एक्स्प्लोर

Pakistan Hina Rabbani: पंतप्रधान मोदींमुळे पाकिस्तानचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही; हिना रब्बानी खार असं काय म्हणाल्या...

Hina Rabbani On Narendra Modi : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकले आहेत. 

Pakistan Hina Rabbani On Indo-Pak Relation: आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांचे सरकार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून 6.5 दशलक्ष डॉलर्सचे बेलआउट पॅकेज (Pakistan Latest News) मिळावं म्हणून सातत्याने प्रयत्नशील आहेत, पंण त्यांच्या या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. यावर आता पाकिस्तानेच्या  परराष्ट्र सचिव हिना रब्बानी खार यांनी एक वक्तव्य केलंय. पाकिस्तानला भारतासोबत व्यापार करायचा आहे, पण नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत ते शक्य नाही असं त्या म्हणाल्या. 

पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव हिना रब्बानी खार (Hina Rabbani Latest News) यांनी अमेरिकन वेबसाइट पॉलिटिकोला मुलाखत देताना सांगितले की, आम्ही भारतासोबत व्यापार पुन्हा सुरू करण्याचे स्वागत करू,पण पंतप्रधान नरेंद्र मोदी तसे करण्याची शक्यता नाही. भारताच्या वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते डिसेंबर 2022 दरम्यान भारत-पाकिस्तानचा व्यापार 1.35 अब्ज डॉलर्स इतका होता. तर पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या चीनसोबतचा भारताचा व्यापार 87 दशलक्ष डॉलर्स इतका होता.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली असून पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर उभा आहे. त्यामुळे पाकिस्तान आता आंतरराष्ट्रीय मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. 

Pakistan Hina Rabbani : भारतात हिंदू राष्ट्रवादी प्रशासन

भारताशी संबंध पूर्ववत करण्याबाबत बोलताना हिना रब्बानी खार म्हणाल्या की, भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध सुधरायचे असतील तर व्यापार हा एकमेव मार्ग आहे. पण भारतात सध्या हिंदू राष्ट्रवादी प्रशासन आहे आणि त्या सरकारकडून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडायचं काम सुरू आहे. भारताच्या सध्याच्या सरकारमध्ये काहीही योग्य असू शकत नाही. तेथे विशेष लोक सत्तेत आहेत. समस्या कशी सोडवायची हे त्यांना कळत नाही. ते फक्त समस्या वाढवतात.

पाकिस्तानी राजकारण्यांचे वादग्रस्त वक्तव्य

अलिकडच्या काही महिन्यांत पाकिस्तानी राजकारणी भारताविरोधात सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी 2002 मध्ये झालेल्या जातीय दंगलीच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र असल्याचं म्हटले होते.

भारताची पाकिस्तानबद्दलची भूमिका स्पष्ट आहे. पाकिस्तान जोपर्यंत भारतातील दहशतवादी कारवाया थांबवत नाही, जोपर्यंत दहशतवाद्यांना आश्रय देण्याचं बंद करत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणतीही चर्चा न करण्याची भूमिका भारताने घेतली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकले आहेत. 

ही संबंधित बातमी वाचा: 



आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती 
1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती 
LPG Gas Crisis: मोठी बातमी : राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार; व्यावसायिकांना मोठा दिलासा
राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार; व्यावसायिकांना मोठा दिलासा
PM Modi: पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
The Indian Navy new stealth warship Taragiri: भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट
भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget