एक्स्प्लोर

उत्तराखंडमध्ये दरड कोसळली, औरंगाबादच्या 102 भाविकांसह 15 हजार जण अडकले

देहरादून: उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे जवळपास 15 हजार भाविक अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबादच्या 102 भाविकांचाही समावेश आहे. औरंगाबादमधील 102 भाविक रूद्रप्रयागमध्ये अडकले असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.  सर्व भाविक सुखरूप असून राज्य सरकराच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी 'एबीपी माझा'ला सांगितलं.

"आम्ही उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविकांच्या संपर्कात आहोत.

औरंगाबादचे सर्व 102 भाविक सुखरुप आहेत.

स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सर्वांना हॉटेलपर्यंत पोहोचवलं आहे.

लवकरच ते महाराष्ट्रात परततील",

असं चंद्रकांतदादा म्हणाले.

  दोन दिवस रस्ता बंद? दरड कोसळल्यामुळे बद्रीनाथचा रस्ता बंद झाला असून तो पुन्हा सुरु करण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. विष्णूप्रयाग परिसरातील हाथी पर्वत भागात भूस्खलन होऊन 15 हजार भाविक अडकले आहेत. चामोली जिल्ह्यातील जोशीमठ भागापासून 9  किलोमीटर अंतरावर भूस्खलन झालं. भूस्खलनानंतर रस्त्यावर पडलेल्या ढिगाऱ्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यावरील मातीचे ढिगारे हटवून वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे बद्रिनाथकडे जाणारी वाहतूक पूर्ववत होण्यास वेळ लागणार आहे. चार धाम यात्रेला सुरुवात झाल्याने उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे. लातूर जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन दरम्यान, लातूरमधील भाविक उत्तराखंड परिसरात अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्यातून काही भाविक उत्तराखंड येथे या परिसरात असल्यास संबंधित नातेवाईकांनी तत्काळ लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास माहिती द्यावी. 02382 220204/टोल फ्री 1077 ,  या नंबरवर संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.  उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन बद्रीनाथ येथे झालेल्या "लँड स्लाइड" मुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्यातीलही काही नागरीक अडकले आहेत. तरी  माहितीकरिता त्यांच्या नातेवाईकांनी 02472-225618 / 227301 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. डोंगरकडा कोसळला  शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जोशीमठापासून 9 किमी अंतरावर, विष्णूप्रयागजवळ डोंगरकडा कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा कडा थेट रस्त्यावर कोसळल्यामुळे हा रस्ताच बंद झाला. जवळपास 150 मीटर भाग पूर्णपणे उद्ध्व्स्त झाला. गेल्या दोन दिवसांपासून हा डोंगरकडा धोकादायक स्थितीत होता. दरम्यान, भाविकांना दुर्घटनास्थळापासून 200 मीटर मागे रोखण्यात आलं आहे. प्रवासी अडचणीत भूस्खलनामुळे देशभरातील जवळपास 15 हजार भाविक बद्रीनाथ धाम रस्त्यावर अडकले आहेत. उत्तराखंड सरकारने या भाविकांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसंच भाविकांना आहे तिथेच थांबण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याशिवाय रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्याही आहे त्याच परिस्थितीत रोखण्यास सांगितलं आहे. काही भाविक तर बद्रीनाथकडे पोहोचलेही नाहीत, ते परतण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वीही भूस्खलन यापूर्वी 2015 मध्येही भूस्खलन झालं होतं. त्यावेळी हा रस्ता जवळपास आठवडाभर बंद होता. त्यावेळी सरकारने भाविकांना बाहेर काढण्यासाठी सबसिडी तत्त्वावर हेलिकॉप्टर यात्रा सुरु केली होती. आता मात्र हा रस्ता 2 दिवसात सुरळीत होईल, असा दावा करण्यात येत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri-Chinchwad Election 2026: अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण

व्हिडीओ

Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय
Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Election 2026: अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
BMC Election 2026: मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी
मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली थिअरी
Jay Dudhane First Reaction After Arrested: मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Embed widget