एक्स्प्लोर

गायीचे दूध की शाकाहारी दूध? शाकाहारी दूध आहे तरी काय?

गाईच्या दुधाच्या ऐवजी वॅगन मिल्क म्हणजेच शाकाहारी दूध उत्पादनाकडे वळावे त्यातच भविष्य आहे असे पेटा ने एका पत्राद्वारे अमूल कंपनीला कळवले आहे.

मुंबई : पेटा म्हणजेच पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स या संस्थेने भारतातल्या सर्वात मोठ्या सहकारी तत्त्वावरील दूध उत्पादक कंपनीला एक अजब सल्ला दिला आहे. अमूल या कंपनीने आता गाईच्या दुधाच्या ऐवजी वॅगन मिल्क म्हणजेच शाकाहारी दूध उत्पादनाकडे वळावे त्यातच भविष्य आहे असे पेटा ने एका पत्राद्वारे अमूल कंपनीला कळवले आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. 

अमूल कंपनीच्या सीईओ आर. एस. सोडी यांनी मात्र पेटा ने दिलेल्या या सल्ल्याचा विरोध केलाय. सोधी यांनी जागरण मंचचे राष्ट्रीय सहसंयोजक अश्विनी महाजन यांनी केलेल्या ट्विटला रिट्विट करत आपला पाठिंबा दिला आहे. 

सोडी म्हणतात, 'जर अमूल कंपनीने गाईच्या दुधाचे उत्पादन थांबवलं तर भारतातल्या 10 कोटी शेतकऱ्यांना रोजगार कोण देणार? आपल्याला माहिती नाही का बहुतेक दूधउत्पादक शेतकरी भूमिहीन असतात. आपल्या सल्यामुळे त्यांचे उपजीविकेचे एकमेव साधन नष्ट होईल. आपल्या परंपरेतच दुधाचा वापर आहे. त्यामुळे शाकाहारी दुधाच्या मागे लागणे योग्य नाही'.

अमूल कंपनीच्या प्रतिक्रियेवर देखील पेटा इंडियाकडे उत्तर आहे. 'शाकाहारी दुधाकडे मिळाल्यास शेतकऱ्यांचे रोजगार जाणार नाहीत उलट यामुळे प्राण्यांवर होणारे अत्याचार थांबतील आणि दुधापासून आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम देखील होणार नाहीत. भारतात गायींना दूध देण्यासाठी त्रास दिला जातो, त्यांना दुभते ठेवले जाते, जेव्हा त्यांचे शरीर दूध देणे बंद करते तेव्हा त्यांना कत्तलखान्यात विकले जाते आणि मांस मिळवले जाते', असे पेटा इंडियाचे म्हणणे आहे.

Covid-19 : कोरोनापासून बचाव अन् रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयनं सांगितले उपाय

महाराष्ट्र दूध उत्पादनात देशातील एक अग्रेसर राज्य मानले जाते. 2020 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दिवसाला एक कोटी 40 लाख लीटर इतक्या दुधाचे उत्पादन होते. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या दोन हजार अठरा एकोणीस च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 11 हजार 655 टन इतके वार्षिक दूध उत्पादन केले जाते. त्यामुळे दूध उत्पादनावर अवलंबून असणारे शेतकरी देखील लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात आहेत. त्यांना मात्र हा सल्ला मुळीच पटलेला नाही. 

पेटा इंडिया ने सांगितलेले शाकाहारी दूध म्हणजे नेमके काय ? 

शाकाहारी दुधाचे अनेक प्रकार सध्या जगात उपलब्ध आहेत. शाकाहारी दूध हे नारळ काजू बदाम आणि मुख्यतः सोया पासून बनवली जाते. सध्या बाजारात अनेक नागरिक या दुधाला पसंती देत आहेत. गाईच्या दुधापेक्षा शाकाहारी दूध हे जास्त फायदेशीर असते असा दावा देखील पेटा इंडिया ने केला आहे. 

पेटा इंडिया ने दिलेला सल्ला अमूल इंडिया कंपनीने धुडकावून लावला असला तरी, यावर चर्चा ही होणारच. गाईला देवी म्हणून पूजा करणाऱ्या भारतात तिच्यापासून मिळालेले दूध प्रसाद म्हणून पिण्याची परंपरा आहे. मग असा भारत बदलेल का? 

श्रीकृष्ण हा देखील गवळी होता. त्यामुळे गाय आणि तिच्यापासून मिळणारे दूध याचा संबंध हा थेट अध्यात्माशी जोडला गेला आहे. इतकेच नाही तर भारतीय शेतकरी आर्थिक दृष्ट्या देखील गाईंवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. म्हणूनच गाईला कामधेनू म्हटले जाते, मग अशा या भारतात पेटा इंडियाने सांगितल्याप्रमाणे खरंच बदल होऊ शकेल का हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal Assam Election Results 2026 Live Updates : बंगाल-आसामध्ये बदल होणार? बंगालमध्ये ममता बॅनर्जींची प्रतिष्ठा पणाला, आसामध्ये काँग्रेसला कमबॅकची आशा
बंगाल-आसामध्ये बदल होणार? बंगालमध्ये ममता बॅनर्जींची प्रतिष्ठा पणाला, आसामध्ये काँग्रेसला कमबॅकची आशा
धक्कादायक! धावत्या विमानातून प्रवाशाने मारली उडी, चेन्नई विमानतळावर घडली घटना, नेमकं काय घडलं?
धक्कादायक! धावत्या विमानातून प्रवाशाने मारली उडी, चेन्नई विमानतळावर घडली घटना, नेमकं काय घडलं?
Assam Election : आसाममध्ये भाजपची हॅट्रिक की काँग्रेसचा उलटफेर? काहीच वेळात होणार फैसला
आसाममध्ये भाजपची हॅट्रिक की काँग्रेसचा उलटफेर? काहीच वेळात होणार फैसला
Tamil Nadu : सुपरस्टार विजयच्या एन्ट्रीनं कोणाला चिंता? दक्षिणेत सट्टाबाजार नेमकं कुणाच्या बाजूनं?
सुपरस्टार विजयच्या एन्ट्रीनं कोणाला चिंता? दक्षिणेत सट्टाबाजार नेमकं कुणाच्या बाजूनं?

व्हिडीओ

Special Report on Marathwada Disel Crisis : मराठवाड्यात आधी पाणीटंचाई, आता इंधन तुटवडा
Pune Nasarapur Case Special Report : नसरापूरच्या घटनेनं महाराष्ट्राचं काळीज हेलावलंय, शिक्षा कधी?
Mahayuti Issue 2029 Election Special Report : ३ वर्षांनंतरची निवडणूक; स्वबळाची भाषा, २०२९ ची दिशा?
New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?
Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
Kerala Elections : आमदार झाल्यासारखं वाटतंय,निकाल जाहीर होण्याआधीच भाजप नेत्याकडून 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
भाजप नेत्याकडून विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
EPFO :  पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता, सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट, केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता
Rajasthan Royals New Owner : आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, लक्ष्मी मित्तल बनले नवे मालक, किती पैसे खर्च केले?
आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, किती कोटींना झाली डील?
Vinesh Phogat Brij Bhushan Singh: 'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Embed widget