एक्स्प्लोर

21 November In History : स्वतंत्र भारताचे पहिले टपाल तिकीट जारी, ग्रामोफोनचा लागला शोध

Today Dinvishesh: 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताच्या सरकारने पहिले टपाल तिकीट जारी केले. ज्याची किंमत साडेतीन आणे निश्चित करण्यात आली. 'जय हिंद' या नावाने जारी झालेल्या या टपाल तिकिटावर मध्यभागी तिरंग्याचे चित्र होते.

On This Day In History : 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताच्या सरकारने पहिले टपाल तिकीट जारी केले. ज्याची किंमत साडेतीन आणे निश्चित करण्यात आली. 'जय हिंद' या नावाने जारी झालेल्या या टपाल तिकिटावर मध्यभागी तिरंग्याचे चित्र होते. तर डावीकडे इंग्रजीत त्याची किंमत म्हणजे साडेतीन आणे लिहिली होती. तिरंग्याच्या खाली 'इंडिया' लिहिलेले होते आणि तिरंग्याशेजारी 15 ऑगस्ट 1947 लिहिलेले होते. टपाल तिकीट म्हणावं, असा तो निळ्या रंगाचा कागदाचा छोटासा तुकडा होता. पण खरं तर इतिहासाच्या पानांवरील स्वतंत्र भारताची पहिली स्वाक्षरी, संपूर्ण जगासमोर भारताच्या विजयाची घोषणा करणारा होता. 

1877: ग्रामोफोनचा शोध लागला

1877 मध्ये थॉमस अल्वा एडिसन यांनी जगातील पहिला फोनोग्राफ बनवला. या फोनोग्राफमध्ये आवाज रेकॉर्ड करून आणि नंतर एकला जाऊ शकत होता. हा एक अपघाती शोध होता. एडिसन टेलिग्राफ आणि टेलिफोनशी संबंधित शोध लावत होते. कागदाच्या टेपवर संदेश रेकॉर्ड करण्यासाठी आणि नंतर ते टेलीग्राफद्वारे पाठवण्यासाठी ते एक मशीन बनवत होते. याचदरम्यान, त्यांना त्यांचाच रेकॉर्ड केलेला आवाज पुन्हा ऐकू आला. एडिसनने "मेरी हॅड अ लिटल लँब" कविता गात रेकॉर्ड केली आणि पुन्हा ऐकली. फोनोग्राफ नंतर ग्रामोफोन म्हणून ओळखला जाऊ लागला.

1926: हिंदी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते प्रेमनाथ यांचा जन्म

अभिनेता प्रेमनाथ यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1926 रोजी पेशावर येथे झाला. प्रेमनाथ हे बॉलीवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. जवळपास 250 चित्रपटांमध्ये काम केलेल्या प्रेमनाथ यांनी 'जॉनी मेरा नाम', 'धर्मात्मा', 'बरसात', 'कालीचरण', 'प्राण जाए पर वचन न जाए', 'बॉबी' आणि 'लोफर' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1985 मध्ये आलेला 'हम दोनों' हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. 3 नोव्हेंबर 1992 रोजी प्रेमनाथ यांचे निधन झाले.

1939 : मुलायम सिंह यादव जन्मदिन 

मुलायम सिंह यादव यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1939 मध्ये झाला. ते समाजवादी पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष होते. मुलायम सिंह यादव हे आजवर तीन वेळा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री व 1996 ते 1998 दरम्यान केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री देखील राहिले होते. याच वर्षी 10 ऑक्टोबर रोजी त्यांचं निधन झालं.

1955 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 15 आंदोलक हुतात्मा झाले

