एक्स्प्लोर

Pakistan Hina Rabbani: पंतप्रधान मोदींमुळे पाकिस्तानचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही; हिना रब्बानी खार असं काय म्हणाल्या...

Hina Rabbani On Narendra Modi : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकले आहेत. 

Pakistan Hina Rabbani On Indo-Pak Relation: आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांचे सरकार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून 6.5 दशलक्ष डॉलर्सचे बेलआउट पॅकेज (Pakistan Latest News) मिळावं म्हणून सातत्याने प्रयत्नशील आहेत, पंण त्यांच्या या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. यावर आता पाकिस्तानेच्या  परराष्ट्र सचिव हिना रब्बानी खार यांनी एक वक्तव्य केलंय. पाकिस्तानला भारतासोबत व्यापार करायचा आहे, पण नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत ते शक्य नाही असं त्या म्हणाल्या. 

पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव हिना रब्बानी खार (Hina Rabbani Latest News) यांनी अमेरिकन वेबसाइट पॉलिटिकोला मुलाखत देताना सांगितले की, आम्ही भारतासोबत व्यापार पुन्हा सुरू करण्याचे स्वागत करू,पण पंतप्रधान नरेंद्र मोदी तसे करण्याची शक्यता नाही. भारताच्या वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते डिसेंबर 2022 दरम्यान भारत-पाकिस्तानचा व्यापार 1.35 अब्ज डॉलर्स इतका होता. तर पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या चीनसोबतचा भारताचा व्यापार 87 दशलक्ष डॉलर्स इतका होता.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली असून पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर उभा आहे. त्यामुळे पाकिस्तान आता आंतरराष्ट्रीय मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. 

Pakistan Hina Rabbani : भारतात हिंदू राष्ट्रवादी प्रशासन

भारताशी संबंध पूर्ववत करण्याबाबत बोलताना हिना रब्बानी खार म्हणाल्या की, भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध सुधरायचे असतील तर व्यापार हा एकमेव मार्ग आहे. पण भारतात सध्या हिंदू राष्ट्रवादी प्रशासन आहे आणि त्या सरकारकडून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडायचं काम सुरू आहे. भारताच्या सध्याच्या सरकारमध्ये काहीही योग्य असू शकत नाही. तेथे विशेष लोक सत्तेत आहेत. समस्या कशी सोडवायची हे त्यांना कळत नाही. ते फक्त समस्या वाढवतात.

पाकिस्तानी राजकारण्यांचे वादग्रस्त वक्तव्य

अलिकडच्या काही महिन्यांत पाकिस्तानी राजकारणी भारताविरोधात सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी 2002 मध्ये झालेल्या जातीय दंगलीच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र असल्याचं म्हटले होते.

भारताची पाकिस्तानबद्दलची भूमिका स्पष्ट आहे. पाकिस्तान जोपर्यंत भारतातील दहशतवादी कारवाया थांबवत नाही, जोपर्यंत दहशतवाद्यांना आश्रय देण्याचं बंद करत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणतीही चर्चा न करण्याची भूमिका भारताने घेतली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकले आहेत. 

ही संबंधित बातमी वाचा: 



महत्त्वाच्या बातम्या

सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
30 भारतीयांचा मृत्यू, महागाईत 2.5 टक्क्यांची वाढ, अमेरिका-इराण युद्धात भारताचे नेमके किती झाले नुकसान?
30 भारतीयांचा मृत्यू, महागाईत 2.5 टक्क्यांची वाढ, अमेरिका-इराण युद्धात भारताचे नेमके किती झाले नुकसान?
Nitin Gadkari : 'आता हवेत उडणारी बस आणणार'; E20 नंतर काय आहे गडकरींचा प्लॅन? स्वतः सांगितलं
'आता हवेत उडणारी बस आणणार'; E20 नंतर काय आहे गडकरींचा प्लॅन? स्वतः सांगितलं
Aamir Khan Controversy : 'जो आमीर खानला संपवेल, त्याला 5 कोटी देणार'; जगद्गुरु परमहंस आचार्यांचे वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंच्या भूमिकेचं समर्थन
'जो आमीर खानला संपवेल, त्याला 5 कोटी देणार'; जगद्गुरु परमहंस आचार्यांचे वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंच्या भूमिकेचं समर्थन

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget