एक्स्प्लोर

Divorce : मुलांना भेटायला आलेल्या विभक्त झालेल्या पतीला चहा, नाष्टा देणं गरजेचं नाही, मद्रास न्यायालयाचा निर्णय

Madras High Court : मुलांना भेटायला आलेल्या पतीचे स्वागत 'अतिथी देवो भव' पद्धतीने करावं असा आदेश या आधी न्यायालयाने दिला होता. 

चेन्नई: विभक्त झालेला पती त्याच्या मुलांना भेटायला येईल त्यावेळी पत्नीने त्याला चहा, नाष्टा द्यावा याची काही गरज नाही, तसा आदेश अनावश्यक आहे असा निकाल मद्रास न्यायालयाने (Madras High Court) दिला आहे. विभक्त झालेला पती जेव्हा पत्नीकडे त्याच्या मुलांना भेटण्यास येईल तेव्हा त्याचं 'अतिथी देवो भव' अशा पद्धतीने चांगलं स्वागत करावं, चहा नाष्टा विचारावा असं या आधी सिंगल बेंच न्यायाधीशांनी सुचवलं होतं. हा आदेश आता मद्रास उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या बेंचने रद्द केला आहे. सिंगल बेंच जजने हा आदेश जुलै महिन्यात एका सुनावणीदरम्यान दिला होता. 

अशा प्रकारचा कोणताही आदेश देणं गरजेचा नाही असं न्यायमूर्ती परेश उपाध्यय आणि न्यायमूर्ती डी भारत चक्रवर्ती यांच्या बेंचने सांगितलं. या आधी जो आदेश देण्यात आला होता तो केवळ विभक्त पती-पत्नीने मुलांच्या भेटीवेळी कशा प्रकारचा व्यवहार करावा या संबंधित होता असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

काय होतं प्रकरण? 

एका विभक्त झालेल्या जोडप्याच्या मुलाला त्याच्या वडिलांना भेटण्यासंबंधीच्या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयात सिंगल बेंचसमोर सुनावणी सुरू होती. या प्रकरणात त्या मुलाच्या वडिलांना दर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा ते आठ या वेळेदरम्यान मुलाला भेटण्याची परवानगी दिली होती. पण त्या मुलाची आई त्या मुलाला घेऊन दिल्लीला घेऊन जाण्याच्या आणि त्याच ठिकाणी कायमचं वास्तव्य करण्याच्या विचारात होती. पण नंतर तसा कोणताही विचार नसल्याचं त्या मुलाच्या आईने न्यायालयाला सांगितलं.

तो मुलगा आईकडे राहत असल्याने त्या मुलाच्या वडिलांना त्याला भेटण्यासाठी शुक्रवारी आणि शनिवारी आईच्या घरी जाऊन भेटण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने या गोष्टीला मान्यता दिली. विभक्त झालेल्या पती किंवा पत्नीसोबत त्यांच्या मुलाच्या भेटीवेळी दुसऱ्या बाजूच्या व्यक्तीने चांगला व्यवहार करावा असा आदेश न्यायालयाने दिला होता. 

न्यायालयाने सांगितलं की, पती-पत्नी ज्यावेळी विभक्त होतात त्यावेळी ते एकमेकांशी कट्टर शत्रूप्रमाणे वागणूक करतात. ते कायम एकमेकांशी भांडणाच्या तयारीत असतात. त्यांच्या या भांडणाचा परिणाम त्यांच्या मुलांवर होत असतो. हे भावनात्मक ओझं ते मुल आयुष्यभर घेऊन चालत असतं, त्याच्या जीवनावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, त्या मुलाचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. 

प्रत्येक मुलाला त्याच्या आई-वडिलांसोबत सुरक्षित आणि प्रेमपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारे जोडपे जर विभक्त झाले तर त्याचा परिणाम मुलांच्या आयुष्यावर होतो. हा परिणाम मानसिक तसेच भावनिक असू शकतो असं न्यायालयाने स्पष्ट केलं. पती-पत्नीमध्ये जे काही मतभेद असतील ते त्यांनी त्या दोघांपुरतं मर्यादित ठेवावं, त्याचा परिणाम त्यांच्या मुलावरती होऊ देऊ नये असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav :
"भाजपला रोखण्यासाठी देशात 'महिला पंतप्रधान' चेहरा जाहीर करा, चमत्कार घडेल, एक चेहरा दिसतोय पण..."; भास्कर जाधवांचं भुवया उंचावणारं वक्तव्य
Jammu Kashmir News: 15 जूनला घरी यायचं होतं पण नियतीने सर्वच हिरावलं, लेकाच्या पहिल्या वाढदिवसाआधीच वडिलांवर काळाचा घाला; महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण
15 जूनला घरी यायचं होतं पण नियतीने सर्वच हिरावलं, लेकाच्या पहिल्या वाढदिवसाआधीच वडिलांवर काळाचा घाला; महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण
Sanjay Raut on Abhijit Dipke : पंतप्रधान मोदी आणि अभिजीत दीपकेंची अमेरिकेत भेट झाल्याचा दावा, संजय राऊतांनी फोटोच दाखवला
पंतप्रधान मोदी आणि अभिजीत दीपकेंची अमेरिकेत भेट झाल्याचा दावा, संजय राऊतांनी फोटोच दाखवला
Lok Sabha Delimitation : लोकसभेच्या जागा 824 पर्यंत वाढवा, 170 मतदारसंघांच्या विभाजनाचा प्रस्ताव, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस, वाचा सविस्तर   
लोकसभेच्या जागा 824 पर्यंत वाढवा, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस, देशात मतदारसंघ पुनर्रचनेची पुन्हा चर्चा

व्हिडीओ

Abhijeet Dipke interview : भाजप सोडून सगळे पाकिस्तानी का? अराजकता कोण पसरवतंय? - ABP Majha
Sanjay Raut On Abhijeet Dipke : अभिजीत दिपके-नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, राऊतांचा खळबळजनक दावा
Abhijeet Dipke PC :कुठे कुठे आंदोलन करणार? टार्गेटकाय? अभिजीत दिपकेंची पत्रकार परिषद
Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon News: जिद्दीसमोर गरिबी हरली; दोन भावांनी बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेत चार एकर जमीन कसली, म्हणाले 'आम्हाला हा खर्च परवडणारा नव्हता...'
जिद्दीसमोर गरिबी हरली; दोन भावांनी बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेत चार एकर जमीन कसली, म्हणाले 'आम्हाला हा खर्च परवडणारा नव्हता...'
Vaibhav Sooryavanshi: श्रीलंकेतही 'सूर्यवंशी' वादळ घोंगावलं; वैभवच्या धडाकेबाज खेळीत दिसली किंग कोहलीची झलक, चक्क षटकारांचा नाद सोडत इतक्या चौकारांचा वर्षाव केला की..
श्रीलंकेतही 'सूर्यवंशी' वादळ घोंगावलं; वैभवच्या धडाकेबाज खेळीत दिसली किंग कोहलीची झलक, चक्क षटकारांचा नाद सोडत इतक्या चौकारांचा वर्षाव केला की..
Thane : तब्येत कशी आहे? पाय कसा आहे? मारहाण झालेल्या वृद्धाशी राज ठाकरेंचा संवाद, काही लागल्यास मदतीचं आश्वासन
तब्येत कशी आहे? पाय कसा आहे? मारहाण झालेल्या वृद्धाशी राज ठाकरेंचा संवाद, काही लागल्यास मदतीचं आश्वासन
Kolhapur Crime: तब्बल 10 महिने तरुणीवर सामूहिक अत्याचार अन् बदमाश आरोपींची पोलीस गाडीत बसून पोलिसांसमोर मिश्या पिळत खुन्नस, पोलिसांनीच VIP ट्रिटमेंट दिली का?
तब्बल 10 महिने तरुणीवर सामूहिक अत्याचार अन् बदमाश आरोपींची पोलीस गाडीत बसून पोलिसांसमोर मिश्या पिळत खुन्नस, पोलिसांनीच VIP ट्रिटमेंट दिली का?
Nanded Crime Aanchal Mamidwar: सक्षमच्या मृत्यूनंतर आयुष्यभर सासरी राहण्याची शपथ, पण आंचल घरातून निघून गेली, सासऱ्यांचाही मृत्यू, ताटेंचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं
सक्षमच्या मृत्यूनंतर आयुष्यभर सासरी राहण्याची शपथ, पण आंचल घरातून निघून गेली, सासऱ्यांचाही मृत्यू, ताटेंचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं
Nashik Vidhan Parishad Election 2026: मोठी बातमी: अखेर गोकुळ गीतेंचं बंड शमवण्यात महाजन-उदय सामंतांना यश, विधान परिषद निवडणुकीतून घेतली माघार
अखेर गोकुळ गीतेंचं बंड शमवण्यात महाजन-उदय सामंतांना यश, विधान परिषद निवडणुकीतून घेतली माघार
Mumbai Aqua Line Metro: भुयारी मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नेटवर्क कनेक्टिव्हिटीची समस्या संपली; अ‍ॅक्वा लाईनवर फुल्ल नेटवर्क
आता भुयारी मेट्रोतही फुल्ल नेटवर्क मिळणार; प्रवाशांची नेटवर्क कनेक्टिव्हिटीची कटकट संपली
Pune News : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाला जोडण्यात येणाऱ्या बैलजोडीच्या मानावरून वाद; आळंदीत उमेश राणवडे यांचे बैलजोडीसह बेमुदत आंदोलन
माऊलींच्या रथाला जोडण्यात येणाऱ्या बैलजोडीच्या मानावरून वाद; आळंदीत उमेश राणवडे यांचे बैलजोडीसह बेमुदत आंदोलन
Embed widget