एक्स्प्लोर

भारत-पाक सीमेवर हालचालींना वेग, सरकार घेणार मोठा निर्णय? शेतकऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam terrorist attack) 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

Pahalgam terrorist attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam terrorist attack) 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यानंतर पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. BSF जवानांनी सुरक्षा आणि गस्त वाढवली आहे. दरम्यान, BSF ने सीमेवरील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आदेश देखील दिलेत.  शेतकऱ्यांनी कुंपणाजवळ लावलेली गव्हाची कापणी दोन दिवसांत पूर्ण करुन शेत खाली करण्याचे आदेश देण्यात आलेत. 

पहलगाम हल्ल्यानंतर पंजाबमधील भारत पाकिस्तान सीमेवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सैन्याच्या हालचाली वाढल्या असून गावकऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमृतसर, फिरोजपूर, गुरदासपूर, पठाणकोट हे जिल्हे पाकिस्तानच्या सीमेला लागून आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यामुळे BSF ने सीमेवरील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. शेतकऱ्यांनी कुंपणाजवळ लावलेली गव्हाची कापणी दोन दिवसांत पूर्ण करून शेत खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

सीमेवर सैन्याच्या हालचाली वाढल्या

शेतकऱ्यांनी वेळेत कापणी न केल्यास गेट पूर्णपणे बंद केले जातील, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 48 तासांच्या आत आपली कापणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. BSF च्या आदेशानंतर शेतकऱ्यांनी तातडीने कामाला सुरुवात केली आहे. पंजाबमधील पठाणकोट ते फाजिल्कापर्यंत 553 किलोमीटर लांबीच्या सीमेवर सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. BSF जवानांनी बॉर्डर आणि गावांमधील गस्त वाढवली आहे. गावांमध्ये कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास, तात्काळ पोलीस आणि BSF जवानांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावकऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. BSF च्या क्विक रिएक्शन टीम्स (Quick Reaction Teams) सक्रिय झाल्या आहेत. बॉर्डरवर कोणतीही हालचाल दिसल्यास, थेट गोळी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फिरोजपूरमधील कालू वाला हे गाव सतलज नदीने तीन बाजूंनी वेढलेले आहे. याच्या एका बाजूला पाकिस्तान आहे. गावकऱ्यांनी सांगितले की, भारत-पाक तणावामुळे या गावाला नेहमी सर्वात आधी खाली केले जाते. त्यामुळे येथील नागरिक भयभीत आहेत. ज्या शेतकऱ्यांची जमीन तारेच्या कुंपणाच्या पलीकडे आहे, त्यांना लवकर कापणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

48 तासात गव्हाची कापणी करुन शेत खाली करण्याचे आदेश

पंजाबमधील सीमेलगतच्या गावांमध्ये शेतकऱ्यांना विशेष परवानगी घेऊन शेती करण्याची परवानगी आहे. पीक पेरणी आणि कापणीच्या वेळी BSF जवान त्यांच्यासोबत तैनात असतात. तारेचे कुंपण हे शून्य रेषेच्या खूप आधी आहे. शून्य रेषेवर फक्त खांब (pillar) आहेत. BSF ने शेतकऱ्यांना 48 तासांत गव्हाची कापणी करुन शेत खाली करण्याचे आदेश दिले आहेत. गुरुद्वारातून याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. वेळेत कापणी न केल्यास गेट बंद केले जातील, असे सांगण्यात आले आहे. BSF च्या या आदेशामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

महत्वाच्या बातम्या:

