एक्स्प्लोर

इंडिया हटवून भारत करा; देशाचं नाव बदलण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका

अलाहाबादचं प्रयागराज... फैजाबादचं अयोध्या... बॉम्बेचं मुंबई.. कलकत्ताचं कोलकाता झाल्यानंतर आता मागणी आहे, इंडियाचं भारत करण्याची...अनेक शहरांची नावं गेल्या काही वर्षात बदलली, पण आता थेट देशाचंच नाव बदलण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झालीय.

नवी दिल्ली : नामकरण, नामांतरासारखे विषय राजकारणात अनेकदा भावनिक वादळं तयार करतात. सध्या तर देशाचंच नाव बदलण्यासाठी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली. दिल्लीतल्या एका नागरिकानं देशाचं नाव इंडियाऐवजी भारत करावं अशी मागणी जनहित याचिकेतून केलीय. लवकरच यावर सुनावणीही होणार आहे.

अलाहाबादचं प्रयागराज... फैजाबादचं अयोध्या... बॉम्बेचं मुंबई.. कलकत्ताचं कोलकाता झाल्यानंतर आता मागणी आहे, इंडियाचं भारत करण्याची...अनेक शहरांची नावं गेल्या काही वर्षात बदलली, पण आता थेट देशाचंच नाव बदलण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झालीय. दिल्लीतल्या एका नागरिकानं दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात 3 जून रोजी सुनावणी होणार आहे. इंडिया हे ब्रिटीशांनी दिलेलं नाव आहे. या नावातून गुलामगिरीचा प्रत्यय येतो. त्यामुळे हे नाव बदलण्यात यावं अशी मागणी याचिकाकर्त्यानं केली आहे.

नावात काय आहे असं शेक्सपियरनं म्हटलं असलं तरी भारतीय राजकारणात मात्र अनेकदा अस्मितेच्या राजकारणासाठी या नामकरणाचा वापर झालेला आहे. खरंतर आत्ता देशात इंडिया आणि भारत ही दोनही नाव प्रचलित आहेत..गरीब श्रीमंतीचा भेद दाखवण्यासाठी या दोन नावांचा वापर रुपकासारखा केला जातो. इंडिया हे ब्रिटीश राजवटीतलं नाव तर हिंदुस्थान हे मुघल काळातलं प्रचलित नाव. तर पुराणांमध्ये मात्र भारतभूमी किंवा भारतवर्ष असा उल्लेख असल्याचं याचिकेत म्हटलं आहे.

काय म्हणणं आहे याचिकाकर्त्याचं?

आपल्या घटनेनं इंडिया आणि भारत ही दोनही नावं देशासाठी स्वीकारली आहेत. घटनेच्या पहिल्या कलमाची सुरुवातच India that is bharat shall be union of states या वाक्यानं होते. घटना स्वीकारण्यापूर्वी 8 दिवस आधी देशाच्या नावावर संविधान सभेतही वादळी चर्चा झाली होती. भारत, भारतवर्ष, भारतभूमी अशीही नावं त्यावेळी समोर आली होती. पण या नावांचा प्रस्ताव मान्य झाला नाही. त्याऐवजी इंडिया आणि भारत ही दोन्ही नावं स्वीकारली गेली. पण आता या दोन नावांपैकी इंडिया हे नाव रद्द करुन केवळ एकच नाव ठेवण्यात यावं अशी मागणी याचिकाकर्त्यानं केली आहे.

मोदी सरकारच्या अनेक महत्वकांक्षी योजनांमध्ये इंडिया हाच शब्द आहे. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया. 2014 मध्ये योगी आदित्यनाथ खासदार होते, तेव्हाही त्यांनी लोकसभेत देशाचं नाव बदलून भारत करण्यासाठी खासगी विधेयक लोकसभेत आणलं होतं. सुप्रीम कोर्टात उद्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. कोर्ट याबद्दल काय मत व्यक्त करतं याची उत्सुकता आहेच.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget