा प्रयत्न केला आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास वाढावा, देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूती मिळावी यासाठी आम्ही पावलं उचलल्याचं सांगितले. तुमच्यासाठी गांधीजी ट्रेलर असतील मात्र आमच्यासाठी आयुष्य आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही कटकटीविना थेट त्यांच्या खात्यात पैसे जातायेत. विकासकामामुळेच आम्हाला पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. आम्हीही तुमच्याच रस्त्यानं चालत राहिलो असतो, तर 70 वर्षानंतरही 370 कलम हटवलं गेलं नसतं. तुमच्याप्रमाणेच काम केलं असतं, तर मुस्लीम महिलांना आजही तिहेरी तलाकची भिती वाटत राहिली असती. राम जन्मभूमी वाद आणि कतारपूर साहिब कॉरिडॉरही झाला नसता. तुमच्याच मार्गानं चालत राहिलो असतो, तर भारत-बांगलादेश वाद कधीच सुटला नसल्याचे सांगत मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. Raj Thackeray | राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना पाठिंबा | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhar Bhojshala : धार भोजशाळेत आता निर्बंधांशिवाय सरस्वती पूजेला परवानगी; ASI चे सर्व जुने आदेश रद्द
धार भोजशाळेत आता निर्बंधांशिवाय सरस्वती पूजेला परवानगी; ASI चे सर्व जुने आदेश रद्द
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget