एक्स्प्लोर

Manipur Violence : हिंसाचारानंतर मणिपूरवर आणखी एक संकट, 700 हून अधिक म्यानमारच्या नागरिकांची घुसखोरी, राज्य सरकारने मागितला अहवाल

Manipur Violence : मणिपूरमध्ये मागील दोन महिन्यांपासून परिस्थिती अत्यंत तणावपूर्वक आहे. त्यातच अवैधरित्या घुसखोरी केली आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारने आसाम रायफल्सकडून अहवाल मागितला आहे.

Manipur Violence : मणिपूरमध्ये (Manipur) हिंसाचारानंतर (Violence) एका नव्या संकटाची चाहूल लागली आहे. 22 आणि 23 जुलै रोजी म्यानमारच्या (Myanmar) 700 हून अधिक नागरिकांनी अवैधरित्या मणिपूरमध्ये घुसखोरी केली. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान या नागरिकांनी कागदपत्रांशिवाय राज्यात कसा प्रवेश केला आणि त्यांना येथे येण्याची परवानगी कोणी दिली ही माहिती राज्य सरकारने मागितली आहे.

मणिपूर सरकारने आसाम रायफल्सकडे मागितला अहवाल

गृहविभागाने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांमध्ये जवळपास 718 म्यानमारच्या नागरिकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय भारतात कसा प्रवेश करण्याची परवानगी कशी देण्यात आली यासंबंधीचा अहवाल राज्य सरकारने आसाम रायफल्सकडे मागितला आहे. आसाम रायफल्स हे सीमेवर सुरक्षेची जबाबदारी पार पडत असतात. त्यामुळे मणिपूर सरकारने आसाम रायफल्सकडे उत्तर मागितले आहे. दरम्यान ज्या म्यानमारच्या नागरिकांनी भारतात प्रवेश केला आहे त्यांच्याजवळ दारुगोळा आणि हत्यारं तर नाही ना ही चिंता राज्य सरकारला लागून राहिली आहे. 

आसाम रायफल्सच्या सेक्टर 28 कडून 718 म्यानमार नागरिकांनी सीमा ओलांडून चंदेल मार्गे मणिपूरमध्ये प्रवेश केल्याची माहिती देण्यात आली. यावर मणिपूर सरकारचे म्हणणे आहे की,  या प्रकरणी आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला असून यासोबतच म्यानमारच्या या नागरिकांना परत पाठवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मणिपूरमध्ये दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरु असलेल्या हिंसाचाराच्या काळात म्यानमारमधील या घुसखोरांनी आपल्यासोबत दारुगोळा आणि शस्त्रे आणलेली नाहीत, याचीही सरकारला चिंता आहे.

मणिपूरमध्ये हिंसाचाराचे सत्र 

मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचाराचे सत्र सुरु आहे. मेईती आणि कुकी या दोन जातींमध्ये सध्या जातीय दंगली सुरु आहेत. मणिपूरमध्ये सुरु असलेल्या या हिंसाचारामध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आला आहे. दरम्यान यासंदर्भात राज्य सरकारकडून आरोपींना कठोर शिक्षा करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. दरम्यान पोलिसांनी देखील आरोपींना ताब्यात घेतले आहे. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरच्या मुद्द्यावरुन घमासान 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देखील मणिपूरच्या मुद्द्यावरुन एकच गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तर विरोधकांनी या मुद्द्यावरुन सरकारला घेरलं. त्यानंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांकडून करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत येऊन या मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी देखील विरोधकांकडून जोर धरत आहे. 

हे ही वाचा : 

Manipur violence: मणिपूर येथे महिलांवरील अत्याचार प्रकरणी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन, दोषींवर कठोर कारवाईची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget