एक्स्प्लोर

मध्यप्रदेशात पावसाचा हाहाकार; वेळेवर जलाशयातून पाणी न सोडल्यामुळे पूरस्थिती, स्थानिकांचा आरोप

नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या मानवी वस्ती जलमय झाल्याच चित्र असून शेकडो कुटुंबावर घर सोडून सुरक्षित स्थळी जाण्याची वेळ आली आहे.

उज्जैन :  मध्यप्रदेशात (MadhyaPradesh Rain) पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. तीर्थक्षेत्र ओंकारेश्वरचं अमाप नुकसान झालाय. 'मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी वेळेत पाणी न सोडल्यामुळे पूर आल्याचा आरोप ओंकारेश्वरमधील रहिवाशांनी केला. इंदिरासागर, ओंकारेश्वर जलाशयांचे सर्व गेट अचानक उघडल्यानं ओंकारेश्वर शहर जलमय झालंय. आदी शंकराचाऱ्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना तिथं जाता यावं म्हणून तात्पुरता पूल बांधला होता. तो पूल पाण्याखाली जाऊ नये म्हणून जलाशयांतून आधी पाणी सोडलं नाही. आणि जलाशयांत प्रचंड पाऊस झाल्यानंतर अचानक दोन्ही जलाशयांचे सर्व दरवाजे उघडल्याने ओंकारेश्वराचं नुकसान झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. तर जलाशयाच्या अगदी जवळ शहर असल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा दावा खांडव्याचे जिल्हाधिकारी अनुपकुमार यांनी केलाय.

ओंकारेश्वर जलाशयातून होणारा विसर्ग वाढविल्याने ओंकारेश्वर परिसरात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. इंदिरासागर व ओंकारेश्वर जलाशयातून अचानक सर्व गेट उघडल्याने तीर्थक्षेत्र ओंकारेश्वर जलमय झालं आहे. नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या मानवी वस्ती जलमय झाल्याच चित्र असून शेकडो कुटुंबावर घर सोडून सुरक्षित स्थळी जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पूर नियंत्रण विभाग व स्थानिक प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. 

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ओंकारेश्वर पर्वतात एकात्म धाम म्हणून निर्माणाधीन असलेल्या आदी शंकराचार्य यांच्या महाकाय अशा मूर्तीच मुख्यमंत्री लोकार्पण करणार होते या स्थळी पोहचण्यासाठी नर्मदा नदीतून एक तात्पुरता पुल बनविण्यात आला होता. हा पुल पाण्याखाली जाऊ नये म्हणून धरणात मोठा जलसाठा असूनही स्थानिक प्रशासनाने व पूर नियंत्रण विभागाने जलाशयातील पाणी वेळेआधी सोडलं नाही व धरण क्षेत्रात अचानक मोठा पाऊस पडल्याने धरणात अचानक मोठा पाणीसाठी जमा झाल्यावर प्रशासनाने सर्वच गेट उघडून मोठा विसर्ग केल्याने ओंकारेश्वर शहर जलमय होऊन नागरिकांचं नुकसान झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

याप्रकरणी प्रशासनाची बाजू मांडताना खंडवा जिल्हाधिकारी म्हणाले की , नर्मदा नदीच्या व जलाशय परिसर क्षेत्रात  अती मुसळधार पाऊस सुरू असल्याने ओंकारेश्वर जलाशयाचे सर्व गेट उघडावे लागले आणि जलाशयाच्या अगदी जवळ शहर असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. सध्या युद्धपातळी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती ही जिल्हाधिकारी अनुपकुमार यांनी दिली आहे. मध्य प्रदेशमध्ये आठवडाभरात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस नद्या-नाल्यांना पूर आला आहे. 10 धरणांचे दरवाजे उघडले असून राजस्थानातील पाच मोठी धरणंही ओव्हरफ्लो झाले आहे. बरगी, तवा, ओंकारेश्वर, इंदिरा सागर, यशवंत सागर, सातपुडा, माचागोरा, परसडोह, गंभीर, क्षिप्रा धरणांचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुरामुळे प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये तात्काळ मदत पोहचवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच यामध्ये आतापर्यंत 8718 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.  तर एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे अनेक जवान सध्या पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाटी पोहचले आहेत. 

हे ही वाचा :

राजस्थानसह मध्य प्रदेशात जोरदार पाऊस, काही भागात जनजीवन विस्कळीत; आज 'या' राज्यात पावसाचा इशारा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक
Samadhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
Prashant Jagtap: मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
Sahar Shaikh MIM TMC Election 2026: आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
Embed widget