1 दिवसही पाकिस्तानचा भारतासमोर निभाव लागणार नाही, युद्धाच्या बाता मारणाऱ्यांचं खरं वास्तव काय? 7 क्षेत्रात भारताची मोठी आघाडी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
जनतेने तुम्हाला खालून-वरुन पुढून-मागून ओळखलंय, जयकुमार गोरेंचा रामराजेंना टोला, म्हणाले, राजकीय अस्तित्व गमावलेली ही लोक 
जनतेने तुम्हाला खालून-वरुन पुढून-मागून ओळखलंय, जयकुमार गोरेंचा रामराजेंना टोला, म्हणाले, राजकीय अस्तित्व गमावलेली ही लोक 
शिवसेनेची बुलंद तोफ अचानक दोन महिन्यांच्या विश्रांतीवर, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत सुषमा अंधारेची संजय राऊतांसाठी भावूक पोस्ट
शिवसेनेची बुलंद तोफ अचानक दोन महिन्यांच्या विश्रांतीवर, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत सुषमा अंधारेची संजय राऊतांसाठी भावूक पोस्ट
ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकले, पण राहुल गांधींनी सुरुवात करूनही काँग्रेस तळ्यात मळ्यात! सत्याच्या मोर्चात सहभागी होणार की नाही?
ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकले, पण राहुल गांधींनी सुरुवात करूनही काँग्रेस तळ्यात मळ्यात! सत्याच्या मोर्चात सहभागी होणार की नाही?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Protest Politics: 'हा सत्याचा नाही, असत्याचा मोर्चा', MVA-MNS च्या मोर्चावर भाजपचे Navnath Ban कडाडले
Gunratna Sadavarte : 'मुंबईत फक्त संविधान चालतं, ठाकरे नाही', सदावर्ते आक्रमक
Chandrapur Tiger Attack : चंद्रपूरमध्ये वाघिणीचे हल्ले,प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, थरारक व्हिडीओ
Solapur News : 'बेकायदेशीर कर्ज नाकारल्याने छळ', Solapur च्या Kistt Finance मधील 10 जणांवर गुन्हा
Goa Hostage Drama: 'जी Story सांगितली, तीच त्याने प्रत्यक्षात केली'; अभिनेत्री Ruchita Jadhav चा धक्कादायक खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
जनतेने तुम्हाला खालून-वरुन पुढून-मागून ओळखलंय, जयकुमार गोरेंचा रामराजेंना टोला, म्हणाले, राजकीय अस्तित्व गमावलेली ही लोक 
जनतेने तुम्हाला खालून-वरुन पुढून-मागून ओळखलंय, जयकुमार गोरेंचा रामराजेंना टोला, म्हणाले, राजकीय अस्तित्व गमावलेली ही लोक 
शिवसेनेची बुलंद तोफ अचानक दोन महिन्यांच्या विश्रांतीवर, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत सुषमा अंधारेची संजय राऊतांसाठी भावूक पोस्ट
शिवसेनेची बुलंद तोफ अचानक दोन महिन्यांच्या विश्रांतीवर, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत सुषमा अंधारेची संजय राऊतांसाठी भावूक पोस्ट
ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकले, पण राहुल गांधींनी सुरुवात करूनही काँग्रेस तळ्यात मळ्यात! सत्याच्या मोर्चात सहभागी होणार की नाही?
ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकले, पण राहुल गांधींनी सुरुवात करूनही काँग्रेस तळ्यात मळ्यात! सत्याच्या मोर्चात सहभागी होणार की नाही?
Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आका देवेंद्र फडणवीस, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप, पूर्णवेळ गृहमंत्र्याची मागणी
महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आका देवेंद्र फडणवीस, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप, पूर्णवेळ गृहमंत्र्याची मागणी
आठ महिन्यानंतरची कर्जमाफी शेतकऱ्यांना कशी फायद्याची? बच्चू कडू यांनी उदाहरणासह सांगितलं
आठ महिन्यानंतरची कर्जमाफी शेतकऱ्यांना कशी फायद्याची? बच्चू कडू यांनी उदाहरणासह सांगितलं
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव; सुषमा अंधारेंनी आणखी एक पुरावा समोर आणला
डॉक्टर तरुणीवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव; सुषमा अंधारेंनी आणखी एक पुरावा समोर आणला
Mohammad Azharuddin: टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
Embed widget