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या शेवटच्या टप्प्यात आंदोलने, सभा व मोर्चे सुरू झाले होते. तरीही भारत सरकारने या चळवळीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत होते. या चळवळीला मोरारजी देसाई, स. का. पाटील यांनी प्रथमपासून विरोध केल्याचे दिसून येत होता. परंतु जनतेच्या रेट्याने हे आंदोलन यशस्वी करण्यात आले. काँग्रेस वर्कींग कमिटीने त्रिराज्य योजना मांडली. याला संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र विरोध सुरू झाला. 18 नोव्हेंबर 1955 रोजी मुख्यमंत्री मोरारजी देसाई त्रिराज्य योजना मंजुरीसाठी विधानसभेत मांडणार होते. त्या विरोधात सेनापती बापट यांनी प्रचंड मोठा मोर्चा विधानसभेवर काढला. त्याच दिवशी सायंकाळी कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनी 50,000 हजार लोकांची सभा मुंबईत कामगार मैदानात घेतली व त्रिराज्य कल्पना फेटाळली व 21 नोव्हेंबर 1955 रोजी मोरारजी देसाई व स. का. पाटील यांनी मुंबईच्या चौपाटीवर सभा घेतली व त्यावेळी लोकांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या. परंतु मोरारजी देसाई यांनी 'हिंसक मार्गांचा वापर केल्यास मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे सांगितले. स. का. पाटील यांनी 'आकाशात चंद्र तारे आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रालाही मिळणार नाही' अशी घोषणा केली. परिणामी चप्पल, दगड, गोटे यांचा मारा करून त्यांची ही सभा लोकांनी उधळून लावली. 21 नोव्हेंबर 1955 रोजी आंदोलकांनी कामगारांचा संप घडवून आणला. लोक ओव्हल मैदानावर जमू लागले. पोलीस बंदोबस्त कडक होता. मोरारजी देसाई सरकारने जमावबंदी आदेश मांडला. आदेशभंग केल्याबद्दल पोलिसांनी प्रथम लाठीमार केला. अश्रूधूर सोडला. नंतर जमावावर गोळीबार केला. त्यात 15 आंदोलक हुतात्मा झाले व सुमारे 300 लोक जखमी झाले. 400 पेक्षा जास्त लोकांना अटक झाली. (संदर्भ: आजचा महाराष्ट्र, एम.ए भाग -1, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)   

1962: भारत-चीन युद्धाला पूर्णविराम 

20 ऑक्टोबर 1962 रोजी भारत आणि चीनमध्ये युद्ध सुरू झाले. चीनने भारतीय भूभागावर कब्जा केल्याच्या दाव्यानंतर दोन्ही देशांचे लष्कर आमनेसामने आले होते. महिनाभर चाललेल्या या युद्धात भारताच्या 11-12 हजार सैनिकांचा मुकाबला करण्यासाठी चीनने 80 हजारांहून अधिक सैनिक उतरवले होते. पूर्ण महिन्यानंतर, 20 नोव्हेंबर रोजी चीनने युद्धविराम घोषित केला. तसेच वादग्रस्त भागातून माघार घेण्याचे मान्य केले. यानंतर 21 नोव्हेंबर 1962 रोजी युद्ध संपले. या युद्धात भारताचे 1 हजार 383 जवान शहीद झाले. तर 722 चिनी सैनिक मारले गेले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एलपीजी संकटाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी, होर्मुझची सामुद्रधुनी पार करुन दोन जहाजे भारताच्या दिशेने 
एलपीजी संकटाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी, होर्मुझची सामुद्रधुनी पार करुन दोन जहाजे भारताच्या दिशेने 
Petrol Storage Rules : घरात किती पेट्रोल साठवू शकता? मर्यादा ओलांडली तर काय शिक्षा? जाणून घ्या नियम
घरात किती पेट्रोल साठवू शकता? मर्यादा ओलांडली तर काय शिक्षा? जाणून घ्या नियम
Narendra Modi : उर्जा ठिकाणांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत; मोदींची सौदी प्रिन्ससोबत चर्चा, 'होर्मुझ'वर काय ठरलं?
उर्जा ठिकाणांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत; मोदींची सौदी प्रिन्ससोबत चर्चा, 'होर्मुझ'वर काय ठरलं?
कमी काळात अधिक नफा! ज्येष्ठ नागरिकांसाठी 'या' बँका देयायेत मजबूत व्याजदर, जाणून घ्या सविस्तर माहिती
कमी काळात अधिक नफा! ज्येष्ठ नागरिकांसाठी 'या' बँका देयायेत मजबूत व्याजदर, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat ED probe: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? राजकारण्यांचा काळा पैसा व्याजाने दिल्याचा संशय
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? राजकारण्यांचा काळा पैसा व्याजाने दिल्याचा संशय
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, यूनियन बँक, बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँकेला आरबीआयचा दणका, आर्थिक दंड ठोठावला
यूनियन बँक, बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँकेला आरबीआयचा दणका, आर्थिक दंड ठोठावला
Maharashtra Live blog updates: ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी बत्ती गूल, तापमाणाचा पारा वाढलेला असताना रविवार सुट्टीच्या दिवशी नागरिकांचे हाल
Maharashtra Live blog updates: ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी बत्ती गूल, तापमाणाचा पारा वाढलेला असताना रविवार सुट्टीच्या दिवशी नागरिकांचे हाल
Gold Price Crash : सेंट्रल बँकांची विक्रमी खरेदी, तरीही सोन्याची किंमत का घसरतेय? जाणून घ्या 2 मोठी कारणं
सेंट्रल बँकांची विक्रमी खरेदी, तरीही सोन्याची किंमत का घसरतेय? जाणून घ्या 2 मोठी कारणं
Iran War Update : होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
UPI Rule : यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
Embed widget