एक्स्प्लोर

देशात जून-जुलैमध्ये कोरोना शिखरावर असेल, एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया यांचा गंभीर इशारा

40 दिवसांच्या लॉकडाऊननंतरही आपल्याकडे पेशंटच्या संख्येत घट होताना दिसत नाही. ही घट व्हायला सुरुवात होईल तेव्हाच कुठेतरी समाधान मानायला हवं आणि सध्या ते चित्र दूर असल्याचं डॉ. गुलेरिया यांनी म्हटलं.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचं भवितव्य काय असणार याबाबत एका जबाबदार व्यक्तीने सर्वात महत्वाचं वक्तव्य केलं आहे. जून-जुलैमध्ये कोरोनाचा प्रभाव सर्वात जास्त असू शकतो, असं एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया म्हणत आहेत. त्यामुळे कोरोनासंदर्भातली रणनीती किती काळजीनं आखणं गरजेचं आहे हे त्यांच्या वक्तव्यातून कळतंय.

कोरोनामुळे देशातले सर्व व्यवहार ठप्प आहेत. 135 कोटींचा देश 40 दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये आहे. पण म्हणून लगेच हे संकट संपलं असं तुम्ही समजत असाल तर सावध व्हा. भारतात जून-जुलैमध्ये कोरोनाचा प्रभाव सर्वाधिक वाढू शकतो, असा अंदाज एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी वर्तवला आहे.

देशातल्या कोरोना बाधितांच्या संख्येनं नुकताच 50 हजारांचा टप्पा पार केला आहे. देशात कोरोनाच्या एकूण केसेस 52 हजार 952 तर आतापर्यंत 1783 जणांचा अशी सध्या देशातली आकडेवारी आहे. यात रिकव्हरी रेट म्हणजे पेशंट बरे होण्याचा आकडा अधिक असल्याचा दावा सरकार करत आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे मृत्यूदरही कमी आहे. पण गुलेरिया यांच्यासाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे 40 दिवसांच्या लॉकडाऊननंतरही आपल्याकडे पेशंटच्या संख्येत घट होताना दिसत नाही. ही घट व्हायला सुरुवात होईल तेव्हाच कुठेतरी समाधान मानायला हवं आणि सध्या ते चित्र दूर असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

एम्सच्या संचालकांचं हे वक्तव्य खरंतर लॉकडाऊनच्या रणनीतीसाठीही महत्वाचं बनतं. कारण 40 दिवस लॉकडाऊन लावला म्हणजे आपलं काम झालं अशा अविर्भावात आता गाफील राहणं महागात पडू शकतं. ज्या ठिकाणी हॉटस्पॉट आहेत, तिथे अत्यंत कडक निर्बंध, गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे नवनवे उपाय लक्षात घेऊन आपण बॅलन्स साधला पाहिजे, अशी गुलेरिया यांची सूचना आहे.

कोरोनाचं हे संकट नेमकं कधी संपणार हा प्रश्न सगळ्या जगाला पडला आहे. याबाबत अनेक नवे दावेही समोर येतात. काही दिवसांपूर्वी सिंगापूर युनिव्हर्सिटीच्या दाव्याचीही खूप चर्चा झाली होती. त्यांनी असं म्हटलं की मे महिन्यापर्यंत भारतात कोरोनाचा प्रभाव कमी होईल. पण हा दावा मॅथेमॅटिकल मॉड्युलवर अवलंबून होता. डॉ. गुलेरिया हे भारताच्या सर्वात प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थेत काम करतात. त्यांना आपल्याा वैद्यकीय यंत्रणेची चांगली माहिती आहे, हे लक्षात घेऊन त्यांचं वक्तव्य आपण अधिक गांभीर्यानं घ्यायला हवं.

Raj Thackeray | लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय? : राज ठाकरे